शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

फाटाफुटीने वाढले ३५ उमेदवार

By admin | Updated: October 3, 2014 23:53 IST

२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७४ उमेदवार आखाड्यात होते.

२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७४ उमेदवार आखाड्यात होते. ६ जागांसाठी हा सामना चांगलाच रंगला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस तसेच भाजप व सेना एकत्रित निवडणुका लढले होते. गतवेळी शिवसेनेने बीडची एकमेव तर काँग्रेसने परळीची एकमेव जागा लढली होती. उर्वरित ५ ठिकाणी राष्ट्रवादीविरुद्ध भाजपा अशी थेट लढाई झाली होती. यामध्ये राष्ट्रवादीने भाजपाला सुरुंग लावला होता. ६ पैकी ५ जागा पटकावत राष्ट्रवादीने जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली होती. भाजपाला परळीच्या एकमेव जागेवर समाधान मानावे लागले होते.भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव यांच्या निधनानंतर प्रथमच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची चांगलीच कसोटी लागली आहे. सलग तीन ‘टर्म’ एकत्रित संसार केलेल्या आघाडीत फाटाफूट झाल्यामुळे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचेही समीकरण बदलून गेले.एरव्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ‘हात’भार लावत पडती बाजू घेणाऱ्या काँग्रेसनेही यावेळी सर्वच्या सर्व ६ ठिकाणी स्वतंत्र उमेदवार उभे केले. दुसरीकडे शिवसेनेने देखील परळी वगळता सर्व ठिकाणी आपल्या उमेदवारांना आखाड्यात उतरविले. आता मागच्या सारखी ‘स्ट्रेट फाईट’ नाही. लढती बहुरंगी आहेत.२००४ मध्ये ६ जागांसाठी ७६ उमेदवार उभे होते. २००९ मध्ये हा आकडा २ ने कमी झाला. यावेळी मात्र उमेदवारांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. ६ जागांसाठी १०९ उमेदवार नशीब अजमावत आहेत. गतवर्षीपेक्षा ३५ उमेदवारांची गर्दी यावेळी वाढली आहे.६ जागांसाठी तब्बल २०७ अर्ज वैध ठरले होते. मात्र ९८ जणांनी माघार घेतली. त्यामुळे १०९ उमेदवार रिंगणात आहेत. अपक्षांनीही यंदा चांगलीच गर्दी केली आहे. गेवराईमध्ये सर्वात कमी ११ उमेदवार आहेत तर बीडमध्ये सर्वाधिक २५ उमेदवार आहेत. पाठोपाठ आष्टी येथे १२ तर माजलगावात २४ उमेदवारांमध्ये सामना रंगला आहे. मतांचे विभाजन होणार असल्यामुळे धक्कादायक निकालाची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. तूर्त प्रचाराला मोठा वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. ठिकठिकाणी मातब्बर नेत्यांच्या सभा, बैठकांची रेलचेल सुरू आहे.लोकसभेत ‘स्ट्रेट फाईट’बीड लोकसभेसाठी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत १२ उमेदवार आमने-सामने आहेत. मात्र खरी लढत भाजपच्या उमेदवार प्रीतम गोपीनाथ मुंडे, काँग्रेसचे उमेदवार अशोक पाटील यांच्यात होत आहे. अशोक पाटील यांनी यापूर्वी दोनदा लोकसभा निवडणूक लढविली. मात्र त्यांना अपयश आलेले आहे. दुसरीकडे प्रीतम मुंडे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे.