शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप हंगामाचे उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:21 IST

जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यात पाऊस झाला असला तरी त्याचा खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार नाही. ५० टक्क्यांपेक्षा जास्त खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा प्रशासनाने पिकांच्या बाबतीत आढावा घेण्याच्या सूचना प्रशासकीय पातळीवर केल्या असून, पुढील महिन्यात आणेवारीबाबत निर्णय होणे शक्य आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची चिंता कायम : कापूस, मका, सोयाबीनच्या पिकांवर होणार परिणाम; पुढील महिन्यात आणेवारी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यात पाऊस झाला असला तरी त्याचा खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार नाही. ५० टक्क्यांपेक्षा जास्त खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा प्रशासनाने पिकांच्या बाबतीत आढावा घेण्याच्या सूचना प्रशासकीय पातळीवर केल्या असून, पुढील महिन्यात आणेवारीबाबत निर्णय होणे शक्य आहे.जिल्ह्यात आजवर ५० टक्के पाऊस झाला आहे. १५ आॅगस्टनंतर झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी उत्पादन घटणार आहे. पावसाच्या तुलनेत पैठण, सिल्लोड, गंगापूर, खुलताबाद तालुके ५० टक्क्यांच्या आतच आहेत. ६७५ मि.मी. जिल्ह्याची पावसाची सरासरी असून, आजवर ३३८ मि.मी. पाऊस झाला आहे. ४६६ मि.मी. इतका पाऊस होणे अपेक्षित होते. ११७ मि.मी. इतका पावसाचा खंड आहे. त्यामुळे मुबलक पावसाअभावी जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात पाऊस होऊनही पिकांवरील संकट कायम आहे. त्या तालुक्यात कापूस व मका पिकांचे साधारणत: ५० टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. पैठण, फुलंब्री, गंगापूर तालुक्यांतही अशीच परिस्थिती आहे. सिल्लोड तालुक्यात खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादकतेत ३० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता आहे. खुलताबाद, कन्नड, सोयगाव तालुक्यांत पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र त्याचा फारसा फायदा होईल, अशी शक्यता नाही. जालना जिल्ह्यातील पिकांनी माना टाकल्या होत्या; परंतु आॅगस्टमधील पावसामुळे पिके तरली आहेत.पिकांची सद्य:स्थिती अशी...जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यात मक ा, कापूस पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. पैठण तालुक्यातील मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस पिकांचे उत्पादन घटणे शक्य आहे. गंगापूर तालुक्यात पिकांची परिस्थिती बिकट आहे. सिल्लोड तालुक्यातील या हंगामातील पिकांचे उत्पादन घटणार आहे.कन्नड, सोयगाव, खुलताबाद तालुक्यांत फारशी चांगली परिस्थिती नाही. काही ठिकाणी मक्यावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसतो आहे. कापसावर कीड पडली आहे. जालना व इतर जिल्ह्यांत कापसाच्या पिकावर बोंडअळी दिसून येत आहे. तुरीच्या पानांवर अळ्यांचा प्रभाव दिसतो आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र