शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अभियानापेक्षा शेतकºयांचे सोयाबीनला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:38 IST

मागील दोन वर्षांपासून ग्रामस्तरावर विविध अभियानांचा मारा आहे. एक संपते न संपते तोच दुसरे सुरु होते. तेही लोकसहभागाचीच. त्यामुळे ग्रामस्थांना यात काही रसर् ंराहिला नाही.

संतोष भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील दोन वर्षांपासून ग्रामस्तरावर विविध अभियानांचा मारा आहे. एक संपते न संपते तोच दुसरे सुरु होते. तेही लोकसहभागाचीच. त्यामुळे ग्रामस्थांना यात काही रसर् ंराहिला नाही. आता १ ते १५ आॅक्टोबर पर्यंत ऐन सोयाबीन काढणीच्या हंगामात ‘ग्रामसमृद्धी व स्वच्छता पंधरवड्यासाठी’ अधिकारी कर्मचारी गावात जात आहेत. मात्र सगळेच सोयाबीन काढणीस जात असल्याने गावात कुणीच भेटत नसल्याने तसेच परतण्याची वेळ आली आहे.यापूर्वी ‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियानात प्रत्येक गावाच्या विकासाचे आराखडे बनविण्यात आले आहेत. त्यातून सध्यातरी काही निष्पन्न झाले नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. त्यानंतर हागणदारीमुक्तीचा नारा आला. त्यात काम सुरू होते न होते तोच ‘स्वच्छता हिच सेवा’ अभियान राबविण्यात आले. शेतीत काम नसल्याने लोकांनी त्यालाही चांगला प्रतिसाद दिला. ‘मिशन अंत्योदय’ यातून प्रत्येक गावातील गरिबी करण्यात येईल, असे सांगितले जाते. तसेच स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालयाचेही बांधकाम युद्धपातळीवर सुरु आहेत. कोणतेही अभियान आले की, दुष्काळाच्या काळात खिशालाच चाट लावून जात असल्यामुळे गावात अधिकाºयांची गाडी आली की, ग्रामस्थ थेट त्यांना कट मारत आहेत. आता १ ते १५ आॅक्टोबरदरम्यान ‘ग्रामसमृद्धी व स्वच्छता पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. अधिकारी व कर्मचाºयांना चक्क ग्रामस्थांचा शोध घ्यावा लागत असल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. या अभियानात पंधरा दिवसात कारावयाचे नियोजन तंतोतंत पद्धतीने केलेले आहे.मात्र अभियानात सोयाबीन काढणीमुळे ग्रामस्थच भेटत नसल्याने कर्मचारी ग्रामस्थांना विनवणी करण्यातच हैराण आहेत. यामध्ये १ आॅक्टोबर रोजी गावात पंधरवडाविषयक जाणीव जागृती, तर २ आॅक्टोबर रोजी प्रभातफेरी व ग्रामसभा, मिशन अंत्योदयअंतर्गत निवडलेल्या ग्रामपंचायतींच्या योजनेबाबत सविस्तर माहिती देणे, तसेच ३ ते ५ आॅक्टोबरदरम्यान, गावात स्वच्छता व आरोग्यविषयक जाणीव जागृती करणे, ६ ते ९ आॅक्टोबरमध्ये कृषी सभा घेऊन कृषीच्या मदतीने शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे. तर १० आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायत विकास आराखड्यात गावास माहिती देणे, ११ आॅक्टोबर रोजी मनरेगा, स्वच्छता, घनकचरा सांडपाणी व जलसंधारण बाबत कृती आराखडा, १२ आॅक्टोबर रोजी पीएमईजी लाभार्थ्यांची यादी वाचून दाखविणे व घरकुलांच्या कामासाठी सुरुवात, तर १३ व १४ आॅक्टोबर रोजी कौशल्य विकासाबाबत विविध योजनांची युवकांना माहिती देणे आणि शेवटी १५ आॅक्टोबर रोजी पंधरवड्यात केलेल्या कामाची व नियोजनाची माहिती गावकºयांना देणे व शासनास अहवाल देणे असे अतिशय सूक्ष्म नियोजन केले खरे; मात्र हा संपूर्ण कार्यक्रमच सोयाबीन कालावधीत असल्याने फार भयंकर परिस्थिती आहे. विशेष म्हणजे हे अभियान लोकसहभागातून असल्याने यासाठी लोकांचा सहभाग महवाचा असतो. मात्र सोयाबीन काढणीमुळे ते शक्य होत नसल्याचे समोर येत आहे. तसेच समारोपाचा फोटो कसा घ्या, हेही नियोजन केलेले आहे.