शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

१९९१ ला झकेरिया-देशमुख यांच्या मतविभागणी झाली, राजीव गांधी प्रचाराला येवूनही कॉँग्रेस पराभूत

By विजय सरवदे | Updated: May 9, 2024 16:48 IST

तेव्हाची निवडणूक आणि आताच्या निवडणुकीत फरक काय? यावर तत्कालीन कॉँग्रेस उमेदवार डॉ. मोहन देशमुख म्हणाले,

छत्रपती संभाजीनगर : ‘काँग्रेसचे तत्कालीन मंत्री डॉ. रफिक झकेरिया यांना राज्यसभेवर घेण्याचे आश्वासन देऊन पक्षश्रेष्ठींनी १९९१च्या निवडणुकीत महाराष्ट्रात युवक काँग्रेसच्या कोट्यातून एकमेव औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आपल्याला उमेदवारी दिली. खरंतर ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज होऊन त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. आमच्या दोघांत मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाल्यामुळेच आपला पराभव झाला. अन्यथा, या जागेवर आपला विजय निश्चित होता,’ अशी आठवण डॉ. मोहन देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितली.

तेव्हाची निवडणूक आणि आताच्या निवडणुकीत फरक काय? यावर डॉ. देशमुख म्हणाले, ‘तेव्हाच्या निवडणुकीत पक्षनेतृत्व किंवा उमेदवारांवर वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्वरूपाची टीका केली जात नव्हती. विकासाच्या मुद्यावर मते मागितली जायची. अलीकडच्या काळात प्रचाराची पातळी घसरली आहे. विकासाच्या मुद्यांवर मते मागण्याऐवजी धर्माच्या नावाने राजकारणाचे ध्रुवीकरण केले जात आहे, हे क्लेशकारक आहे. सत्ताधारी जेव्हा मैदानात उतरतात, तेव्हा मतदारांना दिलेल्या आश्वासनांची त्यांनी किती पूर्तता केली. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांसाठी काय केले, याचा हिशेब देत नाहीत. 

सध्या देशभरातील प्रचार बघितला, तर फक्त पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांवर खालच्या पातळीवर टीका केली जाते. गांधी कुटुंबावर घराणेशाहीची टीका करताना विरोधकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, देशासाठी बलिदान देण्याची या कुटुंबाची परंपरा आहे. देशाने इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार दिलेला आहे. याचा अर्थ ते या देशाचे महान रत्न होते. तरीही केवळ राजकारणाच्या द्वेषापोटी त्यांच्या कुटुंबाला हिणवले जाते, ही कोणत्याही नेत्याला शोभणारी गोष्ट नाही.’

आमखास मैदानावर राजीव गांधींची सभा१९९१ च्या निवडणुकीविषयी त्यांनी सांगितले की, डॉ. रफिक झकेरिया हे उच्चविद्याविभुषित होते. ते बरीच वर्ष काँग्रेसचे मंत्री होते. त्यांचा आजही आदर आहे. निवडणुकीसाठी त्यांनी अर्ज केला होता आणि युवक काँग्रेसच्या कोट्यातून मीदेखील अर्ज केला होता. दिल्लीत आम्ही दोघेही वसंत साठे यांना भेटलो. तेव्हा त्यांनी मला उमेदवारी देण्यासाठी आश्वासित केले. त्यानंतरही डॉ. झकेरिया यांना तिकीट मिळाले, तर आम्ही सारेजण झपाटून तुमचा प्रचार करू, असे त्यांना बोललो होतो. मात्र, आपल्याला उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनी नाराजीतून जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढली. माझ्या प्रचारासाठी खुद्द राजीव गांधी या शहरात आले आणि आमखास मैदानावर त्यांनी सभा घेतली होती. मात्र, मतविभाजनामुळे पराभवाला सामोरे जावे लागले.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४