शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांचा आधार होत्या पुष्पाताई....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 12:54 IST

प्रसिद्ध विचारवंत, परखड समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे आणि औरंगाबदचे ऋणानुबंध होते. त्यांचे जाणे म्हणजे साहित्य, समाजकार्य या क्षेत्रात पोकळी निर्माण करणारे आहे. एक प्रेमळ, मृदू; परंतु वेळप्रसंगी तेवढेच कणखर आणि करारी व्यक्तिमत्त्व असलेल्या पुष्पाताई म्हणजे कार्यकर्त्यांचा आधार होत्या, अशा भावना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या.

औरंगाबाद : प्रसिद्ध विचारवंत, परखड समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे आणि औरंगाबदचे ऋणानुबंध होते. त्यांचे जाणे म्हणजे साहित्य, समाजकार्य या क्षेत्रात पोकळी निर्माण करणारे आहे. एक प्रेमळ, मृदू; परंतु वेळप्रसंगी तेवढेच कणखर आणि करारी व्यक्तिमत्त्व असलेल्या पुष्पाताई म्हणजे कार्यकर्त्यांचा आधार होत्या, अशा भावना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या.

१. कार्यकर्त्यांसाठी सदैव तत्पर

२००५ साली माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला पुष्पाताई प्रमुख भाष्यकार म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणातून त्यांची दिसून आलेली दूरदृष्टी अफलातून होती. भाषेवरचे प्रभुत्व थक्क करणारे होते. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, गोवामुक्ती, नामांतराचा लढा यासोबतच ७० च्या दशकातील सर्व लढ्यांच्या त्या साक्षीदार होत्या. मी तेव्हा वय आणि अनुभवाने लहान होते आणि त्या प्रत्येक बाबतीतच ज्येष्ठ होत्या; पण तरीही लहानांना समजून घेणे, मार्गदर्शन करणे या गोष्टी पुष्पाताईंनी नेहमीच केल्या. कार्यकर्त्यांसाठी त्या सदैव तयार असायच्या. सगळ्यांचे फोन उचलायचे आणि सगळ्यांशी बोलायचे, हा त्यांचा स्वभाव होता. आमच्या सगळ्यांसाठीच त्या आदर्श होत्या.- मंगल खिंवसरा

 

२. ... आणि मला पुन्हा परीक्षा देता आली

महाविद्यालयात असताना पुष्पाताई मला मराठी शिकवायच्या. शिक्षणाव्यतिरिक्त इतर सामाजिक कार्यातही त्या आम्हा विद्यार्थ्यांना कायम प्रोत्साहन द्यायच्या. इंदिरा गांधींच्या आणीबाणीविरुद्ध १९७५ साली आम्ही विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले होते. त्यासाठी त्यांचे खूप सहकार्य लाभले. एका बाजूला अभ्यास आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या गोष्टी यांचा समताेल सांभाळायलाही त्यांनीच शिकविले. चिडणे त्यांना कधी माहितीच नव्हते. एकदा महाविद्यालयाची परीक्षा चालू असताना मी माझा आसन क्रमांक विसरलो आणि चुकीच्या आसन क्रमांकावर जाऊन पोहाेचलो. त्या धांदलीत माझा पेपर बुडाला; पण बाईंनी तेव्हा मध्यस्ती केली. विद्यापीठातून परवानगी काढली आणि मला पुन्हा परीक्षा देता आली.

- शांताराम पंदेरे

३. त्यांच्या मार्गदर्शनाची संधी हुकली

एमए होण्याच्या आधी मला संशोधन शिष्यवृत्ती मिळाली होती. मला नाटकात पीएच.डी. करायची होती. त्यामुळे मुंबईला जा आणि पुष्पाताईंकडे कर, असा सल्ला मला अनेकांनी दिला. त्यानुसार मी पुष्पाताईंकडे गेलो. त्यांनीही तात्काळ होकार दिला; पण मला मुंबई न आवडल्याने मी १०-१५ दिवसांतच परत आलो. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी हुकली. मात्र, यानिमित्ताने आमचा चांगला कौटुंबिक स्नेह जुळला. औरंगाबादला येताना हमखास त्या मला निरोप करायच्या आणि मग आम्ही बसैयेकडचे त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना आवर्जून आणून द्यायचो. बलदंड राज्यसत्तेच्या विरोधात उभे राहिलेले ते एक कणखर व्यक्तिमत्त्व होते. त्या बोलत्या आणि कर्त्या सुधारक होत्या.

- डॉ. दासू वैद्य

४. तर्कशुद्ध मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य

पुष्पा भावे या अतिशय स्पष्ट वक्त्या होत्या. तेवढीच स्पष्ट त्यांची समीक्षाही होती. कोणत्याही गोष्टीचे अतिशय स्पष्ट मूल्यमापन करणे, त्यांना अगदी चपखल जमत होते. सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांना नेहमीच होती. साहित्य क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. रंगभूमीचा त्यांचा अभ्यास अतिशय सखोल होता. मराठी रंगभूमीविषयी त्यांनी जे लिहिले आहे, ते एक मूलभूत स्वरूपाचे लेखन आहे. अनंत भालेराव पुरस्कार प्रदान झाला तेव्हा त्यांची आणि माझी शेवटची भेट झाली होती. अतिशय तर्कशुद्ध मांडणी असायची आणि त्यामुळे त्यांची मते नाकारणे किंवा खोडून काढणे जवळपास अशक्य असायचे. त्यांनी फार लिखाण केले नाही; पण जे लिहिले ते अतिशय मौल्यवान आहे.

- डॉ. सुधीर रसाळ

५. भूमिका घेणाऱ्या व्यक्ती

पुष्पा भावे यांची आणि माझी प्रत्यक्ष कधीही भेट झाली नाही; परंतु एक व्यक्ती म्हणून मला त्यांच्याबद्दल फार आदर होता, कारण त्या एक भूमिका घेणाऱ्या व्यक्ती होत्या. चांगल्या समीक्षक आणि चांगल्या अभ्यासू होत्या. त्यांनी व्यवस्थेच्या, सरकारच्या विरोधात नेहमी भूमिका घेतली आणि कायम आवाज उठवला.

-अनुराधा पाटील

टॅग्स :Deathमृत्यूPushpa Bhaveपुषा भावेAurangabadऔरंगाबाद