शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

देशात १०० कोटी डोसचा विक्रम, इकडे निम्म्या जिल्ह्याला लसीचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 16:41 IST

औरंगाबाद जिल्ह्यात ५२ टक्के नागरिकांना पहिला डोस देऊन झाला आहे.

ठळक मुद्देलसीकरण टाळण्यासाठी नागरिक अनेक बहाणे करत आहेत कोरोनाला कशाला घाबरायचे? लाटेत काही झाले नाही, मग आता कशाला लस ?

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : ‘कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत फिरलो, पण काहीही झाले नाही, कशाला लस घ्यायची...’, ‘संपला कोरोना, लस घेऊन कोण आजारी पडणार...’ अशी एक ना अनेक कारणे सांगून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याचे टाळले जात आहे. विशेषत: ग्रामीण भागांत लसीकडे पाठ फिरविली ( half of the Aurangabad district is without vaccinated) जात आहे. ‘मिशन कवच कुंडल’ ही विशेष मोहीमही राबविण्यात आली. परंतु लसरूपी कवच घेण्यापासून अनेक जण चार हात दूरच आहेत.

गुरुवारी देशाने १०० कोटी डोसचा पल्ला देशाने पार केला. या विक्रमी कामगिरीचा देशभरात जल्लोष करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यात ५२ टक्के नागरिकांना पहिला डोस देऊन झाला आहे. अवघ्या २१ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. ग्रामीण भागातील काही गावांमध्ये, शहरातील काही भागांत लसीकरणाचे अत्यल्प प्रमाण आहे. ग्रामीण भागासाठी सध्या ७० हजार डोस उपलब्ध आहेत.

२३ हजार गरोदर माता, पण...जिल्ह्यात २३ हजार गरोदर माता आहेत. मात्र यातील केवळ साडेपाच हजार जणींनी लस घेतली आहे. लस घेतल्यावर बाळाला काही झाले तर या चिंतेने लस घेतली जात नाही. मातेची इच्छा असली तरी घरातील इतर जण रोखतात.

लसीकरणाचे मायक्रोप्लॅनिंगलसीकरणाचे मायक्रोप्लॅनिंग करण्यात आले आहे. आता सर्व महाविद्यालयांत लसीकरण शिबिर घेण्यासाठी पत्र देण्यात येत आहे. ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे.- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

लसीकरणास प्राधान्य द्याज्यांना केंद्रापर्यंत जाता येत नाही, अशांना घरी जाऊन लस दिली जात आहे. कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे लस घ्या.- डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी

जिल्ह्यातील लसीकरण :-१६ ते ३१ जानेवारी- ८,२०८- १ ते २८ फेब्रुवारी-२३,११७-१ ते ३१ मार्च- १,३०,३२८-१ ते ३० एप्रिल- २,७७,२३०- १ ते ३१ मे -१,४५,४५०- १ ते ३० जून- २,४६, ०४१,-१ ते ३१ जुलै - ३,३१,९३९-१ ते ३१ ऑगस्ट-३,४९, ५७८-१ ते ३० सप्टेंबर- ५,०३,९८२- १ ते २० ऑक्टोबर-३,३२,३१६

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCorona vaccineकोरोनाची लस