शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

मराठवाड्यात श्रावण सरी; पहाटेपासून सर्वत्र संततधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 13:46 IST

मराठवाड्यात सर्वत्र काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यात मोठ्या प्रतिक्षेनंतर पावसाचे आगमन झाले असून श्रावण महिन्यातला हा पहिलाच मोठा पाऊस आहे. औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, लातूर व उस्मानाबाद या मराठवाड्यातील जिल्ह्यांत पहाटेपासून संततधार पाऊस सुरु आहे. 

जूनमध्ये मान्सूनपूर्व पावसानंतर मराठवाड्यात पावसाचा मोठा खंड पडला होता. जुलै महिन्यात परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. मात्र इतरत्र पावसाने ओढ दिली.मात्र काल रात्री पासून मराठवाड्यात बहुतेक सर्व जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. यानंतर पावसाने जोर पकडत सकाळपासून जोरदार हजेरी लावली. यामुळे मान्सून पूर्व पावसावर पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधान पसरले आहे.  

जालना येथे १५ दिवसानंतर सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात रात्री पासुन पाऊस सुरु आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. हिंगोली जिल्ह्यात विविध भागात काल रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

परभणी जिल्ह्यात वीस दिवसानंतरच्या मोठ्या खंडानंतर १५ आॅगस्ट रोजी रात्री जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केले असून, रात्रभर सर्वदूर झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे.रात्रीतून जिल्ह्यात सरासरी ५९  मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यात २५.८८ मि.मी., पालम तालुक्यात ९.६७, पूर्णा ३२.८०, गंगाखेड २५.५०, सोनपेठ २५.००, सेलू २१.८०, पाथरी २४.००, जिंतूर ३०.१७ आणि  मानवत तालुक्यात २७.३३ मि.मी. पाऊस झाला. पाऊसाची सतंतधार चालुच आहे.

बीड जिल्ह्यात केज शहरासह तालुक्यात बुधवारी रात्री दहा वाजल्या पासून सततधार पाऊस. तसेच गेवराई, माजलगाव, धारूर तालुक्यातही संततधार पाऊस आहे. लातूर जिल्हातही पावसाचे आगमन झाले आहे. देवणी येथे  राञी पासून भीज पाऊस  सूरू असून अाभाळ भरून अाले अाहे. या पावसाने खरीप पीकाना व तसेच जनावरांच्या चाऱ्याला मोठा आधार मिळाला आहे. नांदेड जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू होता. आज सकाळी जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून सकल भागात पाणी साचले आहे. अनेक दिवसाच्या प्रतीक्षेने पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी उस्मानाबाद जिल्ह्यातही दीर्घ विश्रांतीनंतर दमदार पाऊस झाला. मागील चोवीस तासांत ७ मंडळांमध्ये (सर्कल) अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळमध्ये सर्वाधिक १५० मिलीमीटर पाऊस पडला. पावसाअभावी धास्तावलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.