शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

शासकीय प्रकल्पांसाठी टेंडर पद्धतीमुळे इमारतीच्या गुणवत्तेला धक्का

By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 8, 2024 14:55 IST

टेंडरिंग पद्धत बंद करून पुन्हा एकदा गुणवत्तेवर आधारित पद्धत सुरू करा, असे मत ‘लोकमत’शी बोलताना ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’चे राष्ट्रीय अध्यक्ष विलास अवचट यांनी मांडले.

छत्रपती संभाजीनगर : शासकीय प्रकल्पासाठी टेंडर पद्धत अवलंबविली जात आहे. मात्र, या टेंडरिंगमुळे इमारतीच्या गुणवत्तेला धक्का बसला आहे. शासकीय इमारती असो की प्रकल्प; त्यांची गुणवत्ता घसरलेली पाहण्यास मिळत आहे. टेंडरिंगमध्ये सर्वात कमी किमतीची निविदा असलेल्याला काम मिळते, अशा संस्थांकडून दर्जेदार कामाची काय अपेक्षा करणार? टेंडरिंग पद्धत बंद करून पुन्हा एकदा गुणवत्तेवर आधारित पद्धत सुरू करा, असे मत ‘लोकमत’शी बोलताना ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’चे राष्ट्रीय अध्यक्ष विलास अवचट यांनी मांडले. आयआयए आयोजित क्रीडा महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते शहरात आले होते.

शासकीय प्रकल्पाचे काम विदेशी आर्किटेक्ट संस्थेला का मिळतात?उत्तर : भारतात आजघडीला आर्किटेक्ट संघटनेचे सदस्य २८ हजारांपेक्षा अधिक आर्किटेक्ट आहेत. देशातील आर्किटेक्ट आज जगातील कोणत्याही दिग्गज आर्किटेक्टपेक्षा कमी नाहीत. आर्किटेक्टची तरुण पिढी तर खूप हुशार आहे. कल्पकतेचा खजिना त्यांच्याकडे आहे. दुबईतील बुर्ज खलिफा बनविण्यात देशातील आर्किटेक्टचे योगदान आहे. मात्र, शासनाच्या काही प्रकल्पांसाठी उदा : स्मार्ट सिटी प्रकल्पात आर्किटेक्टला ७०० कोटींची वार्षिक उलाढालीची अट घालण्यात आली. तिथे देशातील आर्किटेक्ट मागे पडत आहेत. याचा अर्थ असा नाही की, त्यांच्याकडे गुणवत्ता नाही. यामुळे विदेशी आर्किटेक्ट कंपनीला काम मिळते. सरकारने देशातील आर्किटेक्ट कंपनीलाच काम द्यावे.

शहराचा डीपी प्लॅन करताना आर्किटेक्ट संघटनेला विश्वासात घ्यावे का?उत्तर : देशात अनेक शहरे अशी आहेत की, त्यांचा डीपी प्लॅन तयार नाही. शासनाच्या अनेक समित्या अशा आहेत की, तिथे आर्किटेक्टची आवश्यकता असताना नेमण्यात आले नाही. यामुळे होणारे कामे सुमार दर्जाची होतात. मनपाकडून सौंदर्य बेट तयार केले जाते. त्याच्या समितीवरही आर्किटेक्ट नेमण्यात यावा. केंद्र सरकारने मोठ्या प्रकल्प उभारण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स संस्थेला सहभागी करून घ्यावे. जेणेकरून देशातील तज्ज्ञ आर्किटेक्टच्या मार्गदर्शनातून दर्जेदार, सर्वोत्तम प्रकल्प उभारले जातील, तशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका