शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

मुजोर रिक्षांना आरटीओचे अभय

By admin | Updated: April 7, 2015 01:26 IST

औरंगाबाद : सतत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, दादागिरी करणाऱ्या १५७ अ‍ॅपे, आॅटोरिक्षांचे प्रवासी वाहतुकीचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव तीन

औरंगाबाद : सतत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, दादागिरी करणाऱ्या १५७ अ‍ॅपे, आॅटोरिक्षांचे प्रवासी वाहतुकीचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वी वाहतूक शाखा पोलिसांनी आरटीओ कार्यालयाकडे पाठविला होता. विशेष म्हणजे त्यासाठी तीनदा स्मरणपत्रही देण्यात आले; परंतु ‘माये’पोटी आरटीओ कार्यालयाने अद्याप या रिक्षांचे परवाने निलंबित केलेले नाहीत. पोलिसांचा हा प्रस्ताव तसाच धूळखात पडून आहे. अ‍ॅपे, आॅटोरिक्षाचालकांनी गेल्या अनेक वर्षांपासून शहरात अक्षरश: उच्छाद मांडलेला आहे. क्षमतेपेक्षा तीन, चारपट अधिक प्रवासी बसविणे, जणू रस्ता केवळ आपल्यासाठीच आहे, अशा पद्धतीने रिक्षा चालविणे, प्रवासी घेण्यासाठी रस्त्यात कोठेही रिक्षा थांबवून वाहतुकीस खोळंबा निर्माण करणे, कुणी जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिवीगाळ, मारहाण करणे, असे प्रकार शहरातील रिक्षाचालकांकडून सुरू आहेत. रिक्षाचालकांची दादागिरी इतकी वाढली आहे की ते चक्क पोलिसांनाही मारहाण करण्यास मागेपुढे पाहत नसल्याचे चार दिवसांपूर्वी जालना रोडवर घडलेल्या घटनेवरून दिसून आले.पोलिसांवर रिक्षाचालकाने केलेल्या हल्ल्यामुळे रिक्षाचालकांच्या दादागिरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्या घटनेनंतर वाहतूक शाखा पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांविरुद्ध मोहीम पुन्हा एकदा तीव्र केली आहे. मात्र, बेदरकार बनलेल्या रिक्षाचालकांना धडा शिकविण्यासाठी पोलिसांना आरटीओ कार्यालयाकडून तितकेसे सहकार्य मिळत नसल्याचे समोर आले आहे.