शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
3
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
4
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
5
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
6
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
7
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
8
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
9
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
10
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
11
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
12
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
13
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
14
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
15
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
16
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
17
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
18
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
19
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
20
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)

२ वर्षांपासून ‘पीएसआय’ परीक्षेची प्रक्रिया अपूर्ण;१५०० विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 16:50 IST

महापरीक्षा पोर्टल बंदमुळे परीक्षाही थांबल्या

ठळक मुद्देजाहिरातीनुसार १३ मे २०१८ रोजी पूर्वपरीक्षा घेण्यात आली. यातून ३८७ जणांची निवड होणार आहे. उर्वरित ११०० पेक्षा अधिक युवकांना अंतिम निकालात स्थान मिळणार नाही.

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे फेब्रुवारी २०१८ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदासाठी जाहिरात देण्यात आली होती. या परीक्षेची पूर्व, मुख्य आणि शारीरिक चाचणी परीक्षांसह मुलाखती घेण्यात आल्या आहेत. परंतु अंतिम निकाल जाहीर झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एमपीएससी आयोगातर्फे ३ फेब्रुवारी २०१८ रोजी अराजपत्रित अधिकारी- गट ब, राज्य करनिरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकपदासाठी जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीनुसार १३ मे २०१८ रोजी पूर्वपरीक्षा घेण्यात आली. त्यानंतर मुख्य परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली. यात पहिला टप्पा २ आॅगस्ट रोजी आणि दुसरा टप्पा २ सप्टेंबर २०१८ रोजी पार पडला. यानंतर आॅक्टोबर २०१९ मध्ये शारीरिक चाचणी घेण्यात आली. ही चाचणी परीक्षा चार महिने चालली. जानेवारी २०२० मध्ये चाचणी परीक्षा संपल्यानंतर महिनाभरापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. तरीही अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. पूर्व, मुख्य परीक्षेतील चाळणी होऊन शारीरिक चाचणी परीक्षा १५०० युवकांनी दिली आहे. 

हे युवक दोन वर्षांपासून या परीक्षेची तयारी करीत असल्यामुळे त्यांना इतर परीक्षांकडे लक्षही देता आले नाही. या जाहिरातीनुसार ३८७ जणांची निवड होणार आहे. त्यामुळे उर्वरित ११०० पेक्षा अधिक युवकांना अंतिम निकालात स्थान मिळणार नाही. या विद्यार्थ्यांना इतरही परीक्षेची तयारी करता येत नसल्यामुळे अंतिम निकाल जाहीर करण्याची मागणी परीक्षार्थींकडून करण्यात येत आहे. 

याशिवाय फेब्रुवारी २०१९ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदाची जाहिरात देण्यात आली होती. यात पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या मुख्य परीक्षेचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे. त्यामुळे यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची तात्काळ शारीरिक चाचणी घेऊन अंतिम निकाल त्वरीत जाहीर करण्याची मागणीही परीक्षार्थींनी केली आहे.

महापोर्टल बंद केले पुढे काय?भाजप सरकारच्या काळात विविध विभागांमधील पदभरतीसाठी महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या पोर्टलविषयी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष होता. सरकार बदलताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या मागणीनुसार महापोर्टलला मूठमाती दिली आहे. ही यंत्रणा बंद करतानाच पर्यायी यंत्रणा काय? असा सवाल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये चर्चिला जात आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद