शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

हमीभाव वाढताच बाजारात महागल्या डाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 1:28 AM

केंद्र सरकारने खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली; मात्र त्याचा त्वरित परिणाम खुल्या बाजारपेठेत दिसून आला. सर्व प्रकारच्या डाळी क्विंटलमागे १०० ते १ हजार रुपयांदरम्यान महागल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔैरंगाबाद : केंद्र सरकारने खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली; मात्र त्याचा त्वरित परिणाम खुल्या बाजारपेठेत दिसून आला. सर्व प्रकारच्या डाळी क्विंटलमागे १०० ते १ हजार रुपयांदरम्यान महागल्या आहेत.केंद्र सरकारने बुधवारी कापसापासून ते तुरीपर्यंतच्या पिकाचे हमीभाव वाढविले आहेत. यात उडीद २०० रुपयांनी वाढून ५६०० रुपये, ज्वारी ७३० रुपयांनी वाढवून २४३० रुपये, तर मुगाच्या हमीभावात १४०० रुपये वाढ करीत ६९७५ रुपये दिला आहे. हा हमीभाव शेतकऱ्यांना मिळाला तर त्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे; मात्र हमीभाव वाढीच्या नावाखाली व्यापाºयांनी आताच डाळींचे भाव वाढविले आहेत. व्यापारी आणि डाळ मिल चालकांकडे गतवर्षीच्या हमीभावानुसार खरेदी केलेली डाळ आहे. मागील हंगामातील डाळी व्यापाºयांकडे मोठ्या प्रमाणावर आहेत; मात्र आता सरकारने शेतकºयांना वाढीव हमीभाव जाहीर केल्यानंतर हमीभाव वाढीच्या नावाखाली मागील हंगामातील डाळींचे भाव आता वाढविण्यात आले आहेत. या प्रकारामुळे साठेबाजांनी आपले उखळ पांढरे करणे सुरू केले आहे.अशी झाली दरवाढमागील हंगामातील मूग डाळ ८०० ते १००० रुपयांनी कडाडून ६८०० ते ७२०० रुपये प्रतिक्विंटल दराने शुक्रवारी आणि शनिवारी विकली जात होती. हरभरा डाळ ३०० रुपयांनी वधारून ४२०० ते ४५०० रुपये, मसूर डाळ, २०० रुपयांनी महागून अनुक्रमे ४५०० ते ५२०० रुपये व ४६०० ते ४८०० रुपये, तर तूर डाळीत १५० रुपयांनी वाढ होत ५३०० ते ५५०० रुपये, तर मठ डाळ १०० रुपयांनी वधारून ५२०० ते ५४०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे.व्यापाºयांनी सांगितले की, डाळींच्या भावात आणखी २०० ते ३०० रुपयांची वाढ होऊ शकते. परिणामी याचा फटका सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. नवीन मूग व उडीद डाळ बाजारात येण्यास अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तूर डाळ डिसेंबर-जानेवारीत, तर हरभरा डाळ मार्च महिन्यात बाजारात येईल. कर्नाटकात उन्हाळी मूग मोठ्या प्रमाणात आल्याने मध्यंतरी मुगाचे भाव घटले होते.मागील हंगामातील मूग, तूर, उडीद, मठ, हरभरा, मसूर शेतकºयांनी विकून टाकली आहे. आता सर्व डाळींचा बंपर साठा डाळ मिल व साठेबाजांच्या हातात आहे. हमीभावाचा फायदा आगामी खरीप हंगामात पीक आल्यानंतरच होणार आहे; पण त्याआधीच मागील वर्षीच्या कमी भावात खरेदी केलेल्या डाळी चढ्या भावात विकून साठेबाज ग्राहकांना चुना लावत आहेत.

टॅग्स :MarketबाजारAgriculture Sectorशेती क्षेत्र