शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

केळी, कमळाची मुळं, बुंध्यांपासून पाण्याचे शुद्धीकरण; अल्प किमतीत तयार होणार यंत्र

By राम शिनगारे | Updated: December 14, 2023 19:21 IST

तिन्ही प्राध्यापकांनी एकत्र येत केळी, कमळ आणि भाताच्या तनिसावर प्रक्रिया केली. त्यासाठी जलशुद्धीकरण करणाऱ्या स्वस्तातील यंत्राचे डिझाइन तयार केले.

छत्रपती संभाजीनगर : केळी, कमळाची मुळं, बुंध्यांसह भाताच्या तनिस (काड्या) या टाकाऊ पदार्थांपासून पाण्याचे शुद्धीकरण करता येते. त्यासाठी अतिशय स्वस्तातील जलशुद्धीकरण यंत्र बनविण्याची किमया तीन संशोधक प्राध्यापकांनी साधली आहे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. मदनलाल सूर्यवंशी आणि सोलापुरातील प्रा. सिद्रामाप्पा धरणे, प्रा. सिद्धराज कुंभार यांचा समावेश आहे.

यंत्र कसे व त्याचे कार्य कसे चालते?मद्रास आयआयटीमध्ये तिन्ही संशोधक प्राध्यापकांनी २०१९ साली पाण्याची क्षारता व तापमान तपासण्याविषयी ४० दिवसांचे प्रशिक्षण घेतले होते. या प्रशिक्षणानंतर तिन्ही प्राध्यापकांनी एकत्र येत केळी, कमळ आणि भाताच्या तनिसावर प्रक्रिया केली. त्यासाठी जलशुद्धीकरण करणाऱ्या स्वस्तातील यंत्राचे डिझाइन तयार केले. या डिझाइनच्या उपकरणाचे चार भाग केले. त्यातील पहिल्या भागामध्ये वरती तरंगणाऱ्या कमळाच्या मुळांचा आणि बुडाचे पावडर करून तरंगत्या स्वरूपात ठेवले. त्यानंतर दुसऱ्या थरात केळीच्या बुंध्यांचे फायबर व केळीच्या मुळापासून मिळालेले शुद्धीकरणाचे गुणधर्म ठेवण्यात आले. त्यात पुन्हा केळी व कमळाचे पावडर मिसळले. त्याचबरोबर तुरटीचा सर्वांत शेवटी वापर करून जल शुद्ध करण्यात आले. त्यानंतर पाण्यातील टीडीएस (क्षारतेचे प्रमाण) तपासले. तेव्हा जलशुद्धीकरणाच्या इतर उपलब्ध यंत्रांपेक्षा अतिशय किफायतशीर रिझल्ट प्राध्यापकांच्या संशोधनाला मिळाला आहे.

उपयोग काय होणार?केंद्र व राज्य शासन जनतेला शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. या शोधामुळे स्वस्तात जलशुद्धीकरण यंत्र उपलब्ध होणर आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना केळी, कमळाचा बुंधा, भाताचे तनिस या टाकाऊ पदार्थांपासून उत्पन्न मिळू शकणार आहे. हे जलशुद्धीकरण पूर्णत: नैसर्गिक घटकावर अवलंबून असल्यामुळे सेंद्रिय जलशुद्धीकरण करता येणार आहे.

संशोधनाला केंद्र शासनाचे पेटंटप्राध्यापकांनी तयार केलेल्या यंत्रासह जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेचा शोधप्रबंध प्रकाशित झाल्यानंतर त्याविषयीच्या पेटंटसाठी केंद्र शासनाच्या पेटंट कार्यालयाकडे १५ मार्च २०२२ रोजी नोंदणी केली. त्यानुसार पेटंट कार्यालयाने ८ डिसेंबर २०२३ रोजी तिन्ही प्राध्यापकांच्या संशोधनाला पेटंट जाहीर केले आहे.

मदनलाल सूर्यवंशींचे दोन प्रकल्प पूर्णविद्यापीठातील भूगोलचे विभागप्रमुख डॉ. मदनलाल सूर्यवंशी यांच्या संशोधनाला एक पेटंट जाहीर झाले आहे. तर, दुसरे एक पेटंट प्रकाशित झाले असून, त्यांनी दोन संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. आतापर्यंत ५० पेक्षा अधिक शोधनिबंधही त्यांनी प्रकाशित केले आहेत.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद