शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहन चालकांच्या ड्रायव्हिंग लायसन्स निलंबनाचे प्रस्ताव आरटीओकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 16:34 IST

दीड महिन्यात दोनशेहून अधिक वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव

ठळक मुद्दे२०० जणांवर होणार कारवाई  वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, सिग्नल तोडणे पडले महागात

औरंगाबाद : वारंवार आवाहन करूनही वाहतूक सिग्नल तोडणाऱ्या आणि मोबाईलवर बोलत दुचाकी पळविणाऱ्या वाहनचालकांचा वाहन परवाना (लायसन्स) निलंबित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. दीड महिन्यात दोनशेहून अधिक वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने आरटीओ कार्यालयाकडे पाठविल्याची माहिती समोर आली.  

याविषयी शहर वाहतूक पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाहतूक नियम न पाळल्याने रस्ता अपघात होतो, हे सर्वमान्य आहे. असे असताना अनेक वाहनचालक नियम न पाळता सुसाट वाहन पळविताना आढळतात. विशेषत: मोबाईलवर बोलत दुचाकी पळविणे आणि वाहतूक सिग्नल तोडून सुसाट जाणे सर्वाधिक धोकादायक आहे. ही बाब लक्षात घेऊन मोबाईलवर बोलत वाहन चालवू नका, सिग्नल तोडून जाऊ नका, असे आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीने अनेकदा वर्तमानपत्रांतून केले जाते. एवढेच नव्हे तर चौकाचौकांत  वाहतूक नियमन करणारे वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचारीही वाहनचालकांचे समुपदेशन करीत असतात.

मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत वाहनचालक वाहतूक नियम मोडून वाहने पळविणाऱ्या वाहनचालकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गतवर्षी तब्बल ९७ हजार  नागरिकांना वाहतूक नियम मोडून वाहन चालविताना पकडण्यात आले. या वाहनचालकांकडून सव्वातीन कोटी रुपये दंडही वसूल करण्यात आला. असे असले तरी दंडात्मक कारवाईचा कोणताही परिणाम वाहनचालकांवर होत नसल्याने त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासनाच्या आदेशाने शहर वाहतूक विभागातर्फे  पहिल्या टप्प्यात मोबाईलवर बोलत दुचाकी चालविणाऱ्या आणि सिग्नल तोडून पळणाऱ्या वाहनचालकांचे लायसन्स निलंबित करण्याचे प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्यास सुरुवात केली.

या अंतर्गत डिसेंबरपासून कालपर्यंत २१० वाहनचालकांना  मोबाईलवर बोलत दुचाकी चालविताना आणि सिग्नल तोडून जाताना पोलिसांनी पकडून त्यांचे लायसन्स जप्त केले. या वाहनचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव पोलिसांतर्फे संबंधित परिवहन अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले, अशी माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त एच.एस. भापकर यांनी दिली. 

आरटीओंना पोस्टाद्वारे पाठविले प्रस्तावपोलिसांनी कारवाईदरम्यान पकडलेल्या काही वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स हे बाहेरील जिल्ह्यांतील असतात. ज्या जिल्ह्याच्या आरटीओंनी लायसन्स दिले, त्याच आरटीओ कार्यालयाकडे कारवाईसाठी लायसन्स पाठवावे लागते. ही बाब लक्षात घेऊन बाहेरील जिल्ह्यांतील आरटीओंना स्पीड पोस्टाने लायसन्स आणि प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सिडको वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक हनुमंत गिरमे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRto officeआरटीओ ऑफीसtraffic policeवाहतूक पोलीस