शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अत्यल्प पावसाचा फटका, यंदा रब्बी गव्हाचे क्षेत्र घटणार; ज्वारी, हरभऱ्याचा पेरा वाढणार

By बापू सोळुंके | Updated: September 22, 2023 20:03 IST

कृषी विभागाचा अंदाज : अत्यल्प पावसाचा रब्बी हंगामालाही फटका

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ५६ टक्केच पाऊस पडल्याचा फटका खरीप हंगामातील सर्वच पिकांना बसला. चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसाच्या सरीमुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. असे असले तरी उत्पादनात मोठी घट होणार आहे. शिवाय रब्बी हंगामातील प्रमुख गहू पिकाचे क्षेत्र घटून ज्वारी, करडईचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली वगळता उर्वरित सहा जिल्ह्यांत आतापर्यंत अत्यल्प पाऊस पडला. मुसळधार पाऊस न झाल्यामुळे नदी, नाले काेरडे आहेत. परिणामी, भूजलपातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यांत यावर्षी सुमारे ९ लाख २८ हजार ७२८ हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणून गहू पिकाकडे पाहिले जाते. अपुऱ्या पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २१ टक्के गव्हाचे क्षेत्र घटून रब्बी ज्वारीचे क्षेत्र २८ टक्के वाढणार आहे. जालना जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र सरासरी ३६ टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. रब्बी ज्वारीचे क्षेत्र केवळ १४ टक्के वाढण्याचा अंदाज आहे. तर बीड जिल्ह्यातही शेतकरी गव्हाऐवजी रब्बी ज्वारी आणि हरभरा सूर्यफूल, करडई या पिकांना प्राधान्य देण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

रब्बी गव्हाचे क्षेत्र घटणारअत्यल्प पावसामुळे खरिपाचे उत्पादनात कमालीची घट होणार आहे. असे असले तरी चार दिवसांपासून पडत असलेला पाऊस आणि पुढील काही दिवस पावसाचे दिवस असल्याने खरीप पिकाला लाभ होईल. खरिपातील उडीद, मुगाच्या क्षेत्रावर आता रब्बी पिकांची पेरणी काही दिवसांत सुरू होईल. यंदा मात्र रब्बी गव्हाचे क्षेत्र घटणार आहे.-आर. टी. जाधव, विभागीय कृषी सहसंचालक

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र