शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

खंडपीठ स्थापनेचा उद्देश सफल झालाय; आता न्याय मिळवून देण्याची जबाबदारी तरुण वकिलांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 15:13 IST

औरंगाबाद खंडपीठाचा ३९ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम ऑनलाईन साजरा करण्यात आला

ठळक मुद्देखंडपीठातील ज्येष्ठ न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी केले मार्गदर्शन

औरंगाबाद :  दाखल आणि निकाली प्रकरणांची संख्या पाहता मराठवाड्यातील पक्षकारांना त्यांच्या दारात न्याय मिळत असल्याचे सिद्ध होते. परिणामी, मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाच्या स्थापनेचा उद्देश सफल झाला असला तरी न्यायापासून वंचित असलेल्या पक्षकारांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी तरुण वकिलांवर आहे, अशी भावना खंडपीठातील ज्येष्ठ न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी व्यक्त केली.  खंडपीठाच्या ३९ व्या वर्धापन दिनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत होते.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाच्या वर्धापन दिनानिमित्तच्या शुभेच्छा त्यांनी वाचून दाखविल्या. मुख्य न्यायमूर्ती सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात खंडपीठाला भेट देतील, असे त्यांनी सांगितले.खंडपीठ वकील संघाच्या सदस्यांमधून न्यायमूर्ती नरेश पाटील हे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर विराजमान झाले होते. त्याचप्रमाणे वकिलांमधून अनेकांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली तर अनेकांना ज्येष्ठ न्यायमूर्ती म्हणून खंडपीठाने नियुक्त केले. ज्युनिअर वकील ही परंपरा चालू ठेवतील, अशी आशा न्या. गंगापूरवाला यांनी व्यक्त केली.

खंडपीठ वकील संघाचे सचिव अ‍ॅड. शहाजी घाटोळ पाटील यांनी खंडपीठाच्या स्थापनेचा इतिहास सांगत वकिलांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले. लॉकडाऊन काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगद्वारे सुनावणी होत असल्यामुळे वकिलांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासंदर्भात तसेच प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याची विनंती त्यांनी केली. अ‍ॅड. अनघा पेडगावकर यांनी सूत्रसंचालन केले, तर वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अश्फाक पटेल यांनी आभार मानले.

खंडपीठात प्रलंबित प्रकरणे :- मूळ दिवाणी प्रकरणे ८३४०२ किरकोळ दिवाणी प्रकरणे ५६८७३ अशी एकूण  दिवाणी प्रकरणे १४०२७५

- मूळ फौजदारी प्रकरणे १७२४३किरकोळ फौजदारी प्रकरणे २९९८एकूण फौजदारी प्रकरणे २०२४१ 

- खंडपीठासाठी न्यायमूर्तींची मंजूर पदे  २२सध्या कार्यरत न्यायमूर्ती १२ 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबादCourtन्यायालय