शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

१९९१ ला झकेरिया-देशमुख यांच्या मतविभागणी झाली, राजीव गांधी प्रचाराला येवूनही कॉँग्रेस पराभूत

By विजय सरवदे | Updated: May 9, 2024 16:48 IST

तेव्हाची निवडणूक आणि आताच्या निवडणुकीत फरक काय? यावर तत्कालीन कॉँग्रेस उमेदवार डॉ. मोहन देशमुख म्हणाले,

छत्रपती संभाजीनगर : ‘काँग्रेसचे तत्कालीन मंत्री डॉ. रफिक झकेरिया यांना राज्यसभेवर घेण्याचे आश्वासन देऊन पक्षश्रेष्ठींनी १९९१च्या निवडणुकीत महाराष्ट्रात युवक काँग्रेसच्या कोट्यातून एकमेव औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आपल्याला उमेदवारी दिली. खरंतर ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज होऊन त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. आमच्या दोघांत मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाल्यामुळेच आपला पराभव झाला. अन्यथा, या जागेवर आपला विजय निश्चित होता,’ अशी आठवण डॉ. मोहन देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितली.

तेव्हाची निवडणूक आणि आताच्या निवडणुकीत फरक काय? यावर डॉ. देशमुख म्हणाले, ‘तेव्हाच्या निवडणुकीत पक्षनेतृत्व किंवा उमेदवारांवर वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्वरूपाची टीका केली जात नव्हती. विकासाच्या मुद्यावर मते मागितली जायची. अलीकडच्या काळात प्रचाराची पातळी घसरली आहे. विकासाच्या मुद्यांवर मते मागण्याऐवजी धर्माच्या नावाने राजकारणाचे ध्रुवीकरण केले जात आहे, हे क्लेशकारक आहे. सत्ताधारी जेव्हा मैदानात उतरतात, तेव्हा मतदारांना दिलेल्या आश्वासनांची त्यांनी किती पूर्तता केली. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांसाठी काय केले, याचा हिशेब देत नाहीत. 

सध्या देशभरातील प्रचार बघितला, तर फक्त पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांवर खालच्या पातळीवर टीका केली जाते. गांधी कुटुंबावर घराणेशाहीची टीका करताना विरोधकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, देशासाठी बलिदान देण्याची या कुटुंबाची परंपरा आहे. देशाने इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार दिलेला आहे. याचा अर्थ ते या देशाचे महान रत्न होते. तरीही केवळ राजकारणाच्या द्वेषापोटी त्यांच्या कुटुंबाला हिणवले जाते, ही कोणत्याही नेत्याला शोभणारी गोष्ट नाही.’

आमखास मैदानावर राजीव गांधींची सभा१९९१ च्या निवडणुकीविषयी त्यांनी सांगितले की, डॉ. रफिक झकेरिया हे उच्चविद्याविभुषित होते. ते बरीच वर्ष काँग्रेसचे मंत्री होते. त्यांचा आजही आदर आहे. निवडणुकीसाठी त्यांनी अर्ज केला होता आणि युवक काँग्रेसच्या कोट्यातून मीदेखील अर्ज केला होता. दिल्लीत आम्ही दोघेही वसंत साठे यांना भेटलो. तेव्हा त्यांनी मला उमेदवारी देण्यासाठी आश्वासित केले. त्यानंतरही डॉ. झकेरिया यांना तिकीट मिळाले, तर आम्ही सारेजण झपाटून तुमचा प्रचार करू, असे त्यांना बोललो होतो. मात्र, आपल्याला उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनी नाराजीतून जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढली. माझ्या प्रचारासाठी खुद्द राजीव गांधी या शहरात आले आणि आमखास मैदानावर त्यांनी सभा घेतली होती. मात्र, मतविभाजनामुळे पराभवाला सामोरे जावे लागले.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४