शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

केळी, कमळाची मुळं, बुंध्यांपासून पाण्याचे शुद्धीकरण; अल्प किमतीत तयार होणार यंत्र

By राम शिनगारे | Updated: December 14, 2023 19:21 IST

तिन्ही प्राध्यापकांनी एकत्र येत केळी, कमळ आणि भाताच्या तनिसावर प्रक्रिया केली. त्यासाठी जलशुद्धीकरण करणाऱ्या स्वस्तातील यंत्राचे डिझाइन तयार केले.

छत्रपती संभाजीनगर : केळी, कमळाची मुळं, बुंध्यांसह भाताच्या तनिस (काड्या) या टाकाऊ पदार्थांपासून पाण्याचे शुद्धीकरण करता येते. त्यासाठी अतिशय स्वस्तातील जलशुद्धीकरण यंत्र बनविण्याची किमया तीन संशोधक प्राध्यापकांनी साधली आहे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. मदनलाल सूर्यवंशी आणि सोलापुरातील प्रा. सिद्रामाप्पा धरणे, प्रा. सिद्धराज कुंभार यांचा समावेश आहे.

यंत्र कसे व त्याचे कार्य कसे चालते?मद्रास आयआयटीमध्ये तिन्ही संशोधक प्राध्यापकांनी २०१९ साली पाण्याची क्षारता व तापमान तपासण्याविषयी ४० दिवसांचे प्रशिक्षण घेतले होते. या प्रशिक्षणानंतर तिन्ही प्राध्यापकांनी एकत्र येत केळी, कमळ आणि भाताच्या तनिसावर प्रक्रिया केली. त्यासाठी जलशुद्धीकरण करणाऱ्या स्वस्तातील यंत्राचे डिझाइन तयार केले. या डिझाइनच्या उपकरणाचे चार भाग केले. त्यातील पहिल्या भागामध्ये वरती तरंगणाऱ्या कमळाच्या मुळांचा आणि बुडाचे पावडर करून तरंगत्या स्वरूपात ठेवले. त्यानंतर दुसऱ्या थरात केळीच्या बुंध्यांचे फायबर व केळीच्या मुळापासून मिळालेले शुद्धीकरणाचे गुणधर्म ठेवण्यात आले. त्यात पुन्हा केळी व कमळाचे पावडर मिसळले. त्याचबरोबर तुरटीचा सर्वांत शेवटी वापर करून जल शुद्ध करण्यात आले. त्यानंतर पाण्यातील टीडीएस (क्षारतेचे प्रमाण) तपासले. तेव्हा जलशुद्धीकरणाच्या इतर उपलब्ध यंत्रांपेक्षा अतिशय किफायतशीर रिझल्ट प्राध्यापकांच्या संशोधनाला मिळाला आहे.

उपयोग काय होणार?केंद्र व राज्य शासन जनतेला शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. या शोधामुळे स्वस्तात जलशुद्धीकरण यंत्र उपलब्ध होणर आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना केळी, कमळाचा बुंधा, भाताचे तनिस या टाकाऊ पदार्थांपासून उत्पन्न मिळू शकणार आहे. हे जलशुद्धीकरण पूर्णत: नैसर्गिक घटकावर अवलंबून असल्यामुळे सेंद्रिय जलशुद्धीकरण करता येणार आहे.

संशोधनाला केंद्र शासनाचे पेटंटप्राध्यापकांनी तयार केलेल्या यंत्रासह जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेचा शोधप्रबंध प्रकाशित झाल्यानंतर त्याविषयीच्या पेटंटसाठी केंद्र शासनाच्या पेटंट कार्यालयाकडे १५ मार्च २०२२ रोजी नोंदणी केली. त्यानुसार पेटंट कार्यालयाने ८ डिसेंबर २०२३ रोजी तिन्ही प्राध्यापकांच्या संशोधनाला पेटंट जाहीर केले आहे.

मदनलाल सूर्यवंशींचे दोन प्रकल्प पूर्णविद्यापीठातील भूगोलचे विभागप्रमुख डॉ. मदनलाल सूर्यवंशी यांच्या संशोधनाला एक पेटंट जाहीर झाले आहे. तर, दुसरे एक पेटंट प्रकाशित झाले असून, त्यांनी दोन संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. आतापर्यंत ५० पेक्षा अधिक शोधनिबंधही त्यांनी प्रकाशित केले आहेत.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद