शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप हंगामाचे उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:21 IST

जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यात पाऊस झाला असला तरी त्याचा खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार नाही. ५० टक्क्यांपेक्षा जास्त खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा प्रशासनाने पिकांच्या बाबतीत आढावा घेण्याच्या सूचना प्रशासकीय पातळीवर केल्या असून, पुढील महिन्यात आणेवारीबाबत निर्णय होणे शक्य आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची चिंता कायम : कापूस, मका, सोयाबीनच्या पिकांवर होणार परिणाम; पुढील महिन्यात आणेवारी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यात पाऊस झाला असला तरी त्याचा खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार नाही. ५० टक्क्यांपेक्षा जास्त खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा प्रशासनाने पिकांच्या बाबतीत आढावा घेण्याच्या सूचना प्रशासकीय पातळीवर केल्या असून, पुढील महिन्यात आणेवारीबाबत निर्णय होणे शक्य आहे.जिल्ह्यात आजवर ५० टक्के पाऊस झाला आहे. १५ आॅगस्टनंतर झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी उत्पादन घटणार आहे. पावसाच्या तुलनेत पैठण, सिल्लोड, गंगापूर, खुलताबाद तालुके ५० टक्क्यांच्या आतच आहेत. ६७५ मि.मी. जिल्ह्याची पावसाची सरासरी असून, आजवर ३३८ मि.मी. पाऊस झाला आहे. ४६६ मि.मी. इतका पाऊस होणे अपेक्षित होते. ११७ मि.मी. इतका पावसाचा खंड आहे. त्यामुळे मुबलक पावसाअभावी जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात पाऊस होऊनही पिकांवरील संकट कायम आहे. त्या तालुक्यात कापूस व मका पिकांचे साधारणत: ५० टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. पैठण, फुलंब्री, गंगापूर तालुक्यांतही अशीच परिस्थिती आहे. सिल्लोड तालुक्यात खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादकतेत ३० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता आहे. खुलताबाद, कन्नड, सोयगाव तालुक्यांत पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र त्याचा फारसा फायदा होईल, अशी शक्यता नाही. जालना जिल्ह्यातील पिकांनी माना टाकल्या होत्या; परंतु आॅगस्टमधील पावसामुळे पिके तरली आहेत.पिकांची सद्य:स्थिती अशी...जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यात मक ा, कापूस पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. पैठण तालुक्यातील मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस पिकांचे उत्पादन घटणे शक्य आहे. गंगापूर तालुक्यात पिकांची परिस्थिती बिकट आहे. सिल्लोड तालुक्यातील या हंगामातील पिकांचे उत्पादन घटणार आहे.कन्नड, सोयगाव, खुलताबाद तालुक्यांत फारशी चांगली परिस्थिती नाही. काही ठिकाणी मक्यावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसतो आहे. कापसावर कीड पडली आहे. जालना व इतर जिल्ह्यांत कापसाच्या पिकावर बोंडअळी दिसून येत आहे. तुरीच्या पानांवर अळ्यांचा प्रभाव दिसतो आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र