शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

प्रचाराची बोलती बंद !

By admin | Updated: October 14, 2014 00:33 IST

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघा चोवीस तासांचा अवधी राहिला असून, गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी

  उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघा चोवीस तासांचा अवधी राहिला असून, गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या आहेत. बुधवारी सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. तत्पूर्वी पुढील चोवीस तासांत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून ‘गुपचूप’ प्रचारयंत्रणा राबविली जाणार आहे. दरम्यान, या कालावधीत कुठेही पैसे वाटपासारखे गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी आचारसंहिता पथक करडी नजर ठेऊन आहे. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकीचे वातावरण तापत होते. विद्यमान आमदारांसोबतच तिकिटाची खात्री असलेल्या काही उमेदवारांनीही निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून मतदारांशी संपर्क वाढवून निवडणुकीची जय्यत तयारी केली होती. १२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी केल्यानंतर प्रचारयंत्रणेला अधिक गती आली. गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावा-गावात जाऊन पदयात्रा, रॅली व मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचाराची राळ उडवून दिली होती. या निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तुळजापूरला केंद्रबिंदू मानून जिल्ह्यातील प्रचारयंत्रणा राबविली. श्री क्षेत्र तुळजापुरात भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाध्यक्ष शरद पवार, काँग्रेसकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर शिवसेनेच्या वतीने पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जंगी सभा झाल्या. तसेच परंडा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजीत पवार, भाजपाच्या वतीने रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर, तसेच पंकजा मुंडे तर कळंब येथे कळंब राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे व शिवसेनेकडून अमोल कोल्हे या स्टार प्रचारकांच्या सभा झाल्या. याशिवाय त्या-त्या पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सभा, पदयात्रांनी चारही मतदारसंघ ढवळून निघाले. अधिसूचना जाहीर झाल्यानंतर महायुती आणि आघाडीमधील जागा वाटपावरून सुरू झालेला घोळ बरेच दिवस चालला. त्यामुळे आघाडी, युती राहते की तुटते, याबाबत सुरूवातीचे काही दिवस चांगलीच चर्चा रंगली होती. शिवाय इच्छूक उमेदवारांतही संभ्रमावस्था होती. अशा परिस्थितीतच जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात विविध पक्ष तसेच अपक्ष अशा शंभराहून अधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अखेर आघाडी आणि युतीतील सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्याही वाढली. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर चार विधानसभा मतदारसंघात एकूण ५६ उमेदवार रिंगणात राहिले. यात उमरगा आणि तुळजापूर या दोन मतदारसंघात प्रत्येकी १३, परंडा मतदार संघात दहा तर उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात मात्र मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्य पक्षाचे सहा, नोंदणीकृत पक्षाचे सहा आणि अपक्ष आठ अशा वीस उमेदवारांचा समावेश आहे. जिल्ह्यात चार विधानभा मतदार संघात १२ लाख ३४ हजार ४९० मतदार आहेत. मतदार नोंदणी अभियानांतर्गत जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात १४ हजार १९ मतदारांची नव्याने नोंद झाली आहे. एकूण मतदारांमध्ये ६ लाख ६२ हजार ८५३ पुरुष तर ५ लाख ६९ हजार ६२३ महिला व १४ इतर मतदारांचा समावेश आहे. तुळजापूर मतदारसंघामध्ये १ लाख ७८ हजार ५२३ पुरूष व १ लाख ५१ हजार ६३५ महिला आणि सात इतर मतदार आहेत. उमरगा विधानसभा मतदार संघामध्ये १ लाख ५० हजार ९१३ पुरूष १ लाख ३० हजार ७६३ महिला आणि चार इतर मतदारांचा समावेश आहे. उस्मानाबादमध्ये १ लाख ७४ हजार ९८१ पुरुष, १ लाख ५१ हजार ४०४ महिला व दोन इतर तर परंडा मतदारसंघामध्ये पुरूष मतदारांची संख्या १ लाख ५८ हजार ४३६ तर १ लाख ३५ हजार ८२१ महिला मतदार आहेत. इतर मतदारांची संख्या एक इतकी आहे.