शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

तांत्रिक मान्यतेसाठी पाणी योजनेचा प्रस्ताव ‘एमजेपी’कडे जाणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 15:58 IST

योजनेचे नगरविकास प्रधान सचिवांकडे सादरीकरण

ठळक मुद्दे शासन सकारात्मक असल्याची आयुक्तांची माहितीसमांतर पाणीपुरवठा योजना गुंडाळल्यानंतर नवे सादरीकरण

औरंगाबाद : शहरासाठी १५०० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मान्यता घेऊन सरकारकडे प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिली. डीपीआर आणि योजनेचे सादरीकरण पाहिल्यावर शासन सकारात्मक असल्याचे आयुक्तांनी सांगितले. 

गुरुवारी मंत्रालयात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे मनपा आयुक्त डॉ. निपुण व अधिकाऱ्यांनी १५०० कोटींच्या योजनेच्या प्राथमिक डीपीआरचे (सविस्तर प्रकल्प अहवाल) सादरीकरण केले. सचिव म्हैसकर यांनी काही मुद्दे योजनेच्या डीपीआरमध्ये नमूद करून पुन्हा शुक्रवारी मांडावेत, अशी सूचना केल्यानंतर २१ रोजी पुन्हा योजनेच्या डीपीआरचे बारकावे समजून घेतले जातील. पैठण ते नक्षत्रवाडी एमबीआर या ४५ कि़मी.च्या अंतरासाठी २२४५ मि. मी. व्यासाची जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यातून रोज ३६३ एमएलडी पाणी कसे मिळेल, हे डीपीआरमध्ये नमूद होते. समांतर पाणीपुरवठा योजना गुंडाळल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी मनपाने नवीन योजनेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. यात सातारा-देवळाईसाठी स्वतंत्र डीपीआर  होता. शासनाने दोन्ही डीपीआर एकत्रित पाठविण्याच्या सूचना केल्यानुसार महिनाभरात पीएमसीकडून (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार) एकत्रित डीपीआर मनपाने तयार करून घेऊन त्याचे गुरुवारी शासनाकडे सादरीकरण केले. 

मनपाने सादर केलेल्या डीपीआरमध्ये काही मुद्दे नमूद करण्याची सूचना प्रधान सचिवांनी केली. त्या माहितीचा समावेश करून २१ जून शुक्रवारी पुन्हा सादरीकरण करण्यात येणार आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजीपी) यांच्याकडून तांत्रिक मान्यता घेण्याची सूचना प्रधान सचिव म्हैसकर यांनी पालिकेला केली. त्यानुसार एमजीपीकडून तांत्रिक मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल. एमजीपीकडून तांत्रिक मान्यता मिळताच हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल. 

जलवाहिनी किती व्यासाची टाकावी १.शहराचा विस्तार पाहता जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २२०० ते २८०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकावी, असा प्रश्न प्रधान सचिवांनी सादरीकरणादरम्यान विचारला. २२०० मि. मी. जलवाहिनीसाठी १६०० कोटी रुपये, तर २८०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीसाठी २००० कोटींचा खर्च येईल. किती व्यासाची जलवाहिनी टाकायची याचा निर्णय मनपाला घ्यावा लागणार आहे. २.जलवाहिनीचा व्यास आणि इतर काही प्रश्न प्रधान सचिवांनी सादरीकरणादरम्यान उपस्थित केले. त्यानुसार शुक्रवारी पुन्हा योजनेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शासनाला योजनेतील सर्व टप्पे आवश्यक वाटल्यास पुढील आठ ते दहा दिवसांत पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. २८०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीसाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला केल्या. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादState Governmentराज्य सरकार