शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

Raj Thackeray: डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेलं ते वाक्य खूप अप्रतिम; राज ठाकरेंनी सांगितला महाराजांचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 20:43 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही शिवाजी महाराजांबद्दल काय म्हटले होते, ते सांगितलं. 

मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरेंच्याऔरंगाबाद येथील सभेची गेल्या 10 दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती. अखेर, आज सायंकाळी 7 वाजता राज यांनी औरंगाबादेतील सांस्कृतिक मैदानात एंट्री करताच एकच जल्लोष झाला. मोठ्या संख्येने लोक सभा ऐकायला उपस्थित होते. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो... म्हणत राज यांनी सभेची सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातालीच त्यांनी, जो इतिहास विसरतो त्याच्या पायाखालचा भुगोल सरकतो, असे म्हणत शिवाजी महाराजांच्या काळातील, एकनाथ महाराजांच्या काळातील ऐतिहासिक दाखले दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही शिवाजी महाराजांबद्दल काय म्हटले होते, ते सांगितलं. 

मशिदींवरील भोंग्याचा विषय राज यांनी उचलून धरला होता त्यावरुन, गेल्या 10 दिवसांपासून राज ठाकरेंवर टिका करणाऱ्यांना काय प्रत्युत्तर मिळणार, राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगाबाद यांच्या इतिहासाची उजळणी औरंगाबादच्या सभेत केली. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब 27 वर्षे स्वत:लाच छळल्यासारखं वाटून घेत होता. शिवाजी हा एक विचार होता, हे औरंगजेबाला कळलं होतं, असेही राज ठाकरे म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच एक वाक्य खूप अप्रतिम आहे. आपल्या लोकांच्या अंगात देवी येते, देव येतो, भुतं येतात. बाबासाहेब म्हणाले होते की, ज्यादिवशी शिवाजी नावाचं भूत अंगात येईल, तेव्हा जग पादाक्रांत करू..., असं सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांचं बाबासाहेबांनी सांगितलं होतं, असा इतिहास राज ठाकरेंनी सांगितला. राज यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर हल्लाबोल केला. शरद पवार हे नास्तिक आहेत हे मी म्हटलं, पण ते तर त्यांच्याच कन्येनं लोकसभेत सांगितलं होतं, असा पलटवार राज यांनी राष्ट्रवादीवर केला. मी आज शरद पवार यांच्यासाठी काही संदर्भ आणलेत, असेही राज यांनी म्हटलं.   

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबादSharad Pawarशरद पवारShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज