शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

भूकंपग्रस्तांच्या आरक्षणावर गंडांतर !

By admin | Updated: November 7, 2016 00:42 IST

किल्लारी १९९३ च्या प्रलयंकारी भूकंपानंतर भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या

सूर्यकांत बाळापुरे किल्लारी१९९३ च्या प्रलयंकारी भूकंपानंतर भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या असून, भूकंपग्रस्तांसाठी स्वतंत्र ३ टक्के आरक्षणही जाहीर केले होते. मात्र आता त्यात कपात करून २ टक्के आरक्षण ठेवले असले, तरी उमेदवार मिळत नसल्याचे कारण पुढे करून भूकंपग्रस्तांच्या आरक्षणावर गंडांतर आणले जात आहे.१९९३ च्या भूकंपामुळे लातूर जिल्ह्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये मनुष्य व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली होती. जगभरातून मदतीचा ओघ आला. मात्र पुनर्वसन अद्यापही समाधानकारक नाही. परिसरातील ४० टक्के लोकांना भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र नाही. घर वाटप केले आहे. मात्र कबाले नाही. मालकी हक्क नसल्याने प्रमाणपत्र प्रशासनाकडून मिळाले नाही. दरम्यान, शासनाने २००९ च्या निर्णयानुसार भूकंपग्रस्तांसाठी २ टक्के स्वतंत्र आरक्षण निश्चित केले. ज्या कुटुंबातील व्यक्तींचे भूकंपात निधन झाले आहे किंवा ज्यांचे घर पूर्णपणे कोसळले आहे, त्यांना शासनाने नवीन घर बांधून दिले आहे. अशा व्यक्तींचे पाल्य या आरक्षणासाठी पात्र ठरविले. या आरक्षणातून भूकंपग्रस्त भागातील अडीच हजार मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी मिळाली. मात्र अद्यापही २५ हजार मुलांना या आरक्षणाचा फायदा मिळाला नाही. यातील बहुतांश मुलांकडे भूकंपग्रस्त प्रमाणपत्रच नाही. केवळ घरांचा कबाला नसल्यामुळे प्रमाणपत्र मिळू शकले नाही. परिणामी, आरक्षण मिळण्यासही अडथळे येत आहेत. किल्लारी परिसरातील किल्लारी, येळवट, मंगरुळ, गुबाळ, सिरसल आदी ५२ गावांमध्ये भूकंपग्रस्त आरक्षणातून नोकरी मिळावी म्हणून जवळपास २५ हजार मुलांचे वेगवेगळ्या जाहिरातीनुसार अर्ज आहेत. परंतु, यातील बहुतांश मुलांकडे प्रमाणपत्र नाही. त्यामुळे आरक्षणातून डावलले जात आहे. विशेष म्हणजे भूकंपग्रस्तातील उमेदवार नसल्याने त्यांचे आरक्षण प्रकल्पग्रस्ताला दिले जात आहे. परिणामी, भूकंपग्रस्त नोकरीपासून वंचित राहत असल्याचा आरोप लातूर, उस्मानाबाद भूकंप कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार यांनी केला.