शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
3
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
4
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
5
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
6
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
7
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
8
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
9
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
10
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
11
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
12
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
13
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
14
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
15
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
16
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
17
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
18
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
19
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
20
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

औरंगाबादमधील तीन ऐतिहासिक दरवाजांचा प्रश्न निर्णायक वळणावर; महानगरपालिकेला केव्हा जाग येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 16:32 IST

शहरातील तीन दरवाजे आणि त्यांना लागून असलेल्या पुलांचा प्रश्नही आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे.

ठळक मुद्देपूल कोसळून निष्पाप नागरिकांचे रक्त सांडल्यानंतरच महापालिका काही ठोस निर्णय घेणार आहे का? पूल धोकादायक असल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच वर्षांपूर्वीच दिल्यानंतरही २४ तास त्यावरून वाहतूक सुरू आहे.

औरंगाबाद : शहरातील तीन दरवाजे आणि त्यांना लागून असलेल्या पुलांचा प्रश्नही आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. शुक्रवारी सकाळी महेमूद गेटचे काही अवशेष कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. दरवाजांना लागून असलेले पूलही कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर आहेत. पूल धोकादायक असल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच वर्षांपूर्वीच दिल्यानंतरही २४ तास त्यावरून वाहतूक सुरू आहे. पूल कोसळून निष्पाप नागरिकांचे रक्त सांडल्यानंतरच महापालिका काही ठोस निर्णय घेणार आहे का? असा संतप्त सवाल औरंगाबादकरांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

महेमूद गेटशुक्रवारी सकाळी पाणचक्कीजवळील महेमूद गेटच्या आतील लाकडी दरवाजाही निखळला. गेटचे अवशेषही खिळखिळे झाले असून, तेसुद्धा कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर आहेत. गेटला लागून असलेल्या पुलाची अवस्थाही अत्यंत विदारक आहे. सुमारे ३५० वर्षांपूर्वी या पुलाची उभारणी करण्यात आली. १७३० मध्ये पूल बांधण्यात आला. पाणचक्की येथील शाह सईद तिलंग पोश, त्यांचे पुतणे बाबा शाह मुसाफीर या बुर्जुग मंडळींचे शिष्य महेमूद शाह मुसाफीर यांनी तेव्हा २० हजार रुपये खर्च करून पाणचक्की, पूल, गेटची उभारणी केली आहे. पुलाचे आयुष्य संपल्याचा निर्वाळा देण्यात आला असतानाही वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे महेमूद दरवाजा दिवसेंदिवस खिळखिळा होत आहे. 

बारापुल्ला गेटमिलकॉर्नरपासून हाकेच्या अंतरावर खाम नदीवर उभा असलेला गेट म्हणजे बारापुल्ला गेट होय. या गेटला लागूनच मोठा ऐतिहासिक पूल आहे. छावणी, भावसिंगपुरा भागातील दीड ते दोन लाख नागरिकांना दररोज ये-जा करण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. ज्या पद्धतीने गेटची अवस्था झाली आहे, त्यापेक्षा कितीतरी वाईट अवस्था बारापुल्ला या ऐतिहासिक पुलाची झाली आहे. हा पूलही धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला आहे. महापालिकेने आजपर्यंत यावरील वाहतूक थांबविलेली नाही. या पुलावर किंवा दरवाजात मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता इतिहासप्रेमींकडून वर्तविण्यात येत आहे.

मकाई गेटघाटीजवळील ऐतिहासिक गेट म्हणजे मकाई गेट होय. औरंगजेब यांच्या काळात गेट आणि पुलांची उभारणी करण्यात आली आहे. खाम नदीवर सर्वात मोठा पूल आहे. याची उंचीही इतर पुलांपेक्षा खूप जास्त आहे. मकबऱ्याकडे जाणारे असंख्य पर्यटक याच गेट आणि पुलावरून ये-जा करतात. हा पुल धोकादायक झाल्याने भविष्यात दुर्घटना होऊ शकते. 

योजना कागदावरचमागील दहा वर्षांपासून महेमूद गेट, बारापुल्ला गेट, मकाई गेट येथे दोन्ही बाजूने रस्ता करावा. पुलांची उभारणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. ५ वर्षांपूर्वी राज्य शासनाने ११ कोटी रुपये पुलांसाठी जाहीर केले होते. हा निधी शहरापर्यंत आलाच नाही. महापालिकेकडे निधी नाही. पुलांची उभारणी करण्यासाठी राजकीय मंडळी शासनाकडे पाठपुरावा करायला तयार नाही. या तिन्ही दरवाजांमध्ये महाडसारखी दुर्घटना घडल्यास शासन आणि महापालिकेला जाग येणार आहे का? असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणroad safetyरस्ते सुरक्षा