शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

शहर, जिल्हाध्यक्षांची निवड लांबणीवर

By admin | Updated: January 15, 2016 23:54 IST

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षात शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीवरून अंतर्गत गटबाजीला उधाण झाले आहे.

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षात शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीवरून अंतर्गत गटबाजीला उधाण झाले आहे. प्रदेशाध्यक्षांच्या अटोकाट प्रयत्नानंतरही दोन्ही पदांसाठी नावांवर स्थानिक पदाधिकारी राजी झालेले नाहीत. त्यामुळे आता ही निवडच लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी प्रदेशाध्यक्षांची निवड होणार आहे. त्यामुळे आता या निवडीनंतरच औरंगाबादच्या शहर आणि जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर केली जाणार असल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.राज्यात महिनाभरापासून भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार चार दिवसांपूर्वीच शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली. शहराध्यक्षपदासाठी संजय केणेकर, अनिल मकरिये, विजय साळवे, संजय जोशी, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात यांच्यासह सेनेतून भाजपमध्ये आलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी हेही इच्छुक आहेत. शहराध्यक्षांची निवड जाहीर करण्यासाठी शुक्रवारी कलश मंगल कार्यालयात दुपारी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती, पण त्याआधीच तनवाणी यांची नियुक्ती निश्चित झाल्याची कुणकुण शहरातील पदाधिकाऱ्यांना लागली. त्यामुळे पक्षाच्या बहुतांश आजी आणि माजी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन त्या विरोधात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे धाव घेतली. पक्षात नव्याने आलेल्यांनाच सर्व पदे वाटल्यास पक्षातील निष्ठावंतांनी काय करायचे, असा सवाल या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांना विचारला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दानवे यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही नावावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे शेवटी प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी शुक्रवारी शहराध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करायला लावला.