शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
2
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
3
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
4
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
6
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
7
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
8
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
9
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
10
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
11
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
12
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
13
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
14
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
15
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
16
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
17
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
18
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
19
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
20
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू

मुजोर रिक्षांना आरटीओचे अभय

By admin | Updated: April 7, 2015 01:26 IST

औरंगाबाद : सतत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, दादागिरी करणाऱ्या १५७ अ‍ॅपे, आॅटोरिक्षांचे प्रवासी वाहतुकीचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव तीन

औरंगाबाद : सतत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, दादागिरी करणाऱ्या १५७ अ‍ॅपे, आॅटोरिक्षांचे प्रवासी वाहतुकीचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वी वाहतूक शाखा पोलिसांनी आरटीओ कार्यालयाकडे पाठविला होता. विशेष म्हणजे त्यासाठी तीनदा स्मरणपत्रही देण्यात आले; परंतु ‘माये’पोटी आरटीओ कार्यालयाने अद्याप या रिक्षांचे परवाने निलंबित केलेले नाहीत. पोलिसांचा हा प्रस्ताव तसाच धूळखात पडून आहे. अ‍ॅपे, आॅटोरिक्षाचालकांनी गेल्या अनेक वर्षांपासून शहरात अक्षरश: उच्छाद मांडलेला आहे. क्षमतेपेक्षा तीन, चारपट अधिक प्रवासी बसविणे, जणू रस्ता केवळ आपल्यासाठीच आहे, अशा पद्धतीने रिक्षा चालविणे, प्रवासी घेण्यासाठी रस्त्यात कोठेही रिक्षा थांबवून वाहतुकीस खोळंबा निर्माण करणे, कुणी जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिवीगाळ, मारहाण करणे, असे प्रकार शहरातील रिक्षाचालकांकडून सुरू आहेत. रिक्षाचालकांची दादागिरी इतकी वाढली आहे की ते चक्क पोलिसांनाही मारहाण करण्यास मागेपुढे पाहत नसल्याचे चार दिवसांपूर्वी जालना रोडवर घडलेल्या घटनेवरून दिसून आले.पोलिसांवर रिक्षाचालकाने केलेल्या हल्ल्यामुळे रिक्षाचालकांच्या दादागिरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्या घटनेनंतर वाहतूक शाखा पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांविरुद्ध मोहीम पुन्हा एकदा तीव्र केली आहे. मात्र, बेदरकार बनलेल्या रिक्षाचालकांना धडा शिकविण्यासाठी पोलिसांना आरटीओ कार्यालयाकडून तितकेसे सहकार्य मिळत नसल्याचे समोर आले आहे.