शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कोट्यवधींच्या रस्त्यांवर खासगी पार्किंग; यंत्रणा गप्पगार, हजारो नागरिकांना विनाकारण त्रास

By मुजीब देवणीकर | Updated: October 13, 2022 14:11 IST

वाहतूक पोलीस, महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

- मुजीब देवणीकर औरंगाबाद : मागील काही वर्षांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून मुख्य रस्ते सिमेंट पद्धतीने गुळगुळीत करण्यात आले. या रस्त्यांचा वापर काही वाहनधारक खासगी पार्किंगसाठी करीत आहेत. त्यामुळे लाखो वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. ‘लोकमत’ने शहरातील काही रस्त्यांची पाहणी केली असता अत्यंत विदारक चित्र समोर आले.

शहराची वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे, तर वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. मात्र, या दोन्ही यंत्रणा जबाबदारीकडे दुर्लक्ष करीत आहेत. रिक्षाचालक पोलिसांच्या डोळ्यासमोर रस्त्यांवर, चौकाचौकांत थांबून प्रवासी बसवितात. त्यामुळे वाहतूक खोळंबते; परंतु पोलीस त्याकडे कानाडोळा करतात. अतिक्रमण आणि फेरीवाल्यांवर मनपा पाच, सहा महिन्यांमधून एखाद्या वेळी कारवाई करताना दिसते.

रस्त्यांवर वाहने उभे करण्याचा ट्रेण्ड वाढला आहे. आधी रस्त्याच्या डाव्या बाजूला चारचाकी वाहनांची एक रांग दिसत होती, आता चक्क दोन दोन रांगा दिसू लागल्या आहेत. मग वाहनधारकांना वापरण्यासाठी किती रस्ता शिल्लक राहील?

कोणत्या रस्त्यांवर समस्या गंभीर ?-सेव्हन हिल ते टीव्ही सेंटर हा रस्ता जवळपास ११ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आला. या रस्त्यावर ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहनांची पार्किंग करण्यात येते.-चिश्तिया चौक ते एन-६ स्मशानभूमीवर रोडवर एकाच बाजूला वाहनांची २४ तास पार्किंग पाहायला मिळते.-चिश्तिया चौक ते एन-१ या रस्त्यावर फळ विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे.-गजानन महाराज मंदिर ते सेव्हन हिल रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमणे आहेत. या अतिक्रमणांसमोर पार्किंग सुरू आहे.- रोशन गेट ते आझाद चौक या पाच कोटींच्या रस्त्यावर दुभाजकाला लागून दोन्ही बाजूने २४ तास पार्किंग केलेली वाहने असतात.- गजानन महाराज मंदिर ते जय भवानी चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड अतिक्रमणे, वाहनांची पार्किंग दिसून येते.- महावीर चौक ते पंचवटी चौकादरम्यान हातगाड्या व त्यासमोर रिक्षा उभ्या राहत असल्याने येथेही वाहतूक जाम होत असते.

दिवाळीत समस्या अधिक गंभीर बनतेदिवाळीच्या खरेदीनिमित्त शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणारे नागरिक बाजारपेठेत येतात. तेथे पार्किंगसाठी जागा नाही. नाइलाजास्तव नागरिक वाहने रस्त्यावरच उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

मनपा भंगार वाहने उचलतेअतिक्रमणे काढणे, रस्त्यावरील भंगार वाहने उचलण्याचे दायित्व महापालिकेकडे आहे. यापूर्वी दोन वेळेस लाखो रुपये खर्च करून जवळपास ४०० पेक्षा अधिक वाहने मनपाने थेट जप्त केली होती. कारवाई केली तरी दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी फेरीवाले विक्री करतात.- रवींद्र निकम, अतिरिक्त आयुक्त, मनपा

जागेवरच दंड आकारणी होतेशहर वाहतूक पोलीस नो पार्किंग झोनमध्ये लावलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांना नियमानुसार दंड आकारत आहेत. वाहतूक पोलिसांकडे वाहन ‘टो’ करून नेण्यासाठी एकच वाहन आहे. संबंधित वाहनधारकाला जागेवरच दंड आकारतो.- कैलास देशमाने, पोलीस निरीक्षक, वाहतूक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका