शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

आंदोलनावेळी उंचावलेले हात आता सरसावले मदतीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:02 IST

औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या वेळी उंचावलेले हात आता मदतीसाठी पुढे आल्याचे चित्र शुक्रवारी दिसले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पूरग्रस्त ...

औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या वेळी उंचावलेले हात आता मदतीसाठी पुढे आल्याचे चित्र शुक्रवारी दिसले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पूरग्रस्त खंडोबाजी पाली (जि. सातारा) येथील गावकऱ्यांसाठी अन्नधान्य, साड्या, पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट आणि अन्य जीवनावश्यक अशा ट्रकभर वस्तू मदत म्हणून औरंगाबादमधून रवाना करण्यात आल्या.

सातारा जिल्ह्यातील खंडोबाजी पाली गाव तीन दिवस पुराच्या पाण्याखाली होते. यामुळे या गावातील रहिवाशांचे अन्नधान्य, कपडे आणि अन्य सर्व वस्तू तसेच शेतीचे नुकसान झाले. या गावातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबादेतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी संपर्क साधून गावाला मदतीची आवश्यकता असल्याचे सांगितले. यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीन दिवसांपासून तातडीने मदत जमा करण्यास सुरुवात केली. आज टीव्ही सेंटर येथे सर्व वस्तू जमा करून एका ट्रकमधून पाठविण्यात आल्या.

तीन दिवसांच्या कालावधीत कार्यकर्त्यांनी ९०० किलो गव्हाचे पीठ, २ हजार किलो गहू, १०० किलो चिवडा, २०० क्विंटल बाजरी, ज्वारी, एक हजार किलो तांदूळ, ५० किलो पोहे, ५० लिटर खाद्यतेल, ५० बॉक्स बिस्कीट, ३५० ब्लँकेट, ३५० साड्या, २०० नग सॅनिटायझर, नॅपकीन आदी साहित्य जमा केले. ही मदत जमा करण्यासाठी सुरेश वाकडे, अभिजीत देशमुख, सतीश वेताळ, मनोज गायके, सुनील कोटकर, अजय गंडे, रेखा वाहटुळे, योगेश औताडे, निलेश ढवळे, प्रदीप हरदे, मंगेश शिंदे, अंकत चव्हाण, विलास औताडे, संजय जाधव, गोरख औताडे, नितीन पाटील, अरुण नवले, संदीप जाधव, नंदू गरड, रोहित तरटे आदींनी पुढाकार घेतला.

कॅप्शन.. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी ट्रकभर वस्तू रवाना करताना कार्यकर्ते.