शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

आंदोलनावेळी उंचावलेले हात आता सरसावले मदतीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:02 IST

औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या वेळी उंचावलेले हात आता मदतीसाठी पुढे आल्याचे चित्र शुक्रवारी दिसले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पूरग्रस्त ...

औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या वेळी उंचावलेले हात आता मदतीसाठी पुढे आल्याचे चित्र शुक्रवारी दिसले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पूरग्रस्त खंडोबाजी पाली (जि. सातारा) येथील गावकऱ्यांसाठी अन्नधान्य, साड्या, पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट आणि अन्य जीवनावश्यक अशा ट्रकभर वस्तू मदत म्हणून औरंगाबादमधून रवाना करण्यात आल्या.

सातारा जिल्ह्यातील खंडोबाजी पाली गाव तीन दिवस पुराच्या पाण्याखाली होते. यामुळे या गावातील रहिवाशांचे अन्नधान्य, कपडे आणि अन्य सर्व वस्तू तसेच शेतीचे नुकसान झाले. या गावातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबादेतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी संपर्क साधून गावाला मदतीची आवश्यकता असल्याचे सांगितले. यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीन दिवसांपासून तातडीने मदत जमा करण्यास सुरुवात केली. आज टीव्ही सेंटर येथे सर्व वस्तू जमा करून एका ट्रकमधून पाठविण्यात आल्या.

तीन दिवसांच्या कालावधीत कार्यकर्त्यांनी ९०० किलो गव्हाचे पीठ, २ हजार किलो गहू, १०० किलो चिवडा, २०० क्विंटल बाजरी, ज्वारी, एक हजार किलो तांदूळ, ५० किलो पोहे, ५० लिटर खाद्यतेल, ५० बॉक्स बिस्कीट, ३५० ब्लँकेट, ३५० साड्या, २०० नग सॅनिटायझर, नॅपकीन आदी साहित्य जमा केले. ही मदत जमा करण्यासाठी सुरेश वाकडे, अभिजीत देशमुख, सतीश वेताळ, मनोज गायके, सुनील कोटकर, अजय गंडे, रेखा वाहटुळे, योगेश औताडे, निलेश ढवळे, प्रदीप हरदे, मंगेश शिंदे, अंकत चव्हाण, विलास औताडे, संजय जाधव, गोरख औताडे, नितीन पाटील, अरुण नवले, संदीप जाधव, नंदू गरड, रोहित तरटे आदींनी पुढाकार घेतला.

कॅप्शन.. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी ट्रकभर वस्तू रवाना करताना कार्यकर्ते.