शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

औरंगाबाद जिल्ह्यातून पाऊस गायब; खरीप पिकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातून पाऊस गेल्या १५ दिवसांपासून गायब झाला असून, खरीप पिके हातातून जाण्याचा धोका ...

ठळक मुद्देदुष्काळाची छाया : ५० टक्क्यांवरच सरासरी, गतवर्षीपेक्षा कमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातून पाऊस गेल्या १५ दिवसांपासून गायब झाला असून, खरीप पिके हातातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाअभावी पुन्हा एकदा जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद झाली आहे.पावसाळा संपण्यास अवघा दीड महिन्याचा कालावधी उरला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सरासरी ५० टक्के पाऊस झाला. त्यात आणखी काही दिवस पाऊस दडी मारणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गतवर्षी ९ सप्टेंबरपर्यंत ३९४.९१ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा केवळ ३४४.१२ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात अत्यल्प पाऊ स झाल्यामुळे तलाव, नदी, नाले क ोरडेठाक पडले आहेत.गत महिन्यात १५ आॅगस्टनंतर झालेल्या पावसाने पिक ांना दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा वरु णराजा रु सल्यामुळे जिल्ह्यातील पिकांवर संकट आले आहे. विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कमी पाऊस खुलताबाद तालुक्यात झाला आहे. पोळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतक ऱ्यांवर हंडाभर पाणी घेऊ न सर्जा-राजाची खांदेमळणी क रण्याची वेळ आली.जायकवाडीत गतवर्षीपेक्षा निम्मा पाणीसाठाजायकवाडी धरणातील पाणीसाठा यंदा चिंतादायक ठरणार आहे. पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही धरणात गतवर्षीपेक्षा निम्मा पाणीसाठा आहे. आजघडीला केवळ ४६ टक्के पाणीसाठा आहे.गतवर्षी ९ सप्टेंबर रोजी जायकवाडीत ८२ टक्के पाणीसाठा होता. यंदा पाणीसाठा हा ५० टक्क्यांखालीच आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. धरणाच्या लाभक्षेत्रातही पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे आगामी दीड महिन्यात धरण भरणार की नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे.आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभीच नाशिक जिल्ह्यातील पावसाने गोदावरी दुथडी भरून वाहिली आणि जायकवाडीतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास हातभार लागला होता. जायकवाडीच्या वरील धरणांमध्ये पुरेसा साठा झाल्यानंतर जायकवाडीत पाणी येण्याची शक्यता असते. लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही, असे म्हणून वरच्या धरणातून पाणी सोडण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.दैनंदिन वापराने घट१ आॅगस्ट रोजी पाणीसाठा 32.25 टक्के होता. त्यानंतर १५ आॅगस्टनंतर धरणाच्या लाभक्षेत्रात झालेल्या पावसाने पाणीपातळीत वाढ झाली; परंतु अवघ्या काही दिवसांत पाण्याची आवकही थांबली आहे. पाणीसाठ्यात १ सप्टेंबरपासून किंचितही वाढ झालेली नाही. औरंगाबादसह विविध पाणी योजनांसाठी जायकवाडीतून पाणी सोडण्यात येते. धरणात आवक थांबलेली असताना दैनंदिन पाण्याचा वापर सुरूच आहे. त्यामुळे पाणीपातळीत घट होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस