शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

प्राचार्यांनी परीक्षेवरून काढले विद्यापीठ प्रशासनाचे वाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 13:43 IST

या परीक्षेत दुरुस्त्या केल्या नाहीत, तर आगामी मार्च महिन्यातील परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने १५ आॅक्टोबरपासून पदवी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. यासाठी संलग्न महाविद्यालयांतील प्राचार्यांची बैठक बुधवारी बोलावण्यात आली होती. प्राचार्य आणि त्यांच्या प्रतिनिधींनी बैठकीत विद्यापीठ प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढले. या परीक्षेत दुरुस्त्या केल्या नाहीत, तर आगामी मार्च महिन्यातील परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक नाट्यगृहात बुधवारी (दि.३) बोलावली होती. या बैठकीला प्राचार्य किंवा त्यांच्या प्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर अध्यक्षस्थानी होते. कुलसचिव डॉ. साधना पांडे, परीक्षा संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. संजय सोळुंके, डॉ. संजीवनी मुळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. हरिदास विधाते, डॉ. दिगंबर नेटके यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या बैठकीत डॉ. तेजनकर यांनी परीक्षेच्या कालावधीत सहकार्य करण्याचे आवाहन करीत महाविद्यालयांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट केले; मात्र प्राचार्यांनी प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारची चिरफाड केली.

वसंतराव नाईकचे प्राचार्यांचे प्रतिनिधी डॉ. विक्रम खिलारे म्हणाले, परीक्षेसाठी प्रतिविद्यार्थी ३ रुपये देण्यात येतात. हा निधी अतिशय तोकडा आहे. झेरॉक्सपासून शाई, गम, स्टेपलर आदी खर्च मोठ्या प्रमाणात आहे. हा खर्च प्राध्यापक, प्राचार्यांना स्वत:च्या खिशातून करावा लागतो. तासिका तत्त्वावरचे प्राध्यापक, पूर्णवेळ प्राध्यापकांनी परीक्षेच्या काळात केलेल्या कामाचा मोबदला देण्यात येत नाही. हा सगळा खर्च विद्यापीठाने दिला पाहिजे. परीक्षा शुल्काच्या माध्यमातून विद्यापीठाकडे काही कोटी रुपये जमा होतात. त्या तुलनेत विद्यापीठ परीक्षेसाठी किती खर्च करते? याची आकडेवारी जाहीर करण्याची मागणीही डॉ. खिलारे यांनी केली.

‘नॉनसेन्स’ प्रशासनमागील दोन वर्षांपासून परीक्षा घेतल्याचा मोबदला महाविद्यालयाला दिलेला नाही. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी सहकार्य करीत नाहीत. परीक्षेत प्राचार्यांना स्थानिक प्रमुख बनविण्यात येते. हे बदलले पाहिजे. प्राचार्य त्यांच्या अंतर्गत कोणत्याही व्यक्तीची नेमणूक करू शकतात. त्यांना ती मुभा दिली पाहिजे. त्यास इतर प्राचार्यांनीही जोरदार प्रतिसाद दिला; मात्र हे प्रशासन नॉनसेन्स असल्यामुळे काहीच करीत नसल्याचा त्रागाही एम. पी.लॉचे प्र्राचार्य डॉ.  सी. एम. राव यांनी व्यक्त केला. या शब्दावर अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे यांनी आक्षेप घेतला तेव्हा डॉ. राव यांनी शब्द मागे घेत त्या शब्दाबद्दल माफीही मागितली; मात्र प्रशासन सुधारण्याचे साकडे यावेळी घातले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादexamपरीक्षाcollegeमहाविद्यालय