शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला रेल्वेने चारा पुरवठा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:12 IST

मराठवाड्यातील पशुधनाला चारा कमी पडल्यास पालघर येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवरील चारा रेल्वेने पुरविला जाईल. याबाबत रेल्वे प्रशासनासोबत बैठक झाली आहे. तसेच चारा दावणीला देणे शक्य नाही. छावणीतूनच पशुधनासाठी चारा आणि पाणी द्यावे लागेल, असे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी आज स्पष्ट केले.

ठळक मुद्देपशुसंवर्धन मंत्र्यांची माहिती : दावणी ऐवजी छावणीत चारा-पाणी देणे शक्य

औरंगाबाद : मराठवाड्यातील पशुधनाला चारा कमी पडल्यास पालघर येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवरील चारा रेल्वेने पुरविला जाईल. याबाबत रेल्वे प्रशासनासोबत बैठक झाली आहे. तसेच चारा दावणीला देणे शक्य नाही. छावणीतूनच पशुधनासाठी चारा आणि पाणी द्यावे लागेल, असे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी आज स्पष्ट केले.औरंगाबाद आणि लातूर विभागाच्या पशुसंवर्धन खात्याची आढावा बैठक जानकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, जून २०१९ पर्यंत चारा कमी पडणार नाही. एका गावात पिण्यासाठी दोन टँकरने पाणीपुरवठा होत असेल तर पशुधनासाठीदेखील दोन टँकर पिण्याचे पाणी देण्याबाबत तातडीने तरतूद करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाºयांकडे मागणी येताच त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात येतील. विभागाला किती चारा कमी पडणार याबाबत अंदाज बांधणी सुरू आहे. पालघर येथे मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध आहे. तेथून रेल्वेने मराठवाड्यात चारा पोहोचविणे शक्य आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनासोबत बैठक झाली आहे. रेल्वेने याबाबत होकार दिल्याचे त्यांनी सांगितले. ३ किलो सुका व ७ किलो ओला, असे १० किलो चारा प्रतिदिन उपलब्ध करून देण्याबाबत आढावा घेण्यात येत आहे. लवकरच याबाबत निर्णय होईल.पशुसंवर्धन खात्यातील १ हजार १५ रिक्त जागांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. लोकसेवा आयोगामार्फत काही जागा भराव्या लागतील. ९६ उपायुक्तांच्या जागा भरती करण्यात आल्या आहेत. चतुर्थश्रेणीतील जागा आयुक्त पातळीवर भरण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र काम केल्यास दुष्काळाची दाहकता कमी होईल, असे ते म्हणाले.गैरप्रकार होणार नाहीचारा आणि पाणीपुरवठ्यात गैरप्रकार होणार नाही. चारा छावणीत पुरवठा केला जाईल. जिओ टॅगिंगमुळे पारदर्शकता असेल. चारा छावण्यांसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. त्या समितीच्या सूचनेनुसार कामाला गती मिळेल. सध्या तरी चारा छावण्या सुुरू करण्याबाबत शासनाकडे मागणी करण्यात आलेली नाही, असा दावा जानकर यांनी केला.

टॅग्स :cowगायministerमंत्रीAurangabadऔरंगाबाद