शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

औरंगाबादमधील रामकृष्ण ध्यान मंदिर पूर्णत्वाकडे; ४ हजार टन चनार दगड, ४०० टन संगमरवरचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 17:36 IST

बीड बायपास रोडवर १०० फूट उंचीचे भव्य रामकृष्ण ध्यान मंदिर उभारण्यात आले आहे. यासाठी ४ हजार टन चनार दगड व ४०० टन संगमरवराचा वापर करण्यात आला आहे.

औरंगाबाद : बीड बायपास रोडवर १०० फूट उंचीचे भव्य रामकृष्ण ध्यान मंदिर उभारण्यात आले आहे. यासाठी ४ हजार टन चनार दगड व ४०० टन संगमरवराचा वापर करण्यात आला आहे. मराठवाड्यातील एकमेव भव्यदिव्य अशा ध्यान केंद्राचे बांधकाम पूर्णत्वाकडे असून, १७ नोव्हेंबर रोजी लोकार्पण सोहळा होणार आहे. 

कोलकात्याच्या धर्तीवर औरंगाबादेत मागील ९ वर्षांपासून ‘रामकृष्ण ध्यान मंदिर’ उभारणीचे काम सुरू आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे देश-विदेशातील उत्कृष्ट शेकडो नक्षीकामांचा संगम मंदिराच्या बांधकामात पाहावयास मिळत आहे. मन:शांतीसाठी सर्व धर्मांच्या लोकांना येथे ध्यान करता येणार आहे. मंदिराचे बांधकाम १८ हजार चौ.फु.वर करण्यात आले आहे. १५६ फूट लांबी, ७६ फूट रुंद आणि १०० फूट उंचीच्या या मंदिरासाठी वाराणसी, काशीहून ४ हजार टन चनार दगड आणण्यात आले. फिकट गुलाबी रंगाच्या दगडाने मंदिर उभारले आहे. राजस्थानमधील मकराना, अंबाजी येथून ४०० टन संगमरवर आणण्यात आले आहे, तर मध्यप्रदेशातील आशापूर येथून उच्चप्रतीचे सागवान लाकूड आणण्यात आले आहे. 

स्वामी रामकृष्ण यांच्या ६ फूट उंचीच्या मूर्तीची साडेतीन फुटांच्या सिंहासनावर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आजूबाजूला स्वामी विवेकानंद व श्री शारदादेवी यांच्या प्रतिमा राहणार आहेत. मंदिरासाठी २५ कोटींचा खर्च आला आहे. या ध्यान मंदिरामुळे औरंगाबादच्याच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्याच्या वैभवात भर पडणार आहे. 

देश-विदेशातून येणार भाविकरामकृष्ण मिशन आश्रमाचे सचिव स्वामी विष्णुपादानंद यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठा सोहळा १६ ते १८ नोव्हेंबर २०१८ यादरम्यान साजरा करण्यात येणार आहे. स्वामी वागिशानंद महाराज यांच्या हस्ते १७ रोजी मंदिराचा लोकार्पण सोहळा व युवकांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील ५ हजार भाविक शहरात येणार आहेत. 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAurangabadऔरंगाबादTempleमंदिर