शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

औरंगाबाद जिल्ह्यातून पाऊस गायब; खरीप पिकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातून पाऊस गेल्या १५ दिवसांपासून गायब झाला असून, खरीप पिके हातातून जाण्याचा धोका ...

ठळक मुद्देदुष्काळाची छाया : ५० टक्क्यांवरच सरासरी, गतवर्षीपेक्षा कमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातून पाऊस गेल्या १५ दिवसांपासून गायब झाला असून, खरीप पिके हातातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाअभावी पुन्हा एकदा जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद झाली आहे.पावसाळा संपण्यास अवघा दीड महिन्याचा कालावधी उरला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सरासरी ५० टक्के पाऊस झाला. त्यात आणखी काही दिवस पाऊस दडी मारणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गतवर्षी ९ सप्टेंबरपर्यंत ३९४.९१ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा केवळ ३४४.१२ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात अत्यल्प पाऊ स झाल्यामुळे तलाव, नदी, नाले क ोरडेठाक पडले आहेत.गत महिन्यात १५ आॅगस्टनंतर झालेल्या पावसाने पिक ांना दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा वरु णराजा रु सल्यामुळे जिल्ह्यातील पिकांवर संकट आले आहे. विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कमी पाऊस खुलताबाद तालुक्यात झाला आहे. पोळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतक ऱ्यांवर हंडाभर पाणी घेऊ न सर्जा-राजाची खांदेमळणी क रण्याची वेळ आली.जायकवाडीत गतवर्षीपेक्षा निम्मा पाणीसाठाजायकवाडी धरणातील पाणीसाठा यंदा चिंतादायक ठरणार आहे. पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही धरणात गतवर्षीपेक्षा निम्मा पाणीसाठा आहे. आजघडीला केवळ ४६ टक्के पाणीसाठा आहे.गतवर्षी ९ सप्टेंबर रोजी जायकवाडीत ८२ टक्के पाणीसाठा होता. यंदा पाणीसाठा हा ५० टक्क्यांखालीच आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. धरणाच्या लाभक्षेत्रातही पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे आगामी दीड महिन्यात धरण भरणार की नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे.आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभीच नाशिक जिल्ह्यातील पावसाने गोदावरी दुथडी भरून वाहिली आणि जायकवाडीतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास हातभार लागला होता. जायकवाडीच्या वरील धरणांमध्ये पुरेसा साठा झाल्यानंतर जायकवाडीत पाणी येण्याची शक्यता असते. लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही, असे म्हणून वरच्या धरणातून पाणी सोडण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.दैनंदिन वापराने घट१ आॅगस्ट रोजी पाणीसाठा 32.25 टक्के होता. त्यानंतर १५ आॅगस्टनंतर धरणाच्या लाभक्षेत्रात झालेल्या पावसाने पाणीपातळीत वाढ झाली; परंतु अवघ्या काही दिवसांत पाण्याची आवकही थांबली आहे. पाणीसाठ्यात १ सप्टेंबरपासून किंचितही वाढ झालेली नाही. औरंगाबादसह विविध पाणी योजनांसाठी जायकवाडीतून पाणी सोडण्यात येते. धरणात आवक थांबलेली असताना दैनंदिन पाण्याचा वापर सुरूच आहे. त्यामुळे पाणीपातळीत घट होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस