शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

आरक्षणासह अन्य प्रश्नांसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

By बापू सोळुंके | Updated: August 2, 2022 19:35 IST

पुन्हा एकदा ‘एक मराठा, लाख मराठा’चा नारा

औरंगाबाद : मराठा आरक्षणासह प्रलंबित प्रश्नांसाठी आता आम्हाला आंदोलन करायला लावू नका, समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्य सरकारला करण्यात आले.

मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची बैठक मंगळवारी सिडको एन २ येथील एका हॉटेलमध्ये पार पडली. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीत मराठा आरक्षण सद्य:स्थिती आणि पर्याय, सारथीकडून मराठा विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठी बँकांकडून होत असलेली पिळवणूक, ईडब्ल्यूएस आदी विषयांवर चर्चा झाली.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील म्हणाले की, न्यायालयाने महावितरण कंपनीतील भरतीसंदर्भात दिलेल्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून राज्यातील तहसीलदारांनी मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र देण्याचे थांबविले आहे. हा निर्णय केवळ ‘महावितरण’च्या याचिकेपुरता मर्यादित आहे, असे असताना अधिकाऱ्यांनी परस्पर चुकीचा अर्थ काढून मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट घातला आहे. त्याचा मराठा क्रांती मोर्चा धिक्कार करतो. जोपर्यंत मराठा समाजाला दुसरे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ईडब्ल्यूएसचा लाभ घेऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारने तत्काळ याचा आढावा घेऊन ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना द्यावेत. बार्टी आणि महाज्योतीप्रमाणेच सारथीच्या विद्यार्थ्यांना सर्व लाभ देण्यात यावेत, तारादूतांची पुन्हा नेमणूक करावी, कोपर्डीच्या नराधमांनी उच्च न्यायालयात केलेल्या अपिलावर जलदगती न्यायालयात सुनावणी घेऊन आरोपींना तत्काळ फासावर लटकवा, आदी आमच्या मागण्या आहेत. या मागण्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने कालब्ध कार्यक्रम घोषित करावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

या बैठकीला सुरेश वाकडे, अभिजीत देशमुख, रवींद्र काळे, प्रा. चंद्रकांत भराट, सतीश वेताळ, सुनील कोटकर, मनोज गायके, गणेश काळे, सखाराम काळे, आप्पासाहेब कुढेकर, अभिजीत देशमुख, रमेश गायकवाड, राजगौरव वानखेडे, सुकन्या भोसले, रेखा वाहटुळे आदींसह समाजबांधवांची उपस्थिती होती.

तज्ज्ञ वकिलांची टीम नियुक्त करामराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. राज्य सरकारने या याचिकेचा निकाल सरकारच्या बाजूने लागावा, यासाठी तज्ज्ञ वकिलांची टीम नियुक्त करावी आणि हा प्रश्न आठ ते दहा दिवसांत मार्गी लावावा, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबाद