शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

१९९१ ला झकेरिया-देशमुख यांच्या मतविभागणी झाली, राजीव गांधी प्रचाराला येवूनही कॉँग्रेस पराभूत

By विजय सरवदे | Updated: May 9, 2024 16:48 IST

तेव्हाची निवडणूक आणि आताच्या निवडणुकीत फरक काय? यावर तत्कालीन कॉँग्रेस उमेदवार डॉ. मोहन देशमुख म्हणाले,

छत्रपती संभाजीनगर : ‘काँग्रेसचे तत्कालीन मंत्री डॉ. रफिक झकेरिया यांना राज्यसभेवर घेण्याचे आश्वासन देऊन पक्षश्रेष्ठींनी १९९१च्या निवडणुकीत महाराष्ट्रात युवक काँग्रेसच्या कोट्यातून एकमेव औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आपल्याला उमेदवारी दिली. खरंतर ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज होऊन त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. आमच्या दोघांत मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाल्यामुळेच आपला पराभव झाला. अन्यथा, या जागेवर आपला विजय निश्चित होता,’ अशी आठवण डॉ. मोहन देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितली.

तेव्हाची निवडणूक आणि आताच्या निवडणुकीत फरक काय? यावर डॉ. देशमुख म्हणाले, ‘तेव्हाच्या निवडणुकीत पक्षनेतृत्व किंवा उमेदवारांवर वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्वरूपाची टीका केली जात नव्हती. विकासाच्या मुद्यावर मते मागितली जायची. अलीकडच्या काळात प्रचाराची पातळी घसरली आहे. विकासाच्या मुद्यांवर मते मागण्याऐवजी धर्माच्या नावाने राजकारणाचे ध्रुवीकरण केले जात आहे, हे क्लेशकारक आहे. सत्ताधारी जेव्हा मैदानात उतरतात, तेव्हा मतदारांना दिलेल्या आश्वासनांची त्यांनी किती पूर्तता केली. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांसाठी काय केले, याचा हिशेब देत नाहीत. 

सध्या देशभरातील प्रचार बघितला, तर फक्त पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांवर खालच्या पातळीवर टीका केली जाते. गांधी कुटुंबावर घराणेशाहीची टीका करताना विरोधकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, देशासाठी बलिदान देण्याची या कुटुंबाची परंपरा आहे. देशाने इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार दिलेला आहे. याचा अर्थ ते या देशाचे महान रत्न होते. तरीही केवळ राजकारणाच्या द्वेषापोटी त्यांच्या कुटुंबाला हिणवले जाते, ही कोणत्याही नेत्याला शोभणारी गोष्ट नाही.’

आमखास मैदानावर राजीव गांधींची सभा१९९१ च्या निवडणुकीविषयी त्यांनी सांगितले की, डॉ. रफिक झकेरिया हे उच्चविद्याविभुषित होते. ते बरीच वर्ष काँग्रेसचे मंत्री होते. त्यांचा आजही आदर आहे. निवडणुकीसाठी त्यांनी अर्ज केला होता आणि युवक काँग्रेसच्या कोट्यातून मीदेखील अर्ज केला होता. दिल्लीत आम्ही दोघेही वसंत साठे यांना भेटलो. तेव्हा त्यांनी मला उमेदवारी देण्यासाठी आश्वासित केले. त्यानंतरही डॉ. झकेरिया यांना तिकीट मिळाले, तर आम्ही सारेजण झपाटून तुमचा प्रचार करू, असे त्यांना बोललो होतो. मात्र, आपल्याला उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनी नाराजीतून जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढली. माझ्या प्रचारासाठी खुद्द राजीव गांधी या शहरात आले आणि आमखास मैदानावर त्यांनी सभा घेतली होती. मात्र, मतविभाजनामुळे पराभवाला सामोरे जावे लागले.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४