शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

राहुल गांधींचा गुजरातमधील २ प्रचारसभेनंतर औरंगाबादेत मुक्काम; सकाळी पुन्हा भारत जोडोत

By स. सो. खंडाळकर | Updated: November 22, 2022 15:06 IST

मंगळवारी सकाळी ७ वा. ते ‘भारत जोडो’ यात्रेकडे रवाना झाले. ही यात्रा सध्या मध्य प्रदेशात दाखल झाली आहे.

औरंगाबाद : सध्या सुरू असलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणूक रणधुमाळीत ‘भारत जोडो’ यात्रेतून ‘ब्रेक’ घेत काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी सोमवारी भाग घेतला. सुरत आणि राजकोट येथील कॉंग्रेसच्या प्रचारसभा आटोपून ते रात्री औरंगाबाद मुक्कामी आले.

मंगळवारी सकाळी ७ वा. ते ‘भारत जोडो’ यात्रेकडे रवाना झाले. ही यात्रा सध्या मध्य प्रदेशात दाखल झाली आहे. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास राहुल गांधी यांचे औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. येथून ते लगेच विमानाने सुरतकडे रवाना झाले. तेथील व राजकोट येथील प्रचारसभा आटोपून ते पुन्हा सायंकाळी सातच्या सुमारास चिकलठाणा विमानतळावर आले. त्यांच्यासमवेत के. सी. वेणुगोपालही आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोकसिंह गेहलोत हे सध्या गुजरातमध्ये प्रचार दौऱ्यावर आहेत. सायंकाळी राहुल गांधी यांच्यासमवेत ते आले आणि चार्टर विमानाने लगेच गुजरातकडे रवाना झाले.

खा. राहुल गांधी यांचा मुक्काम रामा हाॅटेलमध्ये राहिला. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ, विलासबापू औताडे, डॉ. जफरखान, अशोक सायन्ना, जगन्नाथ काळे, डॉ. पवन डोंगरे, जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा हेमा पाटील, दीपाली मिसाळ, उज्ज्वला दत्त, किरण पाटील डोणगावकर, ॲड. सय्यद अक्रम, इब्राहिम पठाण, खालेद पठाण, शेख अथर, प्रकाश वाघमारे, गौरव जैस्वाल आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वाटेत राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी मुुकुंदवाडी येथे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. परंतु त्याठिकाणी ते थांबलेच नाहीत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राAurangabadऔरंगाबादGujaratगुजरात