शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

‘त्या’ तुरीने उतरले डाळींचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:18 IST

शासनाने ५५ रुपयांनी खरेदी केलेली तुरीची डाळ स्वस्त धान्य दुकानावर अवघ्या ३५ रुपये किलोने मिळत आहे. याचा परिणाम खुल्या बाजारपेठेतील डाळींच्या किमतीवर झाला आहे. उडीद, हरभरा, मूग, मसूर डाळींचे भाव क्ंिवटलमागे ३०० ते ८०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. या मंदीस मठ डाळ मात्र अपवाद ठरली आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद धान्य बाजारपेठ : क्ंिवटलमागे ३०० ते ८०० रुपयांपर्यंत घट; मठ डाळ मात्र वधारली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शासनाने ५५ रुपयांनी खरेदी केलेली तुरीची डाळ स्वस्त धान्य दुकानावर अवघ्या ३५ रुपये किलोने मिळत आहे. याचा परिणाम खुल्या बाजारपेठेतील डाळींच्या किमतीवर झाला आहे. उडीद, हरभरा, मूग, मसूर डाळींचे भाव क्ंिवटलमागे ३०० ते ८०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. या मंदीस मठ डाळ मात्र अपवाद ठरली आहे.अडत बाजारात तुरीचे भाव घसरले असताना शासनाने ५५०० रुपये क्ंिवटल हमीभाव देऊन शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केली. या शासकीय तुरीची डाळ स्वस्त धान्य दुकानातून ३५ रुपये प्रतिकिलोने विकण्याचा निर्णय शासनाने घेतला. चालू महिन्याच्या मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने डाळींचे भाव वधारण्यास सुरुवात झाली होती. पण स्वस्त धान्य दुकानात ५०० क्ंिवटल तूर डाळ विक्रीला येताच खुल्या बाजारातील तूर डाळीच्या भावात क्ंिवटलमागे ४०० ते ५०० रुपयांनी घट झाली असून, सध्याचा भाव ५१०० ते ५५०० रुपये आहे. विदेशातूनही तुरीची आवक होत असल्याने त्याचाही परिणाम दिसून आला. चालू महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने हजेरी लावल्याने अन्य डाळींचे भावही कमी झाले.तब्बल ८०० रुपयांनी गडगडून ३८०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलवर येऊन ठेपली आहे. ५०० रुपयांनी घसरून हरभरा डाळ ३९०० ते ४२०० रुपये, मूग डाळ ४०० रुपयांनी कमी होऊन ५८०० ते ६२०० रुपये तर मसूर डाळ ३०० रुपयांनी स्वस्त होऊन ३९०० ते ४२०० रुपये प्रतिक्ंिवटलने विक्री होत आहे. मात्र, या मंदीत मठ डाळीने आपला भाव वाढवून घेतला आहे. यासंदर्भात डाळीचे विक्रेते नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, शालेय आहारात मठ डाळीचा वापर होत असतो. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर ४०० रुपयांनी वधारून मठ डाळ सध्या ५२०० ते ५५०० रुपये प्रतिक्ंिवटल विकल्या जात आहे.मागील पाच महिन्यांत डाळींच्या भावात मोठी घसरणमागील पाच महिन्यांत डाळींच्या भावात मोठी घसरण पाहण्यास मिळाली. यात क्ंिवटलमागे भाव २३०० ते २६०० रुपये गडगडल्याने सर्वाधिक मंदी उडीद डाळीत नोंदविण्यात आली. त्यानंतर मूग डाळ १७०० ते १८०० रुपये, हरभरा डाळ १२०० ते १३०० रुपये, तूर डाळ ९०० ते १००० रुपये, तर मसूर डाळीचे भाव ८०० रुपये प्रतिक्ंिवटलमागे कमी झाले आहेत. आताचे भाव लक्षात घेता यंदा मार्च, एप्रिलमध्ये वार्षिक धान्य खरेदी करणाºयांना यंदा डाळी महाग पडल्या.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबादfoodअन्न