शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील तीन ऐतिहासिक दरवाजांचा प्रश्न निर्णायक वळणावर; महानगरपालिकेला केव्हा जाग येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 16:32 IST

शहरातील तीन दरवाजे आणि त्यांना लागून असलेल्या पुलांचा प्रश्नही आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे.

ठळक मुद्देपूल कोसळून निष्पाप नागरिकांचे रक्त सांडल्यानंतरच महापालिका काही ठोस निर्णय घेणार आहे का? पूल धोकादायक असल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच वर्षांपूर्वीच दिल्यानंतरही २४ तास त्यावरून वाहतूक सुरू आहे.

औरंगाबाद : शहरातील तीन दरवाजे आणि त्यांना लागून असलेल्या पुलांचा प्रश्नही आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. शुक्रवारी सकाळी महेमूद गेटचे काही अवशेष कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. दरवाजांना लागून असलेले पूलही कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर आहेत. पूल धोकादायक असल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच वर्षांपूर्वीच दिल्यानंतरही २४ तास त्यावरून वाहतूक सुरू आहे. पूल कोसळून निष्पाप नागरिकांचे रक्त सांडल्यानंतरच महापालिका काही ठोस निर्णय घेणार आहे का? असा संतप्त सवाल औरंगाबादकरांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

महेमूद गेटशुक्रवारी सकाळी पाणचक्कीजवळील महेमूद गेटच्या आतील लाकडी दरवाजाही निखळला. गेटचे अवशेषही खिळखिळे झाले असून, तेसुद्धा कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर आहेत. गेटला लागून असलेल्या पुलाची अवस्थाही अत्यंत विदारक आहे. सुमारे ३५० वर्षांपूर्वी या पुलाची उभारणी करण्यात आली. १७३० मध्ये पूल बांधण्यात आला. पाणचक्की येथील शाह सईद तिलंग पोश, त्यांचे पुतणे बाबा शाह मुसाफीर या बुर्जुग मंडळींचे शिष्य महेमूद शाह मुसाफीर यांनी तेव्हा २० हजार रुपये खर्च करून पाणचक्की, पूल, गेटची उभारणी केली आहे. पुलाचे आयुष्य संपल्याचा निर्वाळा देण्यात आला असतानाही वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे महेमूद दरवाजा दिवसेंदिवस खिळखिळा होत आहे. 

बारापुल्ला गेटमिलकॉर्नरपासून हाकेच्या अंतरावर खाम नदीवर उभा असलेला गेट म्हणजे बारापुल्ला गेट होय. या गेटला लागूनच मोठा ऐतिहासिक पूल आहे. छावणी, भावसिंगपुरा भागातील दीड ते दोन लाख नागरिकांना दररोज ये-जा करण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. ज्या पद्धतीने गेटची अवस्था झाली आहे, त्यापेक्षा कितीतरी वाईट अवस्था बारापुल्ला या ऐतिहासिक पुलाची झाली आहे. हा पूलही धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला आहे. महापालिकेने आजपर्यंत यावरील वाहतूक थांबविलेली नाही. या पुलावर किंवा दरवाजात मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता इतिहासप्रेमींकडून वर्तविण्यात येत आहे.

मकाई गेटघाटीजवळील ऐतिहासिक गेट म्हणजे मकाई गेट होय. औरंगजेब यांच्या काळात गेट आणि पुलांची उभारणी करण्यात आली आहे. खाम नदीवर सर्वात मोठा पूल आहे. याची उंचीही इतर पुलांपेक्षा खूप जास्त आहे. मकबऱ्याकडे जाणारे असंख्य पर्यटक याच गेट आणि पुलावरून ये-जा करतात. हा पुल धोकादायक झाल्याने भविष्यात दुर्घटना होऊ शकते. 

योजना कागदावरचमागील दहा वर्षांपासून महेमूद गेट, बारापुल्ला गेट, मकाई गेट येथे दोन्ही बाजूने रस्ता करावा. पुलांची उभारणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. ५ वर्षांपूर्वी राज्य शासनाने ११ कोटी रुपये पुलांसाठी जाहीर केले होते. हा निधी शहरापर्यंत आलाच नाही. महापालिकेकडे निधी नाही. पुलांची उभारणी करण्यासाठी राजकीय मंडळी शासनाकडे पाठपुरावा करायला तयार नाही. या तिन्ही दरवाजांमध्ये महाडसारखी दुर्घटना घडल्यास शासन आणि महापालिकेला जाग येणार आहे का? असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणroad safetyरस्ते सुरक्षा