शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

वाहनांच्या वेटिंगचे कारण आले समोर, ‘सिलिकॉन चिप्स’च्या तुटवड्यामुळे वाहन उद्योग अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 13:43 IST

कोरोनामुळे अलीकडे स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेकडे प्रत्येक क्षेत्राचा कल वाढला. त्यामुळे जागतिक पातळीवर ‘चिप्स’ची मागणी वाढली आणि अचानकपणे सगळीकडे ‘सिलिकॉन चिप्स’चा तुटवडा निर्माण झाला.

औरंगाबाद : ‘सिलिकॉन चिप्स’च्या तुटवड्यामुळे औरंगाबादसह जगभरातील वाहन उद्योग अडचणीत सापडले असून या उद्याेगांनी उत्पादनांचे प्रमाण कमी केले आहे (due to the shortage of silicon chips in the automotive industry in trouble). त्यामुळे सध्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत जाणवत आहे. अनेक वाहनांसाठी ग्राहकांना चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

राज्याच्या व्यापार, उद्योग क्षेत्राची शिखर संस्था असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर’चे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी ‘चिप्स’च्या तुटवड्याबद्दल सांगितले की, कोरोनामुळे अलीकडे स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेकडे प्रत्येक क्षेत्राचा कल वाढला. त्यामुळे जागतिक पातळीवर ‘चिप्स’ची मागणी वाढली आणि अचानकपणे सगळीकडे ‘सिलिकॉन चिप्स’चा तुटवडा निर्माण झाला. जगातील बाजारपेठेत ७५ ते ८० टक्के ‘चिप्स’ तैवान येथील कंपनीची आहे. मागणीच्या तुलनेत या कंपनीची चिप्स उत्पादनाची पुरेशी क्षमता नाही. उत्पादन क्षमता वाढवायची असेल, तर मोठी गुंतवणूक करावी लागते. शिवाय अब्जावधी चिप्स तयार केल्यानंतर त्या बाजारात विकल्या जाव्या लागतात. म्हणून सध्या तरी या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे धाडस कोणी करत नाही; परंतु अलीकडे तैवान, अमेरिका व युरोपमध्ये ‘चिप्स’ निर्मिती उद्योगांच्या विस्तारीकरणास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मार्च २०२२ पर्यंत तरी ‘चिप्स’चा तुटवडा जाणवणारच आहे. येणाऱ्या दिवाळीपर्यंत ही अडचण दूर होण्याची शक्यता आहे. तूर्तास तरी औरंगाबादसह देशभरात दुचाकी, चारचाकी वाहने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी नोंदणी केली आहे. मात्र, पुरवठा करणाऱ्या सर्वच कंपन्यांनी उत्पादन क्षमता कमी केल्यामुळे वाहनांसाठी ‘वेटिंग’वर थांबावे लागत आहे.औरंगाबादेत स्कोडा व बजाज या दोनच कंपन्या वाहन उत्पादन करतात. या दोन कंपन्यांनाही ‘सिलिकॉन चिप्स’ची झळ बसली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ओमायक्रॉन’ चिंता नाहीकोरोनामुळे संपूर्ण उद्योग क्षेत्र विस्कळीत बनले होते. अलीकडे ते हळूहळू पूर्वपदावर आले असून, आता आणखी कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या सर्वच उद्योग क्षेत्राच्या परिस्थितीचा आढावा घेतला असता, उद्योगांनी ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत माल घेऊन गेलेल्या देशातच कंटेनर अडकून पडले होते. त्यामुळे कच्च्या मालाची आयात व उत्पादनाच्या निर्यातीसाठी कंटेरनची मोठी अडचण उद्योगांना भासली होती. ओमायक्रॉनबद्दल खूप प्रवाद असल्यामुळे उद्योगांवर त्याचा परिणाम होईल, असे दिसत नाही.- शिवप्रसाद जाजू, अध्यक्ष, ‘सीएमआयए’

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगOmicron Variantओमायक्रॉन