शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

सीमोल्लंघनाची तयारी पूर्ण

By admin | Updated: October 3, 2014 00:39 IST

औरंगाबाद : रावणाच्या पुतळ्याचे दहन करून दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी आणि बालाजीच्या रथासोबत सीमोल्लंघन करून विजयादशमी साजरी करण्याकरिता औरंगाबादकर सज्ज झाले आहेत.

औरंगाबाद : रावणाच्या पुतळ्याचे दहन करून दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी आणि बालाजीच्या रथासोबत सीमोल्लंघन करून विजयादशमी साजरी करण्याकरिता औरंगाबादकर सज्ज झाले आहेत. उद्या शुक्रवार, दि.३ आॅक्टोबर रोजी दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. कर्णपुरा येथील बालाजी मंदिरासमोर बालाजीचा रथ रंगरंगोटी करून सजविण्यात आला आहे. औरंगाबादकर हा बालाजीचा रथ ओढत सीमोल्लंघन करतात. याशिवाय चौराहा येथून बालाजीची पालखी व राजाबाजार येथून बालाजीची शोभायात्रा काढण्यात येते. सिडको एन-७ येथील रामलीला मैदानावर सायंकाळी रावणदहन करून विजयोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही हा सण साजरा करण्यासाठी जय्यत तयारी झाली आहे.राजाबाजार येथील बालाजी मंदिरातून सकाळी ९ वाजता शोभायात्रा निघणार आहे. चौराहा येथील हरलाल श्यामलाल बालाजी मंदिरातील बालाजीच्या पंचधातूच्या मूर्तीची पालखी सायंकाळी ६ वाजता निघणार आहे. कर्णपुरा येथील बालाजी मंदिरात सायंकाळी ६ वाजता बालाजीची आरती होऊन रथयात्रेला सुरुवात होईल. हा रथ पंचवटी चौकापर्यंत येऊन सीमोल्लंघन होईल व पुन्हा रथ मंदिरात आणला जाईल. सिडकोत रावणदहन सिडको एन-७ येथील रामलीला मैदानात ६५ फूट उंच रावणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. उत्तर भारत संघाच्या वतीने येथे रावणदहनाचे आयोजन करण्यात येते. सायंकाळी ४.३० वाजेपासून येथे राम-रावणाचे युद्ध सुरू होणार आहे. रामाची भूमिका संदीप सटोते, तर रावणाची भूमिका हरिशंकर मोरिया करीत आहेत. सायंकाळी ७ वाजता रावणदहन करण्यात येणार आहे. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. या रावणदहनाने संगीत रामलीलेचीही सांगता होणार आहे.