शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे वाढतोय कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 15:26 IST

रेन वॉटर हार्वेस्टिंगची मागील काही वर्षांपासून  सक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांत ५ हजार ७२५ बांधकाम परवानग्याभोगवटा प्रमाणपत्र घेतले २ हजार ६५ जणांनीच

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : मराठवाड्याच्या राजधानीचे शहर झपाट्याने वाढू लागले आहे. शेतीच्या जागेवर सर्रासपणे सिमेंटची जंगले उभी राहत आहेत. जमिनीत पाणी मुरण्यासाठी जागाच शिल्लक ठेवली जात नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंगची मागील काही वर्षांपासून  सक्ती करण्यात आली आहे. ज्या बांधकाम व्यावसायिकाला भोगवटा प्रमाणपत्र हवे असते तोच हार्वेस्टिंगची यंत्रणा उभी करतो; अन्यथा ७५ टक्के नागरिक याकडे दुर्लक्ष करतात.

मागील पाच वर्षांमध्ये औरंगाबाद महापालिकेने तब्बल ५ हजार ७२५ बांधकाम परवानग्या दिल्या. बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर सर्वसामान्य नागरिक, बांधकाम व्यावसायिक सहसा मनपाकडे वळूनही बघत नाही. कारण अगोदरच त्याचा एवढा छळ झालेला असतो की, तो परत भोगवटा प्रमाणपत्र घेण्यास येत नाही. २०१४ ते २०१९ पर्यंत २ हजारांहून अधिक नागरिक, व्यावसायिकांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले. प्रत्येकाला रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती करण्यात आली. मनपाचे कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंत्यांकडून याची जागेवर जाऊन पडताळणी करण्यात येते. त्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येते. कागदावर हार्वेस्टिंग उभारण्याचा प्रकार नाही. अनेक नागरिकांनी स्वत:च्या इच्छेने आपल्या विंधन विहिरींसाठी ही यंत्रणा उभारली आहे. 

पाच वर्षांतील बांधकाम परवाने आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग2014-15१,१८५ बांधकाम परवाने दिले, त्यातील ३४० जणांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले.2015-16१,०५० परवाने दिले. ३७० जणांनी हार्वेस्टिंगसह भोगवटा घेतले.2016-17१,२६० बांधकाम परवाने. ३९० जणांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले.2017-18१,१९० बांधकाम परवानगी तर ४८० जणांनी हार्वेस्टिंगनंतर प्रमाणपत्र दिले.2018-19१,०४० परवानगी घेतली. ४८५ जणांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले. 

असे केले जाते जल पुनर्भरणपावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) म्हणजे पुनर्वापरासाठी पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्या छतावरून जमिनीखालच्या एका मोठ्या टाकीमध्ये गोळा करतात, तर काही ठिकाणी साठवायचे पाणी खोल खड्डा करून जमिनीत सोडण्यात येते. ज्याठिकाणी पाणी मुरते तेथे जवळपास विंधन विहीर असल्यास उन्हाळ्यातही पाणी कमी होत नाही. आपण साठवलेले पाणी निसर्ग आपल्याला परत देतो. जमिनीची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे, हे विशेष.

जल पुनर्भरणाचे हे आहेत फायदेपाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते. जलसंधारणामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते.जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, पाणी वर खेचण्यासाठी लागणाऱ्या विजेच्या वापरात बचत होते. जमिनीखालील पाण्याच्या प्रदूषणाचे सौम्यीकरण झाल्यामुळे पाण्याचा दर्जादेखील सुधारतो. जमिनीची धूप रोखण्यास काही प्रमाणात मदत होते.गच्चीवरील पाणी जमा करण्याची पद्धती खूपच सोपी आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगवर केला जाणारा खर्च, हा खर्च नसून ती भविष्यकाळाची गुंतवणूकच आहे. स्वत:साठी हे करावे. निसर्गात स्वच्छ आणि गोड्या पाण्याची कमतरता असल्यामुळे अधिक गोड्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. आज पर्यावरणाची परिस्थिती पाहता, भूगर्भातील पाणी संपायलाही फारसा वेळ लागणार नाही. तेव्हा पावसाचे पाणी हे निसर्गाने दिलेले दान समजून त्याचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे.

सक्तीमुळे जनजागृती होत आहे मागील काही वर्षांपासून हार्वेस्टिंगची सक्ती करण्यात येत असल्याने जनजागृती होत आहे. ज्या नागरिकांनी हार्वेस्टिंग केले त्यांना रिझल्टही दिसू लागला. जमिनित पाणी मुरविणे ही आता काळाची गरज बनली आहे. शहरात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण प्रचंड आहे. त्यावर नियंत्रण मिळविले तर बरेच कही साध्य होईल. खुल्या जागांवर पेव्हर ब्लॉक, सिमेंटीकरण करायला नको. पाणी मुरण्यासाठी जागाच ठेवली नाही. - ए.बी. देशमुख, उपअभियंता, मनपा

महापालिकेने स्वत:ही केलेरेन वॉटर हार्वेस्टिंगविषयी जनजागृती व्हावी यासाठी मनपाने स् वत:च्या इमारतीवर सर्वात अगोदर हा प्रयोग केलेला आहे. बांधकामाचा भोगवटा देताना हार्वेस्टिंग पाहूनच प्रमाणपत्र दिले जाते. शहरात २० ते २२ हजार ठिकाणी हार्वेस्टिंग आहे. नागरिकांमध्ये आणखी व्यापक जनजागृतीची गरज आहे. त्यासाठी मनपाकडून जोरदार प्रयत्न करण्यात येतील. कारण ही काळाची गरज आहे. - नंदकुमार घोडेले, महापौर 

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका