शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना दर्जेदार आरोग्यसेवा; राज्यात ईएसआयसी रुग्णालयांमध्ये ३६ हजार बेडची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 15:52 IST

१९७७ मध्ये लोकशाहीची हत्या झाली होती. आता लोकशाही समृद्ध आणि अधिक खुली झाली; केंद्रीय श्रम, रोजगारमंत्री भूपेंद्र यादव

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात कामगारांसाठी ईएसआयसी रुग्णालयांमध्ये फक्त १८ हजार बेड होते. मागील काही वर्षांत केंद्र शासनाने ही संख्या ३६ हजारपर्यंत नेली. यामध्ये आणखी वाढ करण्याचा आमचा मानस आहे. कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात हा त्यामागचा हेतू आहे. राज्यात ७ नवीन ईएसआयसी रुग्णालये सुरू केली जातील. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक क्षेत्रात २०० बेड, शेंद्रा येथे ३० बेडचे रुग्णालय १०० बेडपर्यंत नेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली.

रविवारी सकाळी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. पंतप्रधान आवास योजना, जनधन योजना, शौचालये निर्मिती आदी योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांना फायदा मिळाला. देशभरात ५८ हजार किलोमीटरचे हायवे तयार करण्यात आले. ७४ नवीन एअरपोर्ट तयार केले. जगातील पाच प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात पंतप्रधान आवास योजनेची अद्याप सुरुवातही न झाल्याबद्दल त्यांना थेट प्रश्न विचारल्यावर, स्थानिक नेते उत्तर देतील म्हणून त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.

लोकशाहीच्या मुद्यावर त्यांना छेडले असता, १९७७ मध्ये लोकशाहीची हत्या झाली होती. आता लोकशाही समृद्ध आणि अधिक खुली झाल्याचे यादव यांनी नमूद केले. २०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकार बहुमताने येईल. राज्यातही मुख्यमंत्री एकनाश शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चांगला विकास सुरू आहे. कर्नाटक निवडणुकीच्या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन करू, येणाऱ्या प्रादेशिक निवडणुका जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, आ. प्रशांत बंब, संजय केणेकर, शिरीष बोराळकर, समीर राजूरकर यांची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकार