शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडे प्रकल्पासाठी शिर्डी संस्थानच्या निधीबाबतच्या जनहित याचिकेवर आता ७ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:19 IST

शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी देऊ केल्याबाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दैनंदिन खर्च वगळता इतर कोणत्याही कामासाठी संस्थानचा निधी ४ फेब्रुवारीपर्यंत वापरू नये, असा अंतरिम आदेश खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी दिला होता. सोमवारी (दि.४) याचिका सुनावणीस निघाली असता पुढील सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली.

ठळक मुद्दे मंदिरालगतचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय इतरत्र हलविण्यासंबंधी खंडपीठाची तोंडी विचारणा

औरंगाबाद : शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी देऊ केल्याबाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दैनंदिन खर्च वगळता इतर कोणत्याही कामासाठी संस्थानचा निधी ४ फेब्रुवारीपर्यंत वापरू नये, असा अंतरिम आदेश खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी दिला होता. सोमवारी (दि.४) याचिका सुनावणीस निघाली असता पुढील सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली.श्री साई मंदिरालगत असलेल्या उपविभागीय अधिकाºयांच्या कार्यालयावर नागरिकांचे मोर्चे येतात. त्यामुळे मंदिर परिसरातील शांतता भंग पावते. शिवाय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे कार्यालय इतरत्र हलविण्यासंबंधी खंडपीठाने तोंडी विचारणा केली. तसेच शिर्डी नगर परिषदेला संस्थानतर्फे स्वच्छतेसाठी निधी दिला जातो. मात्र, शिर्डीत देशातील इतर धार्मिक स्थळांइतकी स्वच्छता नसल्याची टिप्पणी खंडपीठाने केली.यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी ५०० कोटींचा निधी कोणत्या तरतुदीनुसार जाहीर केला, अशी विचारणा केली होती. स्वच्छतेसाठी शिर्डी संस्थान प्रतिवर्षी नगर परिषदेला ४२ लाख ४९ हजार ५९९ रुपये डिसेंबर २०१७ पासून देत असल्याचे अ‍ॅड. नितीन भवर यांनी सांगितले. शिर्डी नगर परिषदेच्या वतीने दिवाणी अर्ज दाखल करण्यात आला. साईबाबांचे भक्त संपूर्ण देशातून आणि परदेशातूनही दर्शनासाठी येतात. देशातील इतर धार्मिक स्थळांप्रमाणे शिर्डीत स्वच्छता का नाही, अशीही विचारणा खंडपीठाने यापूर्वीही केली होती. स्वच्छतेसंबंधीचा निधी नियमित कामकाजाचा भाग असल्याने खंडपीठाने त्यासंबंधी निर्बंध घातले नाही. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी संस्थानकडे जमा होणारा पैसा हा भाविकांचा आहे, तो धार्मिक कार्यासाठीच खर्च केला गेला पाहिजे, असे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले, तर राज्य शासनाच्या वतीने सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली. शिर्डी नगरपालिकेतर्फे अ‍ॅड. आश्विन होण आणि हस्तक्षेपक वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यातर्फे अ‍ॅड. सुरेश कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबादshirdiशिर्डी