शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

प्रश्न पडतात तिथेच लोकशाही असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 19:30 IST

‘सार्वत्रिक निवडणुका’ विषयावर विविध मान्यवरांचे मनोगत

औरंगाबाद : देशात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे. दोन टप्प्यांत मतदान झाल्यानंतरही अनेकांना या निवडणुकीत काय चालले आहे, कोणाचे सरकार येणार, याविषयी संभ्रम आहे. सगळीकडे संशयाचे वातावरण असताना सर्वसामान्य, आदिवासी, शेतकरी, निम्न मध्यमवर्गीय नागरिकांनी निवडणूक हातात घेतली आहे. आमच्या पोटाचे काय, हा प्रश्न विचारत आहेत. ज्याठिकाणी प्रश्न पडतात, विचारले जातात त्याठिकाणीच लोकशाही अस्तित्वात असते, असे मनोगत विविध मान्यवरांनी परिसंवादात व्यक्त केले.

महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात कॉ. चंद्रगुप्त चौधरी स्मृती समितीतर्फे ‘सार्वत्रिक निवडणुका’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार डॉ. हेमंत देसाई होते. यात पत्रकार अमेय तिरोडकर, संजय आवटे यांनी सहभाग नोंदवला. व्यासपीठावर के.एम. ठिगळे, देवीदास तुळजापूरकर यांची उपस्थिती होती.  तिरोडकर म्हणाले, राज्यातील १६ जिल्ह्यांतील विविध ठिकाणांना भेटी दिल्यानंतर समजले की, प्रसारमाध्यमांनी दुर्लक्षित ठेवलेला मोठा समाज पोटाच्या, जगण्याच्या प्रश्नामुळे अडचणीत सापडलेला आहे. विद्यमान सरकारने पाच वर्षे ‘नॉन इश्यू’ चर्चेत ठेवून शेतकरी, दलित, आदिवासी, निम्न मध्यमवर्गीयांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले. त्याच वर्गाने ही निवडणूक हाती घेतली आहे. 

नागपूरमध्ये निवडणुकीच्या १५ दिवस आधी वातावरण नितीन गडकरी निवडून येणार असेच होते. मात्र निवडणूक झाल्यानंतर गडकरी पडणार, अशी चर्चा होत आहे. विशिष्ट घटकांकडे सर्वांनीच केलेले दुर्लक्ष हेच कारण आहे. याचवेळी ही निवडणूक जात या केंद्राशी संलग्न झाली आहे. २००९ ची निवडणूक प्रांतवादावर लढली गेली. २०१४ साली धर्माच्या नावावर निवडणुका झाल्या.  यावर्षी जातीवर केंद्रित झाली आहे. त्यात महाराष्ट्रापासून कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार अशा मोठ्या राज्यांचा समावेश असल्याचे निरीक्षण तिरोडकर यांनी नोंदवले. तसेच बेरोजगारी, नोकरी, शेतीमालाला भाव अशा प्रश्नांमुळे बालाकोटचा हल्ला मागे पडल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन देवीदास तुळजापूरकर यांनी केले.

समस्यांना हात घातल्याने आपुलकीची भावनाअध्यक्षीय समारोपात डॉ. हेमंत देसाई म्हणाले, विद्यमान सरकारचा विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांकडे नियोजनाचा आभाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याठिकाणी जातात त्या भागातील देव-देवता, समस्यांना हात घालत आहेत. यातून संबंधित नागरिकांमध्ये आपुलकीची भावना दिसून येते. मात्र, त्या विरुद्ध दिशेने विरोधकांचा प्रवास सुरू आहे. मोदी निवडून येऊ नयेत, अशी मांडणीच होताना दिसत नाही, असेही डॉ. देसाई यांनी सांगितले.

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादSocialसामाजिक