शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वसुुली तळाला; प्रशासनाची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:10 IST

महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये मालमत्ता वसुली मोठ्या प्रमाणात व्हावी यादृष्टीने अनेक उपाययोजना केल्या. मात्र, प्रशासनाला किंचितही यश आले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये मालमत्ता वसुली मोठ्या प्रमाणात व्हावी यादृष्टीने अनेक उपाययोजना केल्या. मात्र, प्रशासनाला किंचितही यश आले नाही. एप्रिल २०१८ पासून वसुली अत्यंत नाममात्र होत असल्याने प्रशासनाची चिंता बरीच वाढली आहे. दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगाराचेही वांधे होत आहे. नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीत लक्ष घातले असून, वसुली कर्मचाºयांना तुम्हीच आयुक्त समजून वसुली करा, असा आदेश दिला.दोन दिवसांपूर्वीच डॉ. निपुण विनायक यांनी संशोधन केंद्रात मालमत्ता विभागाची बैठक घेतली. सर्व वॉर्ड अधिकारी, वसुली कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते. तब्बल दोन ते अडीच तास ही बैठक घेण्यात आली. बैठकीत आयुक्तांनी वसुली का होत नाही, या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कर्मचाºयांना विश्वासात घेऊन वसुली कशी वाढेल, वसुली करताना कोणत्या अडचणी येतात. नागरिक सहकार्य का करीत नाहीत. वसुलीसाठी गेल्यावर नागरिकांचा नेमका रोष काय असतो. याविषयी कर्मचा-यांची मते जाणून घेतली.महापालिकेत रुजू होण्यापूर्वी मुंबई ते औरंगाबाद प्रवासात त्यांनी ज्या पद्धतीने प्रवाशांकडून शहर कसे असावे याबाबतीत प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या. त्याच पद्धतीने वसुली कर्मचा-यांकडून छोट्या कागदावर समस्या आणि त्यावर उपाययोजना काय कराव्यात याची लेखी माहिती घेतली. यानंतर आयुक्त आता कोणता ठोस निर्णय घेतात याकडे संपूर्ण मनपाचे लक्ष लागले आहे. मालमत्ता कराची २३० कोटी रुपये थकबाकी आहे. या थकबाकीवरील ७५ टक्के व्याज आणि दंड माफ करून मूळ रक्कम भरून घेण्यासाठी मनपाने अभय योजना सुरू केली. या योजनेकडेही औरंगाबादकरांनी पाठ फिरविली. ३१ मे रोजी योजना संपत आहे. या योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय पदाधिकरी व प्रशासनाने घेतला आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकर