शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीसाठी थायलंडच्या राजदूतांना प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 6:51 PM

विमानतळावरून आजघडीला केवळ एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणातर्फे थायलंडच्या राजदूतांना औरंगाबादहून बँकॉकसह आशियाई देशांसाठी विमानसेवा सुरू करून आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीसाठी प्रस्ताव देण्यात आला. हा प्रस्ताव आता राजदूतांकडून वरिष्ठ पातळीवर जाणार असून, लवकरच त्यावर निर्णय होईल.

विमानतळावरून आजघडीला केवळ एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या तीन कंपन्यांच्या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि तिरुपतीशी हवाईसेवेने जोडलेले आहे. गेल्या दीड वर्षापासून विमानसेवा वाढविण्याचा विमानतळ प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी १६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हवाई कनेक्टिव्हिटीची परिस्थिती मांडली होती. तेव्हा औरंगाबाद शहर बँकॉक आणि टोकियोशी जोडण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

थायलंडचे राजदूत चुटिन्टोन गोंगस्कडी यांची ८ मार्च रोजी भेट घेऊन डी. जी. साळवे यांनी औरंगाबादहून बँकॉक आणि आशियाई देशांना आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीसाठी प्रस्ताव सादर केला. यावेळी चुटिन्टोन गोंगस्कडी प्रस्तावाबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. हा प्रस्ताव आता वरच्या पातळीवर पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे डी. जी. साळवे यांनी सांगितले. 

विमानतळ प्राधिक रणाकडून औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एअर विस्ताराकडून विमानसेवा सुरूकरण्याची तयारी दर्शविली. त्यांच्याकडून विमानसेवा सुरू होण्यासाठीही पाठपुरावा केला जात आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळण्याची गरज आहे. हे पाठबळ मिळाल्यास आगामी कालावधीत औरंगाबादहून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा विस्तार होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अजिंठा लेणींची प्रशंसाचुटिन्टोन गोंगस्कडी यांनी जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणींची प्रशंसा केली. येथील कला, चित्रकलेचे कौतुक करीत त्यांनी हे सर्वकाही अद्भुत असल्याचे म्हटले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळAirportविमानतळtourismपर्यटन