शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

रावण ज्ञानीच होता, अहंकाराने हरला; सरसंचालकांच्या सरकार अन् विरोधकांना कानपिचक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 11:04 IST

ज्ञानी असूनही अहंकारामुळे रावण हरला, आता चांगल्या परिवर्तनाची वेळ आली आहे: सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अप्रत्यक्षरीत्या सरकारची कानटोचणी तर केलीच, शिवाय विरोधकांनाही कानपिचक्या दिल्या. राम आणि रावण यांची उदाहरणे देत अहंकारामुळे रावणाचा नाश झाल्याची आठवण करून दिली.

गुरुवारी सायंकाळी स्व. दत्ताजी भाले स्मृती समितीने उभारलेल्या रा.स्व. संघाच्या ‘समर्पण’ कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बाेलत होते. व्यासपीठावर संघाचे प्रांत संघचालक अनिल भालेराव व स्व. दत्ताजी भाले स्मृती समितीचे अध्यक्ष देवानंद कोटगिरे यांची उपस्थिती होती.

डॉ. भागवत म्हणाले, रावण व राम दोघे जण ज्ञानी होते. मात्र, रावणात प्रचंड अहंकार होता. ज्ञानी असूनही अहंकारामुळे रावण हरला. आता चांगल्या परिवर्तनाची वेळ आली आहे. जगाचे लक्ष आपल्या तत्त्वज्ञान व संस्कृतीवर गेले आहे. आपला राष्ट्रीय पुरुषार्थ वाढला आहे. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. विनातपस्या असे कार्य होत नाही. या पाठीमागे निस्पृह कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज असते. त्यांच्या तपस्येचे फळ आज दिसत आहे. राजकारणात जो पुढे जातो त्यावर जळणारे अनेक जण निर्माण होतात, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

समर्पण इमारत उभी करण्यात अनेकांचे योगदान आहे. आधी संघाचे कार्यकर्ते किंवा स्वयंसेवक अशा मोठ्या निर्मित झालेल्या वास्तूंमध्ये कार्यालयांमध्ये राहत नव्हते. हितचिंतकांच्या घरी स्वयंसेवक, संघप्रचारक राहत असत. याचीही जाणीव ठेवण्याचे काम तुम्ही करा असे स्पष्टपणे अधोरेखित केले. संघ, त्यातील समर्पण आणि एकूण कार्य हे व्यापक आहे, त्यातून जग आपल्याकडे पाहत आहे. हे केवळ दोघा तिघांचे काम नाही तर विश्वगुरू होताना सर्मपणाचा भावदेखील जगासमोर ठेवला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

श्रीराम मंदिरासाठी ५०० वर्षांचा संघर्ष...२२ जानेवारीला सर्व देशाने अयोध्येतील मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अनुभवला, त्याचा आनंदोत्सव साजरा केला; पण हे कार्य काही एकारात्रीतून घडले नाही. यापाठीमागे ५०० वर्षांचा संघर्ष होता. गेल्या ३० वर्षांत उभे राहिलेले मोठे आंदोलन होते. त्यासाठी अनेकांचे बलिदान तपश्चर्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

७७ टक्के लोकांना स्वातंत्र्यलढा, आणीबाणीचा गंध नाहीदेशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी असंख्य लोकांनी बलिदान दिले, घरसंसाराचा त्याग केला. मात्र, आजच्या ७७ टक्के लोकांना नवपिढीला स्वातंत्र्यलढा व आणीबाणी यांची महती माहीतच नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा चारित्र्य, इतिहास आवर्जून वाचावा, हे मोहन भागवतांनी एका गोष्टीच्या माध्यमातून सर्वांना सांगितले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAurangabadऔरंगाबाद