शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

राज ठाकरेंनी ‘व्हिजन’ दाखविलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:42 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी ‘औरंगाबाद व्हिजन’ या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील जाणकारांशी संवाद साधला; परंतु प्रत्यक्षात राज ठाकरेंनी औरंगाबादसाठी कोणतेही व्हिजन दाखविले नाही. औरंगाबादच्या विकासासाठी त्यांनी केवळ नाशिककडे बोट दाखविले. नाशिक महापालिकेत पाच वर्षे सत्तेत असताना केलेल्या कामांचाच त्यांनी ढोल वाजविला. मात्र, औरंगाबादेतील परिस्थितीसंदर्भात ते आस्थेवाईकपणे आणि अत्यंत तळमळीने बोलताना दिसले.

ठळक मुद्देऔरंगाबादला समोर ठेवून नाशिककडे बोट : शहरातील विविध क्षेत्रांतील जाणकारांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी ‘औरंगाबाद व्हिजन’ या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील जाणकारांशी संवाद साधला; परंतु प्रत्यक्षात राज ठाकरेंनी औरंगाबादसाठी कोणतेही व्हिजन दाखविले नाही. औरंगाबादच्या विकासासाठी त्यांनी केवळ नाशिककडे बोट दाखविले. नाशिक महापालिकेत पाच वर्षे सत्तेत असताना केलेल्या कामांचाच त्यांनी ढोल वाजविला. मात्र, औरंगाबादेतील परिस्थितीसंदर्भात ते आस्थेवाईकपणे आणि अत्यंत तळमळीने बोलताना दिसले.शहरातील रेल्वेस्टेशन रोडवरील एका हॉटेलमध्ये सायंकाळी ६ वाजता ‘औरंगाबाद व्हिजन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी वकील, डॉक्टर व उद्योजक, अशा विविध क्षेत्रांतील २०० लोकांना निमंत्रित करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने शहराच्या ब्ल्यू प्रिंटसंदर्भात चर्चा होणार असल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले होते. त्यामुळे सभागृह गर्दीने खचाखच भरले होते. कार्यक्रमास अतुल कराड, ‘आयएमए’चे डॉ. यशवंत गाडे, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे रावसाहेब खेडकर, लघुउद्योजक प्रमोद झाल्टे, सारंग टाकळकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात नाशिक महापालिकेत पाच वर्षे सत्तेत असताना केलेल्या कामांची चित्रफीत दाखविण्यात आली. त्यानंतर शहरातील पाणी, कचरा, रस्ते यासह शहरातील समस्यांवर जाणकरांनी मनोगतातून प्रकाश टाकला.राज ठाकरे यांनी मार्गदर्शनाची सुरुवातच नाशिकपासून केली. एखादे शहर असे घडू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक असल्याचे ते म्हणाले. पूर आला तरी खड्डे सापडले नाहीत. नाशिकमध्ये पुढची ५० वर्षे पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही, कचऱ्याचा प्रश्न निकाली काढला. अडीच वर्षे मनपात आयुक्त नव्हते, तरीही मनपा चालविली, असे ते म्हणाले. औरंगाबादेतील लोकप्रतिनिधींना जनतेची भीतीच उरली नाही. त्यांच्या घाबरवण्याला लोक बळी पडतात. राजकारण करणाºयांना ते त्यांची जागा दाखवीत नाहीत, तोपर्यंत विकास, प्रगती होऊ शकत नाही. व्हिजन दाखविण्यापेक्षा डोळे उघडून पाहा, कानावरचे हात काढा, असा सल्ला राज ठाकरेंनी उपस्थितांना दिला.शहरातील कचराकोंडी, खड्डेमय रस्ते, पाण्याचा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपकडून निराशा झाल्याने कार्यक्रमातून औरंगाबादचे व्हिजन मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु फार काही साध्य झाले नसल्याने निराशा झाल्याचा सूर कार्यक्रमास निमंत्रित केलेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केला.अजिंठा-वेरूळ लेणींसारखे वैभवपरदेशांत छोट्या-छोट्या शिल्पांचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातो. जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणींसारखे वैभव राज्यात औरंगाबादशिवाय अन्य राज्याला मिळालेले नाही. या ऐतिहासिक शहराची अशी अवस्था झालेली आहे. या लेणींमुळे जगभरातील विमाने औरंगाबादेत आली पाहिजे. या लेणी हजारो कोटी रुपये कमवून देतील; परंतु कोणालीही देणे-घेणे नसल्याची खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.स्वच्छ, सुरक्षित शहर देऊऔरंगाबादेत नागरिकांनाच बदल घडवावा लागेल. शहराचा विकास ज्यांच्याकडून शक्य आहे, त्यांना संधी देऊन पाहा. स्वच्छ आणि सुरक्षित शहर मनसे देईल, असे संकेत औरंगाबाद व्हिजन कार्यक्रमात बोलताना राज ठाकरेंनी दिले.महाराष्ट्रातून मुली बेपत्तामहाराष्ट्रातून मुली पळविण्याचा प्रकार सुरू आहे. अनेक मुली सापडत नाहीत. आई-वडील शोध घेत आहेत. मराठवाड्यातूनही मुली बेपत्ता आाहेत. त्यांचे काय झाले, याचे उत्तर नाही. यात सरकार दोषी आहे, असे राज ठाकरे म्हणाले.माजी महापौर सुदाम सोनवणे मनसेच्या वाटेवरमाजी महापौर तथा नारायण राणेंचे कट्टर समर्थक सुदाम सोनवणे यांनी गुरुवारी राज ठाकरे यांची भेट घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करण्यावर चर्चा केली. लवकरच जाहीर कार्यक्रमात ते मनसेत प्रवेश करणार आहेत. सुदाम सोनवणे यांच्यासह शिवसेना आणि भाजपच्या काही पदाधिकाºयांनीही नव्या उमेदीने मनसेची वाट धरली आहे.राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौºयात पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. दोन दिवसांपासून या सोहळ्यातून कोण-कोण मनसेच्या वाटेवर जाणार, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. सिडको-हडको परिसरात राजकीय वर्तुळात सर्वाधिक सक्रिय असलेले सुदाम सोनवणे हे मनसेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी राज ठाकरेंची भेट घेऊन त्यावर अखेर शिक्कामोर्तब केले. शिवसेनेचे माजी महापौर राहिलेले सोनवणे यांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते मनसेत प्रवेश करणार आहेत.हल्ला परप्रांतीयांकडूनवाळूज एमआयडीसीतील बंददरम्यान कंपन्यांवर हल्ला करणारे हे परप्रांतीय होते. मराठा क्रांती मोर्चाचे कोणीही नव्हते. ज्या आंदोलनाला नेतृत्व नाही, त्याला बदनाम केले जात असल्याचेही ठाकरे म्हणाले.काय करता येईल, विचार करागणपतीच्या वेळी शहरात पुन्हा येणार आहे. औरंगाबादसाठी काम केले जाईल. काय-काय करता येईल, सर्वांनी सुचवावे, असे राज ठाकरे कार्यक्रमात म्हणाले. त्यावर अनेकांनी पुन्हा काही नव्याने सूचना केल्या.सनातनवरील लक्ष हटविण्याचा प्रयत्नडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामुळे सनातनवर बंदीची मागणी होत असल्याविषयी राज ठाकरे म्हणाले की, कोणाच्या घरी शस्त्र सापडले, याचे राजकारण करता कामा नये; परंतु याचे सत्ताधारी आणि विरोधकांना राजकारण हवे. कोरेगाव-भीमाप्रकरणी कम्युनिस्टांना उचलण्यात आले; परंतु हा सगळा प्रकार सनातनवर सध्या असलेले लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी होत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत ठाकरेंनी केला.पक्षाचा कार्यक्रम नव्हताअतुल कराड हे मला भेटायला आले होते. त्यांनी शहरासाठी बोलावे, असे म्हटले. त्यामुळे मी आल्याचे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे हा कार्यक्रम पक्षाचा नव्हता. मात्र, संयोजक कोण होते आणि कोणी रसद पुरविली, हे कळू शकले नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRaj Thackerayराज ठाकरे