शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

बोंडअळीचे संकट टाळण्यासाठी यंदा बियाणांच्या विक्रीवर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 17:32 IST

७ जूनपासूनच शेतकऱ्यांना बियाणांची विक्री करण्याच्या सूचना जि.प. कृषी विभागाने दिल्या आहेत. 

ठळक मुद्देखरीप हंगाम पूर्वतयारी यंदा पेरणीसाठी ५० हजार हेक्टर क्षेत्र वाढणार

औरंगाबाद : कपाशीवर पडणारी बोंडअळी आणि नव्याने मक्यावर येणारे अमेरिकन लष्करी अळीचे संकट टाळण्यासाठी यंदा बियाणे विक्रीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. शासन यंदा १५ मे रोजी कपाशीचे बियाणे कंपन्यांकडून वितरकांना देणार आहे. ३० मेपर्यंत स्वत:च्या गोदामात जतन करून ठेवण्याच्या सूचना वितरकांना देण्यात आल्या आहेत. ३० मेनंतर वितरकांमार्फत बियाणे विक्रेत्यांना देण्यास सुरुवात होईल. तरीदेखील प्रत्यक्षात ७ जूनपासूनच शेतकऱ्यांना बियाणांची विक्री करण्याच्या सूचना जि.प. कृषी विभागाने दिल्या आहेत. 

यासंदर्भात जि.प. कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, गेल्या वर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे मागील खरीप हंगामात ३ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती. बोंडअळी व्यवस्थापनाबाबत कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यामुळे यंदा कपाशीचे लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. यंदा ४ लाख ५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड होईल, अशी अपेक्षा आहे. यावेळी मक्याला भाव चांगला आल्यामुळे यंदा मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल. गेल्या वर्षी १ लाख ७५ हजार हेक्टर मका लागवडीचे क्षेत्र होते, यंदा गत वर्षीपेक्षा १० हजार हेक्टरने मक्याचे क्षेत्र वाढण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी ३० हजार ८०० हेक्टरवर तूर होती, ती यंदा ४२ हजार हेक्टरपर्यंत पोहोचेल.

गेल्या वर्षी २५ हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरी पेरण्यात आली होती, तर यंदा ३० हजार ४०० हेक्टर क्षेत्रात बाजरीची पेरणी होण्याची अपेक्षा आहे. खरीप हंगामासाठी आपल्याकडे सरासरी ४५ हजार १८६ क्विंटल बियाणे वापरले जाते. यंदा ५३ हजार ४०४ क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये मक्याचे २८ हजार क्विंटल, तर कपाशीचे ११ हजार ३९० क्विंटल. अर्थात, २० लाख बीटी बियाणांच्या पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. 

तीस निरीक्षकांची राहणार नजरजिल्हा परिषदेचे १२ व राज्य शासनाच्या कृषी विभागाचे १८, असे एकूण ३० निरीक्षक हे बियाणे, रासायनिक खते, मिश्र खते व कीटकनाशकांच्या विक्रीवर बारकाईने नजर ठेवणार आहेत. प्रामुख्याने विक्रेत्यांनी मिश्रखतांचे बॅचनिहाय नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवायचे आहेत. ते नमुने योग्य असल्याचा अहवाल आल्यानंतरच शेतकऱ्यांना त्याची विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पावसानुसार पेरणी करावी कृषी विकास अधिकारी गंजेवार यांनी सांगितले की, मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी १५ ते ३० जूनदरम्यान पावसानुसार पेरणी करावी. ३० जूननंतर मक्याची पेरणी कटाक्षाने टाळावी. ठरवून दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांनी पेरणीची ही मोहीम राबवावी. मक्यामध्ये तुरीचे आंतरपीक घ्यावे. ४ ओळी मक्याच्या, तर २ ओळी तुरीच्या पेराव्यात, कपाशीची लागवड ७ जूननंतरच करावी. शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी लागवड करू नये, तसेच बिगर बीटी बियाणांचीही सक्तीने लागवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद