शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

‘राज’दरबार सुनासुना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:09 IST

खचाखच भरलेल्या जाहीर सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत भाजपचे वस्त्रहरण करणाऱ्या राज ठाकरेंना आज औरंगाबादेत रिकाम्या खुर्च्यांना सामोरे जावे लागले आणि गर्दीची सवय असल्याने अक्षरश: वैतागून त्यांनी दीड मिनिटात व्यासपीठ सोडले.

सुधीर महाजनखचाखच भरलेल्या जाहीर सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत भाजपचे वस्त्रहरण करणाऱ्या राज ठाकरेंना आज औरंगाबादेत रिकाम्या खुर्च्यांना सामोरे जावे लागले आणि गर्दीची सवय असल्याने अक्षरश: वैतागून त्यांनी दीड मिनिटात व्यासपीठ सोडले. मनसेच्या औरंगाबादमधील पहिल्यावहिल्या शिक्षक मेळाव्याने राज ठाकरेंच्या उत्साहावर पाणी ओतले. राज ठाकरे औरंगाबादेत चार दिवसांच्या दौºयावर आले होते; पण त्यांनी दोन दिवसांतच तो आवरता घेतला आणि आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पाणी पाजण्याचे त्यांचे मनसुबे उधळले गेले.काल कार्यकर्त्यांशी भेटीगाठी आणि चर्चेनंतर आज मेळावा आयोजित केला होता आणि १५/२० हजारांची गर्दी जमवण्याचा प्रयत्न होता; पण दीड दोनशे लोकांची उपस्थिती पाहून राज ठाकरे निघून गेले. राज ठाकरे पुन्हा एकदा भगवा खांद्यावर घेऊन हिंदुत्वाचा जागर करीत मैदानात उतरले आहेत. रा. स्व. संघ, भाजप आणि शिवसेना यांच्या हिंदुत्वाने व्यापलेल्या या मैदानात तशी राज यांच्यासाठी फारशी जागा नाही, तरी अंग चोरत त्यांनी तेथे घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सेनेकडून रिकामी होणारी जागा अपेक्षित आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या संगतीने संसार मांडलेल्या सेनेचे हिंदुत्व पातळ झाले असा हिंदुत्ववाद्यांबरोबर राज यांचाही समज झालेला दिसतो, म्हणून आज आपला झेंडा बदलून पुन्हा एकदा हिंदुत्वाचा जयघोष करीत ते इकडे वळले, ते भाजपच्या वळचणीला जाण्यासाठी.या पार्श्वभूमीवर सेनेला कोंडीत पकडण्यासाठी त्यांनी औरंगाबाद निवडले, कारण येथे महानगरपालिका निवडणूक तोंडावर आहे. गेल्या ३० वर्षांपासून सेनेचे वर्चस्व या शहरावर आहे; परंतु नागरी सुविधांच्या अभावामुळे जनता त्रस्त झाली असून, ती हिंदुत्वाला पर्याय म्हणून भाजपला जवळ करील असे गणित मांडले जाते आणि याच समीकरणाच्या आधारावर सेनेच्या विरोधात भाजपचा हात धरून राज यांच्या मनसेला येथे उतरायचे आहे. यासाठी औरंगाबाद त्यांना ‘फर्टाईल ग्राऊंड’ दिसते. शिवसेनेविरुद्धच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या हिंदुत्वाचे पीक येथे बहरू शकते, असा त्यांचा होरा दिसतो. म्हणूनच त्यांचा चार दिवसांच्या भरगच्च दौºयाचा कार्यक्रम घेऊन ते औरंगाबादेत डेरेदाखल झाले; पण कसाबसा दोन दिवस दम धरून मुंबईला परतले. दौरा आकसल्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा हिरमोड झाला.या दोन दिवसांच्या दौºयाने काय साधले याचाही हिशेब मांडला पाहिजेच. राज यांचे स्वागत उत्साहात झाले. गर्दी जमली, दुसºया दिवशी कार्यकर्त्यांशी चर्चा, मार्गदर्शन असा भरगच्च कार्यक्रम होता; पण तो पाऊणतासातच गुंडाळला गेला. पत्रकारांशी झालेल्या संवादातही मनसेच्या ठोस कार्यक्रमाचा आणि धोरणाचा उलगडा झाला नाही. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील नारांजांचा ओघ मनसेकडे येईल हा त्यांचा अंदाजही सपशेल कोसळला. सेनेच्या एकाही दिग्गजाला ते आपल्या तंबूत आणू शकले नाहीत आणि दुसºया दिवशी त्यांच्या मुक्कामस्थळी फारशी गर्दीही नव्हती. एकूणच इथले वातावरण त्यांना रुजणारे, मानवणारे नव्हते. जाताना त्यांनी ‘औरंगाबाद-संभाजीनगर या शिळ्या कढीलाच ऊत आणला. आता हे इतके गुळगुळीत झाले की, हा निवडणुकीचा मुद्दाच होऊ शकत नाही. राज ठाकरेंच्या गळाला तीन कार्यकर्ते लागले. त्यात शिवसेनेचे एकेकाळचे शहर प्रमुख सुहास दाशरथे हे एकच नाव महत्त्वाचे दिसते. दुसरे प्रकाश महाजन आणि तिसरे हर्षवर्धन जाधव. जे की, मनसेचे पहिले आमदार होते. पुढे ते शिवसेनेत गेले. सेनेतून बाहेर पडत स्वत:चा पक्ष काढला. लोकसभा आणि विधानसभेत पराभूत होत पुन्हा मनसेच्या वाटेवर आले. पक्ष संघटना बांधण्यासाठी यापैकी दाशरथेंचीच उपयुक्तता दिसते. एक तर शिवसेनेच्या पहिल्या फळीतील आणि संघटनेचा आधार असलेले ते कार्यकर्ते आहेत. सेनेतून इकडे नव्या पक्षात तेच काय कार्यकर्त्यांना वळवू शकतात. प्रकाश महाजनांकडे ते कौशल्य नाही आणि हर्षवर्धन यांच्या विश्वासार्हतेचाच प्रश्न आहे. अशा तोकड्या फौजफाट्यावर राज ठाकरेंचा येथे शिवसेनेला शह देण्याचा इरादा आहे. शहरात, जिल्ह्यात पक्ष संघटना नाही, कार्यकर्ते नाहीत आणि आश्रयदाताही नाही, अशी परिस्थिती आहे.राज ठाकरे चार दिवस थांबतील, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवतील, इकडे येण्याचा विचार करणाऱ्यांना आशादायक वातावरणाचा दिलासा देतील, असा अनेकांचा होरा होता; पण ते दोन दिवसातच निघून गेल्यामुळे ‘मनसे’चे वातावरणच तयार झाले नाही. सेनेच्या कारभाराला नागरिक कंटाळले असा एक शिवसेनाविरोधी सूर भाजप व तत्सम पक्षांकडून आळवला जातो. तसे सध्या तरी दिसत नाही. उलटपक्षी गजानन बारवाल यांच्यासारखी सेनेतून भाजपमध्ये गेलेली मंडळी परतीच्या वाटेवर आहेत. त्यात किशनचंद तनवानींचेही नाव घेतले जाते. शहराची नाडी ओळखणारे हे राजकारणी आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या या हालचाली वेगळेच काही दर्शवितात. अशा पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा मुख्य गाभा समाज परिवर्तनाचा असतो. या कीर्तनाला अलोट गर्दी उलटते, म्हणजे समाज परिवर्तन झाले असे जसे म्हणता येणार नाही, तद्वतच राज ठाकरेंचे आहे. त्यांच्या भाषणात गर्दी खेचण्याची ताकद आहे; पण ‘मनसे’ बाळसे धरत नाही, म्हणूनच संघ, भाजप, शिवसेनेच्या ‘हिंदुत्वाचा चौथा कोन’ मनसे कशी बनणार, हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाRaj Thackerayराज ठाकरे