शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक मान्यतेसाठी पाणी योजनेचा प्रस्ताव ‘एमजेपी’कडे जाणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 15:58 IST

योजनेचे नगरविकास प्रधान सचिवांकडे सादरीकरण

ठळक मुद्दे शासन सकारात्मक असल्याची आयुक्तांची माहितीसमांतर पाणीपुरवठा योजना गुंडाळल्यानंतर नवे सादरीकरण

औरंगाबाद : शहरासाठी १५०० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मान्यता घेऊन सरकारकडे प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिली. डीपीआर आणि योजनेचे सादरीकरण पाहिल्यावर शासन सकारात्मक असल्याचे आयुक्तांनी सांगितले. 

गुरुवारी मंत्रालयात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे मनपा आयुक्त डॉ. निपुण व अधिकाऱ्यांनी १५०० कोटींच्या योजनेच्या प्राथमिक डीपीआरचे (सविस्तर प्रकल्प अहवाल) सादरीकरण केले. सचिव म्हैसकर यांनी काही मुद्दे योजनेच्या डीपीआरमध्ये नमूद करून पुन्हा शुक्रवारी मांडावेत, अशी सूचना केल्यानंतर २१ रोजी पुन्हा योजनेच्या डीपीआरचे बारकावे समजून घेतले जातील. पैठण ते नक्षत्रवाडी एमबीआर या ४५ कि़मी.च्या अंतरासाठी २२४५ मि. मी. व्यासाची जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यातून रोज ३६३ एमएलडी पाणी कसे मिळेल, हे डीपीआरमध्ये नमूद होते. समांतर पाणीपुरवठा योजना गुंडाळल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी मनपाने नवीन योजनेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. यात सातारा-देवळाईसाठी स्वतंत्र डीपीआर  होता. शासनाने दोन्ही डीपीआर एकत्रित पाठविण्याच्या सूचना केल्यानुसार महिनाभरात पीएमसीकडून (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार) एकत्रित डीपीआर मनपाने तयार करून घेऊन त्याचे गुरुवारी शासनाकडे सादरीकरण केले. 

मनपाने सादर केलेल्या डीपीआरमध्ये काही मुद्दे नमूद करण्याची सूचना प्रधान सचिवांनी केली. त्या माहितीचा समावेश करून २१ जून शुक्रवारी पुन्हा सादरीकरण करण्यात येणार आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजीपी) यांच्याकडून तांत्रिक मान्यता घेण्याची सूचना प्रधान सचिव म्हैसकर यांनी पालिकेला केली. त्यानुसार एमजीपीकडून तांत्रिक मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल. एमजीपीकडून तांत्रिक मान्यता मिळताच हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल. 

जलवाहिनी किती व्यासाची टाकावी १.शहराचा विस्तार पाहता जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २२०० ते २८०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकावी, असा प्रश्न प्रधान सचिवांनी सादरीकरणादरम्यान विचारला. २२०० मि. मी. जलवाहिनीसाठी १६०० कोटी रुपये, तर २८०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीसाठी २००० कोटींचा खर्च येईल. किती व्यासाची जलवाहिनी टाकायची याचा निर्णय मनपाला घ्यावा लागणार आहे. २.जलवाहिनीचा व्यास आणि इतर काही प्रश्न प्रधान सचिवांनी सादरीकरणादरम्यान उपस्थित केले. त्यानुसार शुक्रवारी पुन्हा योजनेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शासनाला योजनेतील सर्व टप्पे आवश्यक वाटल्यास पुढील आठ ते दहा दिवसांत पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. २८०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीसाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला केल्या. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादState Governmentराज्य सरकार