शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

‘गुणवत्ता कोणा एकाची मक्तेदारी ठरत नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:59 IST

बीड गुणवत्ता ही कुठल्या एका जातीची मक्तेदारी नाही, कर्तृत्व दाखवणे हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे. समाजाला हिणवण्याचे दिवस गेले, आरक्षण व आरक्षणाच्या कुबड्या भविष्यकाळात पुरेशा नाहीत. त्यामुळे पारंपरिक व्यवसायापेक्षा लेखणीची परंपरा हाती घ्या, असे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : गुणवंतांचा कौतुक सोहळा; मान्यवरांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कबीड गुणवत्ता ही कुठल्या एका जातीची मक्तेदारी नाही, कर्तृत्व दाखवणे हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे. समाजाला हिणवण्याचे दिवस गेले, आरक्षण व आरक्षणाच्या कुबड्या भविष्यकाळात पुरेशा नाहीत. त्यामुळे पारंपरिक व्यवसायापेक्षा लेखणीची परंपरा हाती घ्या, असे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले.शहरातील माजलगावकर मठ येथे जय संताजी प्रतिष्ठानच्या वतीने तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. व्यासपीठावर मन्मथ हेरकर, दिलीप गोरे, बबनराव गोरे, अ‍ॅड.शेख शफिक, शाहेद पटेल, दिनेश परदेशी, दत्तात्रय सोनटक्के, राजाराम बन्सोडे व प्रतिष्ठानचे शिवलिंंग क्षीरसागर आदी उपस्थित होते.प्रतिष्ठानच्या वतीने तसेच माजलगाव, वडवणी, बीड, शिरूर, पाटोदा, परळी व अंबाजोगाई येथील तेली समाजबांधवांनी आ. जयदत्त क्षीरसागर यांचे स्वागत केले. या कार्यक्रमात आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते १७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.संत जगनाडे महाराज यांचे मंदिर उभारण्यासाठी आपण जागा उपलब्ध करून दिली असून, स्थानिक निधीतून १० लाख रूपये देऊन लवकरच सभामंडपाचे कामही सुरू होईल, असे आ. क्षीरसागर यावेळी म्हणाले.प्रास्ताविक शिवलिंंग क्षीरसागर यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा.श्रीराम जाधव यांनी केले.जनगणना : गरजेची४ यावेळी बोलताना आ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, आरक्षण हे जातनिहाय असले तरी नव्याने जनगणना करून ओबीसीच्या आरक्षणात बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे जनगणना होणे ही काळाची गरज बनली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकBeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्र