शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

औरंगाबादमधील तीन ऐतिहासिक दरवाजांचा प्रश्न निर्णायक वळणावर; महानगरपालिकेला केव्हा जाग येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 16:32 IST

शहरातील तीन दरवाजे आणि त्यांना लागून असलेल्या पुलांचा प्रश्नही आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे.

ठळक मुद्देपूल कोसळून निष्पाप नागरिकांचे रक्त सांडल्यानंतरच महापालिका काही ठोस निर्णय घेणार आहे का? पूल धोकादायक असल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच वर्षांपूर्वीच दिल्यानंतरही २४ तास त्यावरून वाहतूक सुरू आहे.

औरंगाबाद : शहरातील तीन दरवाजे आणि त्यांना लागून असलेल्या पुलांचा प्रश्नही आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. शुक्रवारी सकाळी महेमूद गेटचे काही अवशेष कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. दरवाजांना लागून असलेले पूलही कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर आहेत. पूल धोकादायक असल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच वर्षांपूर्वीच दिल्यानंतरही २४ तास त्यावरून वाहतूक सुरू आहे. पूल कोसळून निष्पाप नागरिकांचे रक्त सांडल्यानंतरच महापालिका काही ठोस निर्णय घेणार आहे का? असा संतप्त सवाल औरंगाबादकरांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

महेमूद गेटशुक्रवारी सकाळी पाणचक्कीजवळील महेमूद गेटच्या आतील लाकडी दरवाजाही निखळला. गेटचे अवशेषही खिळखिळे झाले असून, तेसुद्धा कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर आहेत. गेटला लागून असलेल्या पुलाची अवस्थाही अत्यंत विदारक आहे. सुमारे ३५० वर्षांपूर्वी या पुलाची उभारणी करण्यात आली. १७३० मध्ये पूल बांधण्यात आला. पाणचक्की येथील शाह सईद तिलंग पोश, त्यांचे पुतणे बाबा शाह मुसाफीर या बुर्जुग मंडळींचे शिष्य महेमूद शाह मुसाफीर यांनी तेव्हा २० हजार रुपये खर्च करून पाणचक्की, पूल, गेटची उभारणी केली आहे. पुलाचे आयुष्य संपल्याचा निर्वाळा देण्यात आला असतानाही वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे महेमूद दरवाजा दिवसेंदिवस खिळखिळा होत आहे. 

बारापुल्ला गेटमिलकॉर्नरपासून हाकेच्या अंतरावर खाम नदीवर उभा असलेला गेट म्हणजे बारापुल्ला गेट होय. या गेटला लागूनच मोठा ऐतिहासिक पूल आहे. छावणी, भावसिंगपुरा भागातील दीड ते दोन लाख नागरिकांना दररोज ये-जा करण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. ज्या पद्धतीने गेटची अवस्था झाली आहे, त्यापेक्षा कितीतरी वाईट अवस्था बारापुल्ला या ऐतिहासिक पुलाची झाली आहे. हा पूलही धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला आहे. महापालिकेने आजपर्यंत यावरील वाहतूक थांबविलेली नाही. या पुलावर किंवा दरवाजात मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता इतिहासप्रेमींकडून वर्तविण्यात येत आहे.

मकाई गेटघाटीजवळील ऐतिहासिक गेट म्हणजे मकाई गेट होय. औरंगजेब यांच्या काळात गेट आणि पुलांची उभारणी करण्यात आली आहे. खाम नदीवर सर्वात मोठा पूल आहे. याची उंचीही इतर पुलांपेक्षा खूप जास्त आहे. मकबऱ्याकडे जाणारे असंख्य पर्यटक याच गेट आणि पुलावरून ये-जा करतात. हा पुल धोकादायक झाल्याने भविष्यात दुर्घटना होऊ शकते. 

योजना कागदावरचमागील दहा वर्षांपासून महेमूद गेट, बारापुल्ला गेट, मकाई गेट येथे दोन्ही बाजूने रस्ता करावा. पुलांची उभारणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. ५ वर्षांपूर्वी राज्य शासनाने ११ कोटी रुपये पुलांसाठी जाहीर केले होते. हा निधी शहरापर्यंत आलाच नाही. महापालिकेकडे निधी नाही. पुलांची उभारणी करण्यासाठी राजकीय मंडळी शासनाकडे पाठपुरावा करायला तयार नाही. या तिन्ही दरवाजांमध्ये महाडसारखी दुर्घटना घडल्यास शासन आणि महापालिकेला जाग येणार आहे का? असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणroad safetyरस्ते सुरक्षा