शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कामगारांना दर्जेदार आरोग्यसेवा; राज्यात ईएसआयसी रुग्णालयांमध्ये ३६ हजार बेडची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 15:52 IST

१९७७ मध्ये लोकशाहीची हत्या झाली होती. आता लोकशाही समृद्ध आणि अधिक खुली झाली; केंद्रीय श्रम, रोजगारमंत्री भूपेंद्र यादव

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात कामगारांसाठी ईएसआयसी रुग्णालयांमध्ये फक्त १८ हजार बेड होते. मागील काही वर्षांत केंद्र शासनाने ही संख्या ३६ हजारपर्यंत नेली. यामध्ये आणखी वाढ करण्याचा आमचा मानस आहे. कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात हा त्यामागचा हेतू आहे. राज्यात ७ नवीन ईएसआयसी रुग्णालये सुरू केली जातील. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक क्षेत्रात २०० बेड, शेंद्रा येथे ३० बेडचे रुग्णालय १०० बेडपर्यंत नेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली.

रविवारी सकाळी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. पंतप्रधान आवास योजना, जनधन योजना, शौचालये निर्मिती आदी योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांना फायदा मिळाला. देशभरात ५८ हजार किलोमीटरचे हायवे तयार करण्यात आले. ७४ नवीन एअरपोर्ट तयार केले. जगातील पाच प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात पंतप्रधान आवास योजनेची अद्याप सुरुवातही न झाल्याबद्दल त्यांना थेट प्रश्न विचारल्यावर, स्थानिक नेते उत्तर देतील म्हणून त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.

लोकशाहीच्या मुद्यावर त्यांना छेडले असता, १९७७ मध्ये लोकशाहीची हत्या झाली होती. आता लोकशाही समृद्ध आणि अधिक खुली झाल्याचे यादव यांनी नमूद केले. २०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकार बहुमताने येईल. राज्यातही मुख्यमंत्री एकनाश शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चांगला विकास सुरू आहे. कर्नाटक निवडणुकीच्या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन करू, येणाऱ्या प्रादेशिक निवडणुका जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, आ. प्रशांत बंब, संजय केणेकर, शिरीष बोराळकर, समीर राजूरकर यांची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकार