शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

धरणांचा परिसर लवकरच येणार पर्यटनाच्या कक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:57 IST

जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या धरणांचा परिसर लवकरच पयर्टनाच्या कक्षेत येणार आहे. धरणस्थळे पर्यटनस्थळे म्हणून विकसित केली जाणार आहेत. त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन पाटबंधारे विकास महामंडळांना महसुलाचा स्रोत निर्माण होणार आहे.

ठळक मुद्दे‘बीओटी’वर होणार धरण क्षेत्राचा विकासरोजगाराच्या संधीसह पाटबंधारे विकास महामंडळांना मिळेल महसूल

- संतोष हिरेमठ औरंगाबाद : जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या धरणांचा परिसर लवकरच पयर्टनाच्या कक्षेत येणार आहे. धरणस्थळे पर्यटनस्थळे म्हणून विकसित केली जाणार आहेत. त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन पाटबंधारे विकास महामंडळांना महसुलाचा स्रोत निर्माण होणार आहे.

राज्यात जलसंपदा विभागांतर्गत १३८ मोठे, २५५ मध्यम आणि २ हजार ८६२ लघुपाटबंधारे प्रकल्प आहेत. यामध्ये अनेक धरणे ही निसर्गरम्य ठिकाणी आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पर्यटनस्थळ विकसित करण्यास मोठा वाव आहे. धरण परिसराचा बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वानुसार विकसित केल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पर्यटन विकसित होईल. प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. शिवाय त्यातून पाटबंधारे विकास महामंडळांना महसुलाचा स्रोत निर्माण होईल. त्यादृष्टीने जलसंपदा विभागाने धरणस्थळे बीओटी तत्त्वावर खाजगी यंत्रणांकडून विकसित आणि व्यवस्थापन करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे.

तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. सदस्य म्हणून औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, पुणे जलसंपदाचे मुख्य अभियंता, नागपूर जलसंपदाचे मुख्य अभियंता, ठाणे पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंतांचा समावेश आहे. सदस्य सचिव म्हणून नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विकासासाठी पर्यटन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभागासोबत चर्चा केली जाईल. ही समिती ३० दिवसांत शासनाला अहवाल देणार आहे. ही समिती पर्यटनक्षम असलेल्या आणि विकसित करता येण्यायोग्य महत्त्वाच्या धरणांचा प्राधान्यक्रम तयार करणार आहे. बीओटीवर विकास करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या धोरणांचा मसुदा आणि खाजगी विकासकासोबत करण्यात येणारा करारनामा प्रकार आणि त्यातील अटी, शर्तींचा मसुदाही तयार केला जाईल. धरणांबरोबर जलसंपदा विभागाच्या १४६ विश्रामगृहांचा बीओटीवर विकास केला जाणार आहे.

सुरक्षितता, सुविधेला प्राधान्यमराठवाड्यात जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, विष्णुपुरीसह ११ जलप्रकल्प आहेत. यामध्ये सर्वाधिक मोठे धरण जायकवाडी हे पर्यटकांसाठी बाराही महिने आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते. पाणीसाठा तळाला असताना देखील पर्यटक धरणावर गर्दी करतात; परंतु सोयी-सुविधांअभावी पर्यटकांना अडचणींना तोंड द्यावे लागते.

शिवाय सुरक्षेसंदर्भात कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. पर्यटक धोकादायक ठिकाणी उभे राहून ‘सेल्फी’ घेतात. बहुतांश धरणांच्या परिसरात हीच परिस्थिती आहे. बीओटी तत्त्वावर विकास करताना या सगळ्यांचा विचार होईल आणि पर्यटकांना धरण परिसराचे नयनरम्य दृश्य सुरक्षितरीत्या पाहता येईल, अशी अपेक्षा व्यक्त आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdam tourismधरण पर्यटनState Governmentराज्य सरकारIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प