शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

भूकंपग्रस्तांच्या आरक्षणावर गंडांतर !

By admin | Updated: November 7, 2016 00:42 IST

किल्लारी १९९३ च्या प्रलयंकारी भूकंपानंतर भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या

सूर्यकांत बाळापुरे किल्लारी१९९३ च्या प्रलयंकारी भूकंपानंतर भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या असून, भूकंपग्रस्तांसाठी स्वतंत्र ३ टक्के आरक्षणही जाहीर केले होते. मात्र आता त्यात कपात करून २ टक्के आरक्षण ठेवले असले, तरी उमेदवार मिळत नसल्याचे कारण पुढे करून भूकंपग्रस्तांच्या आरक्षणावर गंडांतर आणले जात आहे.१९९३ च्या भूकंपामुळे लातूर जिल्ह्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये मनुष्य व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली होती. जगभरातून मदतीचा ओघ आला. मात्र पुनर्वसन अद्यापही समाधानकारक नाही. परिसरातील ४० टक्के लोकांना भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र नाही. घर वाटप केले आहे. मात्र कबाले नाही. मालकी हक्क नसल्याने प्रमाणपत्र प्रशासनाकडून मिळाले नाही. दरम्यान, शासनाने २००९ च्या निर्णयानुसार भूकंपग्रस्तांसाठी २ टक्के स्वतंत्र आरक्षण निश्चित केले. ज्या कुटुंबातील व्यक्तींचे भूकंपात निधन झाले आहे किंवा ज्यांचे घर पूर्णपणे कोसळले आहे, त्यांना शासनाने नवीन घर बांधून दिले आहे. अशा व्यक्तींचे पाल्य या आरक्षणासाठी पात्र ठरविले. या आरक्षणातून भूकंपग्रस्त भागातील अडीच हजार मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी मिळाली. मात्र अद्यापही २५ हजार मुलांना या आरक्षणाचा फायदा मिळाला नाही. यातील बहुतांश मुलांकडे भूकंपग्रस्त प्रमाणपत्रच नाही. केवळ घरांचा कबाला नसल्यामुळे प्रमाणपत्र मिळू शकले नाही. परिणामी, आरक्षण मिळण्यासही अडथळे येत आहेत. किल्लारी परिसरातील किल्लारी, येळवट, मंगरुळ, गुबाळ, सिरसल आदी ५२ गावांमध्ये भूकंपग्रस्त आरक्षणातून नोकरी मिळावी म्हणून जवळपास २५ हजार मुलांचे वेगवेगळ्या जाहिरातीनुसार अर्ज आहेत. परंतु, यातील बहुतांश मुलांकडे प्रमाणपत्र नाही. त्यामुळे आरक्षणातून डावलले जात आहे. विशेष म्हणजे भूकंपग्रस्तातील उमेदवार नसल्याने त्यांचे आरक्षण प्रकल्पग्रस्ताला दिले जात आहे. परिणामी, भूकंपग्रस्त नोकरीपासून वंचित राहत असल्याचा आरोप लातूर, उस्मानाबाद भूकंप कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार यांनी केला.