शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्न पडतात तिथेच लोकशाही असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 19:30 IST

‘सार्वत्रिक निवडणुका’ विषयावर विविध मान्यवरांचे मनोगत

औरंगाबाद : देशात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे. दोन टप्प्यांत मतदान झाल्यानंतरही अनेकांना या निवडणुकीत काय चालले आहे, कोणाचे सरकार येणार, याविषयी संभ्रम आहे. सगळीकडे संशयाचे वातावरण असताना सर्वसामान्य, आदिवासी, शेतकरी, निम्न मध्यमवर्गीय नागरिकांनी निवडणूक हातात घेतली आहे. आमच्या पोटाचे काय, हा प्रश्न विचारत आहेत. ज्याठिकाणी प्रश्न पडतात, विचारले जातात त्याठिकाणीच लोकशाही अस्तित्वात असते, असे मनोगत विविध मान्यवरांनी परिसंवादात व्यक्त केले.

महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात कॉ. चंद्रगुप्त चौधरी स्मृती समितीतर्फे ‘सार्वत्रिक निवडणुका’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार डॉ. हेमंत देसाई होते. यात पत्रकार अमेय तिरोडकर, संजय आवटे यांनी सहभाग नोंदवला. व्यासपीठावर के.एम. ठिगळे, देवीदास तुळजापूरकर यांची उपस्थिती होती.  तिरोडकर म्हणाले, राज्यातील १६ जिल्ह्यांतील विविध ठिकाणांना भेटी दिल्यानंतर समजले की, प्रसारमाध्यमांनी दुर्लक्षित ठेवलेला मोठा समाज पोटाच्या, जगण्याच्या प्रश्नामुळे अडचणीत सापडलेला आहे. विद्यमान सरकारने पाच वर्षे ‘नॉन इश्यू’ चर्चेत ठेवून शेतकरी, दलित, आदिवासी, निम्न मध्यमवर्गीयांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले. त्याच वर्गाने ही निवडणूक हाती घेतली आहे. 

नागपूरमध्ये निवडणुकीच्या १५ दिवस आधी वातावरण नितीन गडकरी निवडून येणार असेच होते. मात्र निवडणूक झाल्यानंतर गडकरी पडणार, अशी चर्चा होत आहे. विशिष्ट घटकांकडे सर्वांनीच केलेले दुर्लक्ष हेच कारण आहे. याचवेळी ही निवडणूक जात या केंद्राशी संलग्न झाली आहे. २००९ ची निवडणूक प्रांतवादावर लढली गेली. २०१४ साली धर्माच्या नावावर निवडणुका झाल्या.  यावर्षी जातीवर केंद्रित झाली आहे. त्यात महाराष्ट्रापासून कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार अशा मोठ्या राज्यांचा समावेश असल्याचे निरीक्षण तिरोडकर यांनी नोंदवले. तसेच बेरोजगारी, नोकरी, शेतीमालाला भाव अशा प्रश्नांमुळे बालाकोटचा हल्ला मागे पडल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन देवीदास तुळजापूरकर यांनी केले.

समस्यांना हात घातल्याने आपुलकीची भावनाअध्यक्षीय समारोपात डॉ. हेमंत देसाई म्हणाले, विद्यमान सरकारचा विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांकडे नियोजनाचा आभाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याठिकाणी जातात त्या भागातील देव-देवता, समस्यांना हात घालत आहेत. यातून संबंधित नागरिकांमध्ये आपुलकीची भावना दिसून येते. मात्र, त्या विरुद्ध दिशेने विरोधकांचा प्रवास सुरू आहे. मोदी निवडून येऊ नयेत, अशी मांडणीच होताना दिसत नाही, असेही डॉ. देसाई यांनी सांगितले.

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादSocialसामाजिक