शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

रावण ज्ञानीच होता, अहंकाराने हरला; सरसंचालकांच्या सरकार अन् विरोधकांना कानपिचक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 11:04 IST

ज्ञानी असूनही अहंकारामुळे रावण हरला, आता चांगल्या परिवर्तनाची वेळ आली आहे: सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अप्रत्यक्षरीत्या सरकारची कानटोचणी तर केलीच, शिवाय विरोधकांनाही कानपिचक्या दिल्या. राम आणि रावण यांची उदाहरणे देत अहंकारामुळे रावणाचा नाश झाल्याची आठवण करून दिली.

गुरुवारी सायंकाळी स्व. दत्ताजी भाले स्मृती समितीने उभारलेल्या रा.स्व. संघाच्या ‘समर्पण’ कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बाेलत होते. व्यासपीठावर संघाचे प्रांत संघचालक अनिल भालेराव व स्व. दत्ताजी भाले स्मृती समितीचे अध्यक्ष देवानंद कोटगिरे यांची उपस्थिती होती.

डॉ. भागवत म्हणाले, रावण व राम दोघे जण ज्ञानी होते. मात्र, रावणात प्रचंड अहंकार होता. ज्ञानी असूनही अहंकारामुळे रावण हरला. आता चांगल्या परिवर्तनाची वेळ आली आहे. जगाचे लक्ष आपल्या तत्त्वज्ञान व संस्कृतीवर गेले आहे. आपला राष्ट्रीय पुरुषार्थ वाढला आहे. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. विनातपस्या असे कार्य होत नाही. या पाठीमागे निस्पृह कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज असते. त्यांच्या तपस्येचे फळ आज दिसत आहे. राजकारणात जो पुढे जातो त्यावर जळणारे अनेक जण निर्माण होतात, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

समर्पण इमारत उभी करण्यात अनेकांचे योगदान आहे. आधी संघाचे कार्यकर्ते किंवा स्वयंसेवक अशा मोठ्या निर्मित झालेल्या वास्तूंमध्ये कार्यालयांमध्ये राहत नव्हते. हितचिंतकांच्या घरी स्वयंसेवक, संघप्रचारक राहत असत. याचीही जाणीव ठेवण्याचे काम तुम्ही करा असे स्पष्टपणे अधोरेखित केले. संघ, त्यातील समर्पण आणि एकूण कार्य हे व्यापक आहे, त्यातून जग आपल्याकडे पाहत आहे. हे केवळ दोघा तिघांचे काम नाही तर विश्वगुरू होताना सर्मपणाचा भावदेखील जगासमोर ठेवला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

श्रीराम मंदिरासाठी ५०० वर्षांचा संघर्ष...२२ जानेवारीला सर्व देशाने अयोध्येतील मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अनुभवला, त्याचा आनंदोत्सव साजरा केला; पण हे कार्य काही एकारात्रीतून घडले नाही. यापाठीमागे ५०० वर्षांचा संघर्ष होता. गेल्या ३० वर्षांत उभे राहिलेले मोठे आंदोलन होते. त्यासाठी अनेकांचे बलिदान तपश्चर्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

७७ टक्के लोकांना स्वातंत्र्यलढा, आणीबाणीचा गंध नाहीदेशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी असंख्य लोकांनी बलिदान दिले, घरसंसाराचा त्याग केला. मात्र, आजच्या ७७ टक्के लोकांना नवपिढीला स्वातंत्र्यलढा व आणीबाणी यांची महती माहीतच नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा चारित्र्य, इतिहास आवर्जून वाचावा, हे मोहन भागवतांनी एका गोष्टीच्या माध्यमातून सर्वांना सांगितले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAurangabadऔरंगाबाद