शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मुलींचे गळतीचे प्रमाण रोखणार

By admin | Updated: October 7, 2014 00:14 IST

जालना : शिक्षणातील मुलीची गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागत विविध माध्यमातून प्रयत्न करत असल्याचे मत

जालना : शिक्षणातील मुलीची गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागत विविध माध्यमातून प्रयत्न करत असल्याचे मत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आर. पी. पाटील यांनी व्यक्त केले.सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शुक्रवारी इंदेवाडी येथील कस्तुरबा गांधी विद्यालय येथ मुलींच्या आरोग्य विषयक दोन दिवशीय कार्यशाळेचे उद्घाटन रविवारी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूणे विस्तार अधिकारी रवि जोशी प्रा बाबासाहेब जुंबड यांची उपस्थिती होती.यावेळी बोलतांना पाटील यांनी मुलीच्या सर्वागीन विकास करण्यासाठी मुलीचे शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे . त्यासाठी मानसिक वाढ होणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी नमूद केले.त्यासाठी प्राथमिक विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात मुलींचे शिक्षणात गळतीेचे प्रमाण कमी करण्यासाठी सी.ई.ओ. प्रेरणा देशभ्रतार यांनी ग्रामीण भागात अनेक कार्यशाळा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालकवर्गाला आपल्या मुलींना दररोज शाळेत पाठविण्याचे आवाहन करत आहोत. मुलीं मध्ये जनजागृती करण्यासाठी आणि गैरसमजूती दूर करण्यासाठी शिक्षण विभागतर्फे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थीनीची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्त विद्यार्थीनीना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी रमेश पाटील, प्रा. सुहास सदाव्रते आदीची उपस्थिती होती. या कार्यशाळेत मान्यवरांनी विविध विषयाच्या अनुषंगाने तपशीलवार मते मांडली. तसेच या योजनेतील यश-अपयश यासंदर्भातील चर्चा केली व योजना अधिकाधिक यशस्वी व्हावी म्हणून सर्वार्थाने प्रयत्न व्हावेत, असे म्हटले. (प्रतिनिधी)