शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

कार्यकर्त्यांचा आधार होत्या पुष्पाताई....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 12:54 IST

प्रसिद्ध विचारवंत, परखड समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे आणि औरंगाबदचे ऋणानुबंध होते. त्यांचे जाणे म्हणजे साहित्य, समाजकार्य या क्षेत्रात पोकळी निर्माण करणारे आहे. एक प्रेमळ, मृदू; परंतु वेळप्रसंगी तेवढेच कणखर आणि करारी व्यक्तिमत्त्व असलेल्या पुष्पाताई म्हणजे कार्यकर्त्यांचा आधार होत्या, अशा भावना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या.

औरंगाबाद : प्रसिद्ध विचारवंत, परखड समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे आणि औरंगाबदचे ऋणानुबंध होते. त्यांचे जाणे म्हणजे साहित्य, समाजकार्य या क्षेत्रात पोकळी निर्माण करणारे आहे. एक प्रेमळ, मृदू; परंतु वेळप्रसंगी तेवढेच कणखर आणि करारी व्यक्तिमत्त्व असलेल्या पुष्पाताई म्हणजे कार्यकर्त्यांचा आधार होत्या, अशा भावना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या.

१. कार्यकर्त्यांसाठी सदैव तत्पर

२००५ साली माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला पुष्पाताई प्रमुख भाष्यकार म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणातून त्यांची दिसून आलेली दूरदृष्टी अफलातून होती. भाषेवरचे प्रभुत्व थक्क करणारे होते. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, गोवामुक्ती, नामांतराचा लढा यासोबतच ७० च्या दशकातील सर्व लढ्यांच्या त्या साक्षीदार होत्या. मी तेव्हा वय आणि अनुभवाने लहान होते आणि त्या प्रत्येक बाबतीतच ज्येष्ठ होत्या; पण तरीही लहानांना समजून घेणे, मार्गदर्शन करणे या गोष्टी पुष्पाताईंनी नेहमीच केल्या. कार्यकर्त्यांसाठी त्या सदैव तयार असायच्या. सगळ्यांचे फोन उचलायचे आणि सगळ्यांशी बोलायचे, हा त्यांचा स्वभाव होता. आमच्या सगळ्यांसाठीच त्या आदर्श होत्या.- मंगल खिंवसरा

 

२. ... आणि मला पुन्हा परीक्षा देता आली

महाविद्यालयात असताना पुष्पाताई मला मराठी शिकवायच्या. शिक्षणाव्यतिरिक्त इतर सामाजिक कार्यातही त्या आम्हा विद्यार्थ्यांना कायम प्रोत्साहन द्यायच्या. इंदिरा गांधींच्या आणीबाणीविरुद्ध १९७५ साली आम्ही विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले होते. त्यासाठी त्यांचे खूप सहकार्य लाभले. एका बाजूला अभ्यास आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या गोष्टी यांचा समताेल सांभाळायलाही त्यांनीच शिकविले. चिडणे त्यांना कधी माहितीच नव्हते. एकदा महाविद्यालयाची परीक्षा चालू असताना मी माझा आसन क्रमांक विसरलो आणि चुकीच्या आसन क्रमांकावर जाऊन पोहाेचलो. त्या धांदलीत माझा पेपर बुडाला; पण बाईंनी तेव्हा मध्यस्ती केली. विद्यापीठातून परवानगी काढली आणि मला पुन्हा परीक्षा देता आली.

- शांताराम पंदेरे

३. त्यांच्या मार्गदर्शनाची संधी हुकली

एमए होण्याच्या आधी मला संशोधन शिष्यवृत्ती मिळाली होती. मला नाटकात पीएच.डी. करायची होती. त्यामुळे मुंबईला जा आणि पुष्पाताईंकडे कर, असा सल्ला मला अनेकांनी दिला. त्यानुसार मी पुष्पाताईंकडे गेलो. त्यांनीही तात्काळ होकार दिला; पण मला मुंबई न आवडल्याने मी १०-१५ दिवसांतच परत आलो. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी हुकली. मात्र, यानिमित्ताने आमचा चांगला कौटुंबिक स्नेह जुळला. औरंगाबादला येताना हमखास त्या मला निरोप करायच्या आणि मग आम्ही बसैयेकडचे त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना आवर्जून आणून द्यायचो. बलदंड राज्यसत्तेच्या विरोधात उभे राहिलेले ते एक कणखर व्यक्तिमत्त्व होते. त्या बोलत्या आणि कर्त्या सुधारक होत्या.

- डॉ. दासू वैद्य

४. तर्कशुद्ध मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य

पुष्पा भावे या अतिशय स्पष्ट वक्त्या होत्या. तेवढीच स्पष्ट त्यांची समीक्षाही होती. कोणत्याही गोष्टीचे अतिशय स्पष्ट मूल्यमापन करणे, त्यांना अगदी चपखल जमत होते. सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांना नेहमीच होती. साहित्य क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. रंगभूमीचा त्यांचा अभ्यास अतिशय सखोल होता. मराठी रंगभूमीविषयी त्यांनी जे लिहिले आहे, ते एक मूलभूत स्वरूपाचे लेखन आहे. अनंत भालेराव पुरस्कार प्रदान झाला तेव्हा त्यांची आणि माझी शेवटची भेट झाली होती. अतिशय तर्कशुद्ध मांडणी असायची आणि त्यामुळे त्यांची मते नाकारणे किंवा खोडून काढणे जवळपास अशक्य असायचे. त्यांनी फार लिखाण केले नाही; पण जे लिहिले ते अतिशय मौल्यवान आहे.

- डॉ. सुधीर रसाळ

५. भूमिका घेणाऱ्या व्यक्ती

पुष्पा भावे यांची आणि माझी प्रत्यक्ष कधीही भेट झाली नाही; परंतु एक व्यक्ती म्हणून मला त्यांच्याबद्दल फार आदर होता, कारण त्या एक भूमिका घेणाऱ्या व्यक्ती होत्या. चांगल्या समीक्षक आणि चांगल्या अभ्यासू होत्या. त्यांनी व्यवस्थेच्या, सरकारच्या विरोधात नेहमी भूमिका घेतली आणि कायम आवाज उठवला.

-अनुराधा पाटील

टॅग्स :Deathमृत्यूPushpa Bhaveपुषा भावेAurangabadऔरंगाबाद