शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शहरबस सेवेमध्ये लवकरच होणार अमुलाग्र बदल : मनपा आयुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 19:06 IST

शहर बस होणार आणखी 'स्मार्ट' 

ठळक मुद्देशहर बसची संख्या होणार ९०

औरंगाबाद : महापालिकेच्या शहर बस सेवेत आणखी सुसूत्रता आणण्यासाठी आणि उत्पन्न वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. लवकरच शहर बसची संख्या 90 पर्यंत जाणार आहे. बसेस स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतंत्र टेंडर काढण्यात येणार आहे. जाहिरात फलक लावून उत्पन्न मिळवण्यात येईल अशी माहिती महानगरपलिका आयुक्त निपुण विनायक यांनी दिली. 

यासोबतच सध्या वापरण्यात येत असलेले तिकीट मशीन संदर्भात तक्रारी येत आहेत. अत्याधुनिक मशीन खरेदी करण्याचा संकल्पही आज मनपा आयुक्त डॉक्टर निपून विनायक यांनी व्यक्त केला. बसचे वेळापत्रक पाळण्यात येत नसल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी नमूद केले की लवकरच अमुलाग्र बदल दिसून येतील.

शहर बसचे नाही नियोजन केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतून महापालिकेने २३ जानेवारीपासून शहरात ‘स्मार्ट बस’सेवा सुरू केली. ही सेवाही एस.टी. महामंडळासारखीच सुरू आहे. यामध्ये कुठेच ‘स्मार्ट’पण पाहायला मिळत नाही. २२ मार्गांवर ४९ बस सध्या धावत आहेत. त्यातील बहुतांश फेऱ्या रिकाम्याच असतात. प्रवाशांना कोणत्या स्टॉपवर बस किती वाजता येईल, हेच माहीत नाही. त्यामुळे बसची वाट पाहून कंटाळलेले प्रवासी अधिक पैसे देऊन रिक्षाने प्रवास करणे पसंत करीत आहेत.

५० टक्के फेऱ्या रिकाम्या धावतात महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेत तब्बल १०० बस खरेदी केल्या आहेत. बस चालविण्याची जबाबदारी एस.टी. महामंडळावर सोपविली आहे. मागील सात महिन्यांमध्ये या बससेवेचा २१ लाख ८३ हजार प्रवाशांनी फायदा घेतल्याचा दावा मनपाकडून करण्यात येत आहे. १३ लाख ५३ हजार ३५२ किलोमीटर अंतर बसने पूर्ण केले. २२ मार्गांवर ४९ बस धावत आहेत. बहुतांश बस ५५ ते ६१ टक्के रिकाम्याच धावतात. कारण महापालिकेने कुठेच बसस्टॉप तयार केले नाहीत. 

सात महिन्यांत अडीच कोटी जमा२३ जानेवारी ते १६ आॅगस्टपर्यंत तिकिटातून २ कोटी ५६ लाख ८५ हजार ३०६ रुपये तिजोरीत जमा झाले. यात सर्वाधिक ४९ लाख रुपये जुलै महिन्यात मिळाले असून, आॅगस्ट महिन्याचा आकडा ६० लाखांच्या घरात जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. उर्वरित बस सुरू करण्यासाठी १८६ चालक-वाहकांची आवश्यकता असून, त्याची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादtourismपर्यटन