शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबाद शहरात येणारी जड वाहने रोखण्यासाठी पोलिसांचे ‘संरक्षक कडे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 19:28 IST

‘नो एन्ट्रीत घुसखोरी सुरूच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ४ डिसेंबर रोजी   प्रकाशित केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी तडकाफडकी वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचा-यांची दुस-या दिवशी बैठक घेतली.

ठळक मुद्देवाहतूक शाखेने पोलीस ठाण्याच्या मदतीने शहराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावरच जड वाहने रोखण्यासाठी ‘संरक्षक कडे’ उभारल्याचे समोर आले. तीन दिवसांत ४२ जड वाहनांवर कारवाई

औरंगाबाद : ‘नो एन्ट्रीत घुसखोरी सुरूच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ४ डिसेंबर रोजी   प्रकाशित केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी तडकाफडकी वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचा-यांची दुस-या दिवशी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नो एन्ट्रीमध्ये एकही जड वाहन आणि खाजगी बस शहरात  प्रवेश करणार  नाही, यासाठी खबरदारी घेण्याचे आदेशित केले. यानंतर वाहतूक शाखेने पोलीस ठाण्याच्या मदतीने शहराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावरच जड वाहने रोखण्यासाठी ‘संरक्षक कडे’ उभारल्याचे समोर आले. 

याविषयी मिळालेली माहिती अशी की, गत सप्ताहात शहरात तीन वाहन अपघातात चार जणांचे बळी गेले. यात दोन अपघात जड वाहनांमुळे, तर तिसरा अपघात खाजगी बसमुळे झाला होता. जड वाहनांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी शहर पोलिसांनी एका अधिसूचनेद्वारे सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत नो एन्ट्री जाहीर केली. शिवाय लक्झरी बसेसनाही सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत नो एन्ट्री दुस-या अधिसूचनेनुसार करण्यात आली. असे असताना शहरात जड वाहने सुसाट घुसखोरी करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ४ डिसेंबर रोजी प्रकाशित केले. या वृत्ताची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी वाहतूक विभागातील अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नियमांचे उल्लंघन करून शहरात प्रवेश करणाºया वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले. याविषयी बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की, आता सर्व प्रकारची जड वाहने दिवसभर आम्ही शहराबाहेर ठेवणार आहोत. सध्या जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, डिझेल, गॅसची वाहतूक करणा-या वाहनांना प्रवेश दिला जातो. आता या वाहनांना प्रवेश न देण्याविषयी प्रशासन विचार करीत आहे. 

आता प्रवेशद्वारावर अडविणार जड वाहनेशहराच्या प्रवेशदारातच जड वाहने अडविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला, अशी माहिती सिडको वाहतूक शाखेचे निरीक्षक एच.व्ही. गिरमे यांनी दिली. ते म्हणाले की, बीड बायपास रोडवरील देवळाई चौकातून शिवाजीनगरमार्गे शहरात येणारी वाहने देवळाई चौकात तर झाल्टा फाटा, सावंगी वळण रस्ता आणि जालन्याकडून येणारी वाहने केम्ब्रिज शाळा चौक, शिवाय चिकलठाणा येथील जुन्या वळण रस्त्यावरही वाहने रोखण्यात येत आहेत. वाहनांचा शहरातील प्रवेश रोखण्यासाठी केम्ब्रिज चौकात दोन, देवळाई चौकात तीन, हर्सूल टी-पॉइंट येथे दोन आणि चिकलठाणा जुना वळण रस्ता येथे एका पोलिसाची नियुक्ती करण्यात आली. हे कर्मचारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत नियुक्त असेल. वाहतूक पोलिसांसोबत संबंंधित ठाण्याच्या कर्मचाºयांची मदत घेण्यात आली आहे.

तीन दिवसांत ४२ जड वाहनांवर कारवाईनियम तोडून शहरात आलेल्या ४२ जड वाहने आणि खाजगी बसेसवर प्रत्येकी बाराशे रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सिडको वाहतूक शाखेच्या अधिकाºयांनी दिली. या वाहनचालकांकडून ६१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.