शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मतदार नोंदणीसाठी दबावतंत्राचे राजकारण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 20:26 IST

तिन्ही मतदारसंघांतील मतांच्या गोळाबेरजेवर चिंतन

ठळक मुद्देप्रशासनाची सावध भूमिका

औरंगाबाद : लोकसभेतील निवडणुकीत तिन्ही मतदारसंघांतील मतांची गोळाबेरीज केल्यानंतर शिवसेना, भाजप युतीचे विधानसभा इच्छुक झपाट्याने नवीन मतदार नोंदणीच्या कामाला लागले आहेत; परंतु मतदार नोंदणीसाठी अर्हता दिनांक १ जानेवारी असल्यामुळे आता मध्येच नव्याने अर्ज स्वीकारण्यात जिल्हा प्रशासनाने असमर्थता दर्शविली असून, राजकीय दबाव आणून मतदार नोंदणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

काही तुरळक अपवादामध्ये मतदार नोंदणी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान ज्या नवमतदारांचे अर्ज नाकारण्यात आले त्या मतदारांच्या कागदपत्रांची त्रुटी पूर्ण करून त्यांची नावे विधानसभा यादीत समाविष्ट होऊ शकतात. यामध्ये स्थलांतरित, नवविवाहित, मागील काही वर्षांपासून नोंदणी न होणे याबाबतचे पुरावे तपासून प्रशासन नोंदणीचा निर्णय घेणार आहे. जिल्हाभरातून जास्तीत जास्त १५ ते २० हजारांपर्यंत मतदार नोंदणी वरील अनुषंगाने होणे शक्य आहे; परंतु एकाच मतदारसंघातून १० ते २० हजार मतदारांची संख्या नव्याने नोंदवून घेणे, हे मात्र शक्य नाही. तसे झाल्यास आयोगाकडून थेट चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी जी अर्हता तारीख होती, त्या तारखेपर्यंत हे अर्ज का आले नाहीत, याची विचारणा आयोग जिल्हा प्रशासनाला करू शकते. नवीन मतदारांच्या अर्जांची पडताळणीदेखील होऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले, तसेच आजवर १९ हजार नवमतदार अतिरिक्त होतील. ३० जुलैपर्यंत आॅनलाईन आलेले अर्ज घेण्यात आले. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार होणे शक्य नाही. असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादVotingमतदान