शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

औरंगाबाद जिल्ह्यातून पाऊस गायब; खरीप पिकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातून पाऊस गेल्या १५ दिवसांपासून गायब झाला असून, खरीप पिके हातातून जाण्याचा धोका ...

ठळक मुद्देदुष्काळाची छाया : ५० टक्क्यांवरच सरासरी, गतवर्षीपेक्षा कमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातून पाऊस गेल्या १५ दिवसांपासून गायब झाला असून, खरीप पिके हातातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाअभावी पुन्हा एकदा जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद झाली आहे.पावसाळा संपण्यास अवघा दीड महिन्याचा कालावधी उरला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सरासरी ५० टक्के पाऊस झाला. त्यात आणखी काही दिवस पाऊस दडी मारणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गतवर्षी ९ सप्टेंबरपर्यंत ३९४.९१ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा केवळ ३४४.१२ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात अत्यल्प पाऊ स झाल्यामुळे तलाव, नदी, नाले क ोरडेठाक पडले आहेत.गत महिन्यात १५ आॅगस्टनंतर झालेल्या पावसाने पिक ांना दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा वरु णराजा रु सल्यामुळे जिल्ह्यातील पिकांवर संकट आले आहे. विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कमी पाऊस खुलताबाद तालुक्यात झाला आहे. पोळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतक ऱ्यांवर हंडाभर पाणी घेऊ न सर्जा-राजाची खांदेमळणी क रण्याची वेळ आली.जायकवाडीत गतवर्षीपेक्षा निम्मा पाणीसाठाजायकवाडी धरणातील पाणीसाठा यंदा चिंतादायक ठरणार आहे. पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही धरणात गतवर्षीपेक्षा निम्मा पाणीसाठा आहे. आजघडीला केवळ ४६ टक्के पाणीसाठा आहे.गतवर्षी ९ सप्टेंबर रोजी जायकवाडीत ८२ टक्के पाणीसाठा होता. यंदा पाणीसाठा हा ५० टक्क्यांखालीच आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. धरणाच्या लाभक्षेत्रातही पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे आगामी दीड महिन्यात धरण भरणार की नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे.आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभीच नाशिक जिल्ह्यातील पावसाने गोदावरी दुथडी भरून वाहिली आणि जायकवाडीतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास हातभार लागला होता. जायकवाडीच्या वरील धरणांमध्ये पुरेसा साठा झाल्यानंतर जायकवाडीत पाणी येण्याची शक्यता असते. लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही, असे म्हणून वरच्या धरणातून पाणी सोडण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.दैनंदिन वापराने घट१ आॅगस्ट रोजी पाणीसाठा 32.25 टक्के होता. त्यानंतर १५ आॅगस्टनंतर धरणाच्या लाभक्षेत्रात झालेल्या पावसाने पाणीपातळीत वाढ झाली; परंतु अवघ्या काही दिवसांत पाण्याची आवकही थांबली आहे. पाणीसाठ्यात १ सप्टेंबरपासून किंचितही वाढ झालेली नाही. औरंगाबादसह विविध पाणी योजनांसाठी जायकवाडीतून पाणी सोडण्यात येते. धरणात आवक थांबलेली असताना दैनंदिन पाण्याचा वापर सुरूच आहे. त्यामुळे पाणीपातळीत घट होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस