शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

आंदोलनावेळी उंचावलेले हात आता सरसावले मदतीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:02 IST

औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या वेळी उंचावलेले हात आता मदतीसाठी पुढे आल्याचे चित्र शुक्रवारी दिसले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पूरग्रस्त ...

औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या वेळी उंचावलेले हात आता मदतीसाठी पुढे आल्याचे चित्र शुक्रवारी दिसले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पूरग्रस्त खंडोबाजी पाली (जि. सातारा) येथील गावकऱ्यांसाठी अन्नधान्य, साड्या, पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट आणि अन्य जीवनावश्यक अशा ट्रकभर वस्तू मदत म्हणून औरंगाबादमधून रवाना करण्यात आल्या.

सातारा जिल्ह्यातील खंडोबाजी पाली गाव तीन दिवस पुराच्या पाण्याखाली होते. यामुळे या गावातील रहिवाशांचे अन्नधान्य, कपडे आणि अन्य सर्व वस्तू तसेच शेतीचे नुकसान झाले. या गावातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबादेतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी संपर्क साधून गावाला मदतीची आवश्यकता असल्याचे सांगितले. यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीन दिवसांपासून तातडीने मदत जमा करण्यास सुरुवात केली. आज टीव्ही सेंटर येथे सर्व वस्तू जमा करून एका ट्रकमधून पाठविण्यात आल्या.

तीन दिवसांच्या कालावधीत कार्यकर्त्यांनी ९०० किलो गव्हाचे पीठ, २ हजार किलो गहू, १०० किलो चिवडा, २०० क्विंटल बाजरी, ज्वारी, एक हजार किलो तांदूळ, ५० किलो पोहे, ५० लिटर खाद्यतेल, ५० बॉक्स बिस्कीट, ३५० ब्लँकेट, ३५० साड्या, २०० नग सॅनिटायझर, नॅपकीन आदी साहित्य जमा केले. ही मदत जमा करण्यासाठी सुरेश वाकडे, अभिजीत देशमुख, सतीश वेताळ, मनोज गायके, सुनील कोटकर, अजय गंडे, रेखा वाहटुळे, योगेश औताडे, निलेश ढवळे, प्रदीप हरदे, मंगेश शिंदे, अंकत चव्हाण, विलास औताडे, संजय जाधव, गोरख औताडे, नितीन पाटील, अरुण नवले, संदीप जाधव, नंदू गरड, रोहित तरटे आदींनी पुढाकार घेतला.

कॅप्शन.. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी ट्रकभर वस्तू रवाना करताना कार्यकर्ते.