शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोट्यवधींच्या रस्त्यांवर खासगी पार्किंग; यंत्रणा गप्पगार, हजारो नागरिकांना विनाकारण त्रास

By मुजीब देवणीकर | Updated: October 13, 2022 14:11 IST

वाहतूक पोलीस, महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

- मुजीब देवणीकर औरंगाबाद : मागील काही वर्षांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून मुख्य रस्ते सिमेंट पद्धतीने गुळगुळीत करण्यात आले. या रस्त्यांचा वापर काही वाहनधारक खासगी पार्किंगसाठी करीत आहेत. त्यामुळे लाखो वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. ‘लोकमत’ने शहरातील काही रस्त्यांची पाहणी केली असता अत्यंत विदारक चित्र समोर आले.

शहराची वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे, तर वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. मात्र, या दोन्ही यंत्रणा जबाबदारीकडे दुर्लक्ष करीत आहेत. रिक्षाचालक पोलिसांच्या डोळ्यासमोर रस्त्यांवर, चौकाचौकांत थांबून प्रवासी बसवितात. त्यामुळे वाहतूक खोळंबते; परंतु पोलीस त्याकडे कानाडोळा करतात. अतिक्रमण आणि फेरीवाल्यांवर मनपा पाच, सहा महिन्यांमधून एखाद्या वेळी कारवाई करताना दिसते.

रस्त्यांवर वाहने उभे करण्याचा ट्रेण्ड वाढला आहे. आधी रस्त्याच्या डाव्या बाजूला चारचाकी वाहनांची एक रांग दिसत होती, आता चक्क दोन दोन रांगा दिसू लागल्या आहेत. मग वाहनधारकांना वापरण्यासाठी किती रस्ता शिल्लक राहील?

कोणत्या रस्त्यांवर समस्या गंभीर ?-सेव्हन हिल ते टीव्ही सेंटर हा रस्ता जवळपास ११ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आला. या रस्त्यावर ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहनांची पार्किंग करण्यात येते.-चिश्तिया चौक ते एन-६ स्मशानभूमीवर रोडवर एकाच बाजूला वाहनांची २४ तास पार्किंग पाहायला मिळते.-चिश्तिया चौक ते एन-१ या रस्त्यावर फळ विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे.-गजानन महाराज मंदिर ते सेव्हन हिल रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमणे आहेत. या अतिक्रमणांसमोर पार्किंग सुरू आहे.- रोशन गेट ते आझाद चौक या पाच कोटींच्या रस्त्यावर दुभाजकाला लागून दोन्ही बाजूने २४ तास पार्किंग केलेली वाहने असतात.- गजानन महाराज मंदिर ते जय भवानी चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड अतिक्रमणे, वाहनांची पार्किंग दिसून येते.- महावीर चौक ते पंचवटी चौकादरम्यान हातगाड्या व त्यासमोर रिक्षा उभ्या राहत असल्याने येथेही वाहतूक जाम होत असते.

दिवाळीत समस्या अधिक गंभीर बनतेदिवाळीच्या खरेदीनिमित्त शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणारे नागरिक बाजारपेठेत येतात. तेथे पार्किंगसाठी जागा नाही. नाइलाजास्तव नागरिक वाहने रस्त्यावरच उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

मनपा भंगार वाहने उचलतेअतिक्रमणे काढणे, रस्त्यावरील भंगार वाहने उचलण्याचे दायित्व महापालिकेकडे आहे. यापूर्वी दोन वेळेस लाखो रुपये खर्च करून जवळपास ४०० पेक्षा अधिक वाहने मनपाने थेट जप्त केली होती. कारवाई केली तरी दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी फेरीवाले विक्री करतात.- रवींद्र निकम, अतिरिक्त आयुक्त, मनपा

जागेवरच दंड आकारणी होतेशहर वाहतूक पोलीस नो पार्किंग झोनमध्ये लावलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांना नियमानुसार दंड आकारत आहेत. वाहतूक पोलिसांकडे वाहन ‘टो’ करून नेण्यासाठी एकच वाहन आहे. संबंधित वाहनधारकाला जागेवरच दंड आकारतो.- कैलास देशमाने, पोलीस निरीक्षक, वाहतूक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका