शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

अभियानापेक्षा शेतकºयांचे सोयाबीनला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:38 IST

मागील दोन वर्षांपासून ग्रामस्तरावर विविध अभियानांचा मारा आहे. एक संपते न संपते तोच दुसरे सुरु होते. तेही लोकसहभागाचीच. त्यामुळे ग्रामस्थांना यात काही रसर् ंराहिला नाही.

संतोष भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील दोन वर्षांपासून ग्रामस्तरावर विविध अभियानांचा मारा आहे. एक संपते न संपते तोच दुसरे सुरु होते. तेही लोकसहभागाचीच. त्यामुळे ग्रामस्थांना यात काही रसर् ंराहिला नाही. आता १ ते १५ आॅक्टोबर पर्यंत ऐन सोयाबीन काढणीच्या हंगामात ‘ग्रामसमृद्धी व स्वच्छता पंधरवड्यासाठी’ अधिकारी कर्मचारी गावात जात आहेत. मात्र सगळेच सोयाबीन काढणीस जात असल्याने गावात कुणीच भेटत नसल्याने तसेच परतण्याची वेळ आली आहे.यापूर्वी ‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियानात प्रत्येक गावाच्या विकासाचे आराखडे बनविण्यात आले आहेत. त्यातून सध्यातरी काही निष्पन्न झाले नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. त्यानंतर हागणदारीमुक्तीचा नारा आला. त्यात काम सुरू होते न होते तोच ‘स्वच्छता हिच सेवा’ अभियान राबविण्यात आले. शेतीत काम नसल्याने लोकांनी त्यालाही चांगला प्रतिसाद दिला. ‘मिशन अंत्योदय’ यातून प्रत्येक गावातील गरिबी करण्यात येईल, असे सांगितले जाते. तसेच स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालयाचेही बांधकाम युद्धपातळीवर सुरु आहेत. कोणतेही अभियान आले की, दुष्काळाच्या काळात खिशालाच चाट लावून जात असल्यामुळे गावात अधिकाºयांची गाडी आली की, ग्रामस्थ थेट त्यांना कट मारत आहेत. आता १ ते १५ आॅक्टोबरदरम्यान ‘ग्रामसमृद्धी व स्वच्छता पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. अधिकारी व कर्मचाºयांना चक्क ग्रामस्थांचा शोध घ्यावा लागत असल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. या अभियानात पंधरा दिवसात कारावयाचे नियोजन तंतोतंत पद्धतीने केलेले आहे.मात्र अभियानात सोयाबीन काढणीमुळे ग्रामस्थच भेटत नसल्याने कर्मचारी ग्रामस्थांना विनवणी करण्यातच हैराण आहेत. यामध्ये १ आॅक्टोबर रोजी गावात पंधरवडाविषयक जाणीव जागृती, तर २ आॅक्टोबर रोजी प्रभातफेरी व ग्रामसभा, मिशन अंत्योदयअंतर्गत निवडलेल्या ग्रामपंचायतींच्या योजनेबाबत सविस्तर माहिती देणे, तसेच ३ ते ५ आॅक्टोबरदरम्यान, गावात स्वच्छता व आरोग्यविषयक जाणीव जागृती करणे, ६ ते ९ आॅक्टोबरमध्ये कृषी सभा घेऊन कृषीच्या मदतीने शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे. तर १० आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायत विकास आराखड्यात गावास माहिती देणे, ११ आॅक्टोबर रोजी मनरेगा, स्वच्छता, घनकचरा सांडपाणी व जलसंधारण बाबत कृती आराखडा, १२ आॅक्टोबर रोजी पीएमईजी लाभार्थ्यांची यादी वाचून दाखविणे व घरकुलांच्या कामासाठी सुरुवात, तर १३ व १४ आॅक्टोबर रोजी कौशल्य विकासाबाबत विविध योजनांची युवकांना माहिती देणे आणि शेवटी १५ आॅक्टोबर रोजी पंधरवड्यात केलेल्या कामाची व नियोजनाची माहिती गावकºयांना देणे व शासनास अहवाल देणे असे अतिशय सूक्ष्म नियोजन केले खरे; मात्र हा संपूर्ण कार्यक्रमच सोयाबीन कालावधीत असल्याने फार भयंकर परिस्थिती आहे. विशेष म्हणजे हे अभियान लोकसहभागातून असल्याने यासाठी लोकांचा सहभाग महवाचा असतो. मात्र सोयाबीन काढणीमुळे ते शक्य होत नसल्याचे समोर येत आहे. तसेच समारोपाचा फोटो कसा घ्या, हेही नियोजन केलेले आहे.