शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘त्या’ तुरीने उतरले डाळींचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:18 IST

शासनाने ५५ रुपयांनी खरेदी केलेली तुरीची डाळ स्वस्त धान्य दुकानावर अवघ्या ३५ रुपये किलोने मिळत आहे. याचा परिणाम खुल्या बाजारपेठेतील डाळींच्या किमतीवर झाला आहे. उडीद, हरभरा, मूग, मसूर डाळींचे भाव क्ंिवटलमागे ३०० ते ८०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. या मंदीस मठ डाळ मात्र अपवाद ठरली आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद धान्य बाजारपेठ : क्ंिवटलमागे ३०० ते ८०० रुपयांपर्यंत घट; मठ डाळ मात्र वधारली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शासनाने ५५ रुपयांनी खरेदी केलेली तुरीची डाळ स्वस्त धान्य दुकानावर अवघ्या ३५ रुपये किलोने मिळत आहे. याचा परिणाम खुल्या बाजारपेठेतील डाळींच्या किमतीवर झाला आहे. उडीद, हरभरा, मूग, मसूर डाळींचे भाव क्ंिवटलमागे ३०० ते ८०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. या मंदीस मठ डाळ मात्र अपवाद ठरली आहे.अडत बाजारात तुरीचे भाव घसरले असताना शासनाने ५५०० रुपये क्ंिवटल हमीभाव देऊन शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केली. या शासकीय तुरीची डाळ स्वस्त धान्य दुकानातून ३५ रुपये प्रतिकिलोने विकण्याचा निर्णय शासनाने घेतला. चालू महिन्याच्या मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने डाळींचे भाव वधारण्यास सुरुवात झाली होती. पण स्वस्त धान्य दुकानात ५०० क्ंिवटल तूर डाळ विक्रीला येताच खुल्या बाजारातील तूर डाळीच्या भावात क्ंिवटलमागे ४०० ते ५०० रुपयांनी घट झाली असून, सध्याचा भाव ५१०० ते ५५०० रुपये आहे. विदेशातूनही तुरीची आवक होत असल्याने त्याचाही परिणाम दिसून आला. चालू महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने हजेरी लावल्याने अन्य डाळींचे भावही कमी झाले.तब्बल ८०० रुपयांनी गडगडून ३८०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलवर येऊन ठेपली आहे. ५०० रुपयांनी घसरून हरभरा डाळ ३९०० ते ४२०० रुपये, मूग डाळ ४०० रुपयांनी कमी होऊन ५८०० ते ६२०० रुपये तर मसूर डाळ ३०० रुपयांनी स्वस्त होऊन ३९०० ते ४२०० रुपये प्रतिक्ंिवटलने विक्री होत आहे. मात्र, या मंदीत मठ डाळीने आपला भाव वाढवून घेतला आहे. यासंदर्भात डाळीचे विक्रेते नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, शालेय आहारात मठ डाळीचा वापर होत असतो. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर ४०० रुपयांनी वधारून मठ डाळ सध्या ५२०० ते ५५०० रुपये प्रतिक्ंिवटल विकल्या जात आहे.मागील पाच महिन्यांत डाळींच्या भावात मोठी घसरणमागील पाच महिन्यांत डाळींच्या भावात मोठी घसरण पाहण्यास मिळाली. यात क्ंिवटलमागे भाव २३०० ते २६०० रुपये गडगडल्याने सर्वाधिक मंदी उडीद डाळीत नोंदविण्यात आली. त्यानंतर मूग डाळ १७०० ते १८०० रुपये, हरभरा डाळ १२०० ते १३०० रुपये, तूर डाळ ९०० ते १००० रुपये, तर मसूर डाळीचे भाव ८०० रुपये प्रतिक्ंिवटलमागे कमी झाले आहेत. आताचे भाव लक्षात घेता यंदा मार्च, एप्रिलमध्ये वार्षिक धान्य खरेदी करणाºयांना यंदा डाळी महाग पडल्या.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबादfoodअन्न