शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

वाहनांच्या वेटिंगचे कारण आले समोर, ‘सिलिकॉन चिप्स’च्या तुटवड्यामुळे वाहन उद्योग अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 13:43 IST

कोरोनामुळे अलीकडे स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेकडे प्रत्येक क्षेत्राचा कल वाढला. त्यामुळे जागतिक पातळीवर ‘चिप्स’ची मागणी वाढली आणि अचानकपणे सगळीकडे ‘सिलिकॉन चिप्स’चा तुटवडा निर्माण झाला.

औरंगाबाद : ‘सिलिकॉन चिप्स’च्या तुटवड्यामुळे औरंगाबादसह जगभरातील वाहन उद्योग अडचणीत सापडले असून या उद्याेगांनी उत्पादनांचे प्रमाण कमी केले आहे (due to the shortage of silicon chips in the automotive industry in trouble). त्यामुळे सध्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत जाणवत आहे. अनेक वाहनांसाठी ग्राहकांना चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

राज्याच्या व्यापार, उद्योग क्षेत्राची शिखर संस्था असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर’चे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी ‘चिप्स’च्या तुटवड्याबद्दल सांगितले की, कोरोनामुळे अलीकडे स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेकडे प्रत्येक क्षेत्राचा कल वाढला. त्यामुळे जागतिक पातळीवर ‘चिप्स’ची मागणी वाढली आणि अचानकपणे सगळीकडे ‘सिलिकॉन चिप्स’चा तुटवडा निर्माण झाला. जगातील बाजारपेठेत ७५ ते ८० टक्के ‘चिप्स’ तैवान येथील कंपनीची आहे. मागणीच्या तुलनेत या कंपनीची चिप्स उत्पादनाची पुरेशी क्षमता नाही. उत्पादन क्षमता वाढवायची असेल, तर मोठी गुंतवणूक करावी लागते. शिवाय अब्जावधी चिप्स तयार केल्यानंतर त्या बाजारात विकल्या जाव्या लागतात. म्हणून सध्या तरी या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे धाडस कोणी करत नाही; परंतु अलीकडे तैवान, अमेरिका व युरोपमध्ये ‘चिप्स’ निर्मिती उद्योगांच्या विस्तारीकरणास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मार्च २०२२ पर्यंत तरी ‘चिप्स’चा तुटवडा जाणवणारच आहे. येणाऱ्या दिवाळीपर्यंत ही अडचण दूर होण्याची शक्यता आहे. तूर्तास तरी औरंगाबादसह देशभरात दुचाकी, चारचाकी वाहने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी नोंदणी केली आहे. मात्र, पुरवठा करणाऱ्या सर्वच कंपन्यांनी उत्पादन क्षमता कमी केल्यामुळे वाहनांसाठी ‘वेटिंग’वर थांबावे लागत आहे.औरंगाबादेत स्कोडा व बजाज या दोनच कंपन्या वाहन उत्पादन करतात. या दोन कंपन्यांनाही ‘सिलिकॉन चिप्स’ची झळ बसली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ओमायक्रॉन’ चिंता नाहीकोरोनामुळे संपूर्ण उद्योग क्षेत्र विस्कळीत बनले होते. अलीकडे ते हळूहळू पूर्वपदावर आले असून, आता आणखी कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या सर्वच उद्योग क्षेत्राच्या परिस्थितीचा आढावा घेतला असता, उद्योगांनी ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत माल घेऊन गेलेल्या देशातच कंटेनर अडकून पडले होते. त्यामुळे कच्च्या मालाची आयात व उत्पादनाच्या निर्यातीसाठी कंटेरनची मोठी अडचण उद्योगांना भासली होती. ओमायक्रॉनबद्दल खूप प्रवाद असल्यामुळे उद्योगांवर त्याचा परिणाम होईल, असे दिसत नाही.- शिवप्रसाद जाजू, अध्यक्ष, ‘सीएमआयए’

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगOmicron Variantओमायक्रॉन