शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

कामगारांना दर्जेदार आरोग्यसेवा; राज्यात ईएसआयसी रुग्णालयांमध्ये ३६ हजार बेडची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 15:52 IST

१९७७ मध्ये लोकशाहीची हत्या झाली होती. आता लोकशाही समृद्ध आणि अधिक खुली झाली; केंद्रीय श्रम, रोजगारमंत्री भूपेंद्र यादव

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात कामगारांसाठी ईएसआयसी रुग्णालयांमध्ये फक्त १८ हजार बेड होते. मागील काही वर्षांत केंद्र शासनाने ही संख्या ३६ हजारपर्यंत नेली. यामध्ये आणखी वाढ करण्याचा आमचा मानस आहे. कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात हा त्यामागचा हेतू आहे. राज्यात ७ नवीन ईएसआयसी रुग्णालये सुरू केली जातील. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक क्षेत्रात २०० बेड, शेंद्रा येथे ३० बेडचे रुग्णालय १०० बेडपर्यंत नेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली.

रविवारी सकाळी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. पंतप्रधान आवास योजना, जनधन योजना, शौचालये निर्मिती आदी योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांना फायदा मिळाला. देशभरात ५८ हजार किलोमीटरचे हायवे तयार करण्यात आले. ७४ नवीन एअरपोर्ट तयार केले. जगातील पाच प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात पंतप्रधान आवास योजनेची अद्याप सुरुवातही न झाल्याबद्दल त्यांना थेट प्रश्न विचारल्यावर, स्थानिक नेते उत्तर देतील म्हणून त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.

लोकशाहीच्या मुद्यावर त्यांना छेडले असता, १९७७ मध्ये लोकशाहीची हत्या झाली होती. आता लोकशाही समृद्ध आणि अधिक खुली झाल्याचे यादव यांनी नमूद केले. २०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकार बहुमताने येईल. राज्यातही मुख्यमंत्री एकनाश शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चांगला विकास सुरू आहे. कर्नाटक निवडणुकीच्या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन करू, येणाऱ्या प्रादेशिक निवडणुका जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, आ. प्रशांत बंब, संजय केणेकर, शिरीष बोराळकर, समीर राजूरकर यांची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकार