शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षांतील पावसाचा निच्चांक

By admin | Updated: July 21, 2014 00:35 IST

राजेश गंगमवार, बिलोली मागच्या पंचवीस वर्षांत देखील इतका कमी पाऊस झाला नव्हता, यावर्षी झाला असून ७ जून ते २० जुलै या दीड महिन्यात केवळ ७० मि़मी़ पाऊस झाला आहे़

राजेश गंगमवार, बिलोलीमागच्या पंचवीस वर्षांत देखील इतका कमी पाऊस झाला नव्हता, यावर्षी झाला असून ७ जून ते २० जुलै या दीड महिन्यात केवळ ७० मि़मी़ पाऊस झाला आहे़ दरम्यान, गतवर्षी अवघ्या दीड महिन्यांत ४२० मि़मी़ पाऊस झाला होता़ तालुक्यात दुबार पेरण्यांना प्रारंभ झाला असून शेतकरी हैराण झाला आहे़बिलोली तालुक्याला मांजरा-गोदावरी नदीने वेढलेले आहे़ तालुक्यातील बहुसंख्य गावे नदीकाठी आहेत़ पण मागच्या दीड महिन्यांत अतिशय कमी पाऊस झाल्याने दोन्ही नद्या कोरड्याठाक झाल्या आहेत़ जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली़ प्रारंभी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या़ गतवर्षी प्रमाणेच पाऊस पडेल या आशेवर सर्वच शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या़ प्रामुख्याने सोयाबीन व कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली़ जूनच्या दुसऱ्या आठवड्यातील पावसानंतर वरूणराजाने रुसवा काढला तो जुलै उजडला तरी पाऊस झाला नाही़ जुलैच्या महिन्यातील २० दिवसांत १५ मि़मी़ देखील पाऊस नव्हता़ उलट उन्हाळ्याप्रमाणे तापमानाचा पारा वाढला व उगवलेली पिके सुद्धा वाया गेली़ पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला़ पावसाची वाट पाहून पाहून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़ शेतकऱ्यांकडे आता पावसाची प्रतीक्षा असून शेती कामेच ठप्प आहेत़ परिणामी मजुरांनाही कामे नाहीत़ गतवर्षी पावसाने प्रारंभीपासूनच वेळेवर हजेरी लावल्याने शेती कामांना वेग होता़ परिणामी सर्वच गावांत शेतीकामे सर्वांकडेच असल्याने शेतमजुरांना चांगलीच मागणी होती़ समूह मजूर शेतीच्या कामांचा ठेका घेत असत़ पण पावसाने डोळे वटारल्याने शेतमजुरांना कामच नाही, अशी परिस्थिती ग्रामीण भागात झाली आहे़तालुक्यातील कुंडलवाडी, रामतीर्थ, आरळी, आदमपूर व सगरोळीसह बिलोली परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ ऐन पावसाळ्याच्या महिन्यातच पाऊस नसल्याने उन्हाळ्याप्रमाणे उकाडा सुरू झाला आहे़ तर मागच्या २५ वर्षात इतका कमी पाऊस झाला नव्हता असे जाणकार वयोवृद्ध सांगत आहेत़ सहा वर्षापूर्वी २००८ मध्ये ९० मि़मी़ पाऊस झाला होता़ तेव्हा देखील अशीच स्थिती होती़ पण लगेच मोठा पाऊस झाला़ त्यात शेतकऱ्यांना संजीवनी मिळाली़ यावर्षीच्या हंगामात अतिशय कमी पाऊस झाल्याने पाणीपातळी खालावली आहे़ मांजरा-गोदावरी दोन्ही नद्या अद्यापही कोरड्याच आहेत़ ७ जून ते २० जुलैपर्यंत मागील दहा वर्षांत झालेला पाऊस२००४-१९८ मि़मी़२००५-३०२ मि़मी़२००६-२१० मि़मी़२००७-१८८ मि़मी़२००८-९० मि़मी़२००९-१६२ मि़मी़२०१०-१७५ मि़मी़२०११-१८२ मि़मी़२०१२-१८८ मि़मी़२०१३-४२० मि़मी़२०१४-७० मि़मी़