शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आठ साखर कारखान्यांवर कायदेशीर कारवाईची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 18:27 IST

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात सोमवारी शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

ठळक मुद्देविनापरवाना गाळपावर शेतकरी संघटना आक्रमक प्रादेशिक साखर सहसंचालकांनी उचले पाऊल

औरंगाबाद : गाळप परवाना प्राप्त नसताना विनापरवाना गाळप सुरू केलेल्या आठ साखर कारखान्यांवर दंडात्मक आाणि कायदेशीर (एफआयआर) कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस सोमवारी प्रादेशिक साखर सहसंचालकांनी साखर आयुक्तांकडे केली.

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात सोमवारी शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी सहसंचालक एस. एस. क्षीरसागर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, गंगापूर तालुकाध्यक्ष संपत रोडगे पाटील, नंदुरबार येथील पदाधिकारी घनश्याम चौधरी, विठ्ठल पवार आदी उपस्थित होते. एफआरपीचे पैसे न देता अटींची पूर्तता केल्याचा खोटा अहवाल देऊन ऊस गाळप होत आहे. यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी अशा कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करा, अशी मागणी केली. संपत रोडगे यांनी एफआरपीनुसार ऊस उत्पादन शेतकऱ्यांना दर न देणाऱ्या घृष्णेश्वर व मुक्तेश्वर साखर कारखान्यांवर कारवाईची मागणी केली.

यावेळी कारखानदार, ऊस उत्पादक शेतकरी, स्वाभिमानीचे पदाधिकाऱ्यांत कारखान्यांचे परवाने रद्द करण्यावरून चांगलीच खडाजंगी झाली.  गाळप हंगाम २०१८-१९ मध्ये ज्या साखर कारखान्यांनी साखर आयुक्त कार्यालयाकडून अद्यापपर्यंत गाळप परवाना प्राप्त नसताना गाळप सुरू केलेले आहे, अशा साखर कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लावून धरण्यात आली. त्यामुळे अखेर मागणीनंतर पाऊल उचलत सहसंचालकांनी एका पत्राद्वारे आठ कारखान्यांवर कारवाई करण्याची साखर आयुक्तांकडे शिफारस केली.

कार्यालयाने मागविले पोलीसघनश्याम चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाल्याचा आरोप सातपुडा कारखान्याच्या संबंधितावर करताच चांगलीच खडाजंगी झाली. एकमेकाला अरेरावीच्या भाषेत संवाद सुरू होताच साखर सहसंचालक कार्यालयाने पोलिसांची कुमक मागविली होती. मराठवाड्यात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात ऊस उत्पादित होतो, याची सहसंचालकांना विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी मराठवाड्यातील सर्वात जास्त ऊसतोड मजुरांची संख्या असलेल्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक ऊस उत्पादन असल्याचे सांगितल्यानेही चांगलाच वाद झाला.

या कारखान्यांवर कारवाईची शिफारस- घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना, गदाना, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद.- समृद्धी सहकारी साखर कारखाना, घनसावंगी, जि. जालना.- जयभवानी सहकारी साखर कारखाना, गढी, ता. गेवराई, जि. बीड.- एन. एस. एल. शुगर्स प्रा. लि., पवारवाडी, ता. माजलगाव, जि. बीड.- अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, केज, जि. बीड.- आयान मल्टिट्रेड एल. एल. पी. (अ‍ॅस्टोरिया अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लि) समशेरपूर.- संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, एकनाथनगर, ता. पैठण, जि. औरंगाबाद.- वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, पांगरी, ता. परळी, जि. बीड.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र