शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रावण ज्ञानीच होता, अहंकाराने हरला; सरसंचालकांच्या सरकार अन् विरोधकांना कानपिचक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 11:04 IST

ज्ञानी असूनही अहंकारामुळे रावण हरला, आता चांगल्या परिवर्तनाची वेळ आली आहे: सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अप्रत्यक्षरीत्या सरकारची कानटोचणी तर केलीच, शिवाय विरोधकांनाही कानपिचक्या दिल्या. राम आणि रावण यांची उदाहरणे देत अहंकारामुळे रावणाचा नाश झाल्याची आठवण करून दिली.

गुरुवारी सायंकाळी स्व. दत्ताजी भाले स्मृती समितीने उभारलेल्या रा.स्व. संघाच्या ‘समर्पण’ कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बाेलत होते. व्यासपीठावर संघाचे प्रांत संघचालक अनिल भालेराव व स्व. दत्ताजी भाले स्मृती समितीचे अध्यक्ष देवानंद कोटगिरे यांची उपस्थिती होती.

डॉ. भागवत म्हणाले, रावण व राम दोघे जण ज्ञानी होते. मात्र, रावणात प्रचंड अहंकार होता. ज्ञानी असूनही अहंकारामुळे रावण हरला. आता चांगल्या परिवर्तनाची वेळ आली आहे. जगाचे लक्ष आपल्या तत्त्वज्ञान व संस्कृतीवर गेले आहे. आपला राष्ट्रीय पुरुषार्थ वाढला आहे. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. विनातपस्या असे कार्य होत नाही. या पाठीमागे निस्पृह कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज असते. त्यांच्या तपस्येचे फळ आज दिसत आहे. राजकारणात जो पुढे जातो त्यावर जळणारे अनेक जण निर्माण होतात, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

समर्पण इमारत उभी करण्यात अनेकांचे योगदान आहे. आधी संघाचे कार्यकर्ते किंवा स्वयंसेवक अशा मोठ्या निर्मित झालेल्या वास्तूंमध्ये कार्यालयांमध्ये राहत नव्हते. हितचिंतकांच्या घरी स्वयंसेवक, संघप्रचारक राहत असत. याचीही जाणीव ठेवण्याचे काम तुम्ही करा असे स्पष्टपणे अधोरेखित केले. संघ, त्यातील समर्पण आणि एकूण कार्य हे व्यापक आहे, त्यातून जग आपल्याकडे पाहत आहे. हे केवळ दोघा तिघांचे काम नाही तर विश्वगुरू होताना सर्मपणाचा भावदेखील जगासमोर ठेवला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

श्रीराम मंदिरासाठी ५०० वर्षांचा संघर्ष...२२ जानेवारीला सर्व देशाने अयोध्येतील मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अनुभवला, त्याचा आनंदोत्सव साजरा केला; पण हे कार्य काही एकारात्रीतून घडले नाही. यापाठीमागे ५०० वर्षांचा संघर्ष होता. गेल्या ३० वर्षांत उभे राहिलेले मोठे आंदोलन होते. त्यासाठी अनेकांचे बलिदान तपश्चर्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

७७ टक्के लोकांना स्वातंत्र्यलढा, आणीबाणीचा गंध नाहीदेशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी असंख्य लोकांनी बलिदान दिले, घरसंसाराचा त्याग केला. मात्र, आजच्या ७७ टक्के लोकांना नवपिढीला स्वातंत्र्यलढा व आणीबाणी यांची महती माहीतच नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा चारित्र्य, इतिहास आवर्जून वाचावा, हे मोहन भागवतांनी एका गोष्टीच्या माध्यमातून सर्वांना सांगितले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAurangabadऔरंगाबाद